शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

राजकीय पुढारी पॅनल बनविण्यात व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:52 IST

चंद्रपूर : जिल्ह्यात १५ जानेवारीला ६२९ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यावर्षी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे ग्रामपातळीवरही ...

चंद्रपूर : जिल्ह्यात १५ जानेवारीला ६२९ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यावर्षी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे ग्रामपातळीवरही त्याचे पडसाद उमटतील, अशी शक्यता असताना जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी आता स्वतंत्र पॅनल उभे करून आपले लक्ष केंद्रीत केले आहे. अधिकाधिक ग्रामपंचायतीवर आपली सत्ता मिळविण्यासाठी प्रत्येक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यासाठी राजकीय पक्ष तसेच गावातील पॅनल आता एकदिलाने कामाला लागले आहे.

मागील पंचवार्षिकमध्ये भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलची अधिकाधिक ग्रामपंचायतीवर सत्ता होती. ही सत्ता कायम ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय नेत्यांनी आता गावाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर गावपातळीवरील राजकीय वातावरण बदलतील, अशी चर्चा आहे. मात्र हे सर्व स्थानिक नेत्यांवरच अवलंबून असल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांनी सावध भुमिका घेतली असून अजूनही आपले पत्ते खोलले नाही. मात्र तालुकापातळीवर बैठकांचा धुराळा उडत आहे. यामध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच शिवसेनेनेही पदाधिकारी कार्यकर्त्याचा बैठकी घेणे सुरु केले आहे. असे असले तरी महाविकास आघाडीचा फार्मुला गावात होणे शक्य नसल्याचे बोलल्या जात आहे.

मतदान

१५ जानेवारी

मतमोजणी

१८ जानेवारी

तालुकानिहायाय होऊ घेतलेल् ग्रामपंचायतीची संख्या

चंद्रपूर

राजुरा

मूल

पोंभूर्णा

सावली

ब्रह्मपुरी

जिवती

गोंडपिपरी

भद्रावती

वरोरा

नागभीड

चिमूर

सावली

सिंदेवाही

कोरपना

---बाॅक्स

स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचा दबदबा

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचा दबदबा आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच काही ठिकाणी शिवसेनेकडेही सत्ता आहे. दरम्यान, मागील पंचावार्षिकमध्ये अर्ध्याअधिक ग्रामपंचायतीवर भाजपचे वच्छस्व असल्याचा तसेच यावेळी जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर भाजपचेच पॅनल निवडून येतील, असा दावा केला जात आहे. तर ग्रामीण पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली पकड मजबूत केली आहे. भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी काॅंग्रेस- कांग्रेसच्या पॅनलकडेही मागील पंचवार्षीकमध्ये सत्ता होती.

बाॅक्स

असा आहे ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम

२३ ते ३० डिसेंबर या कालावधीमध्ये इच्छुक उमेदवारांना नामनिेर्देशनपत्र सादर करता येणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी या नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. ४ जानेवारी ला दुपारी ३ वाजेपर्यंत आवेदन मागे घेणे, त्यानंतर चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतीम यादी जाहीर होणार आहे.

--

स्थानिक नेतृत्वाकडे पुढाऱ्यांचे लक्ष

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी गावातील स्थानिक नेतृत्व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमीका ठरतात. गावातील निवडणुकीमध्ये पुढाऱ्याचे कसब पणाला लागणार आहे. यामध्ये प्रतिष्ठेला अधिक महत्त्व दिल्या जात असल्यामुळे राजकीय विचार बाजूला सारून बहुतांश पुढाकी गावातील पॅनलकडे अधिक लक्ष देत असल्याचे बघायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका

राज्यात महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सध्यास्थितीत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता बैठकांचा धुराळा उडविणे सुरु केले आहे.तालुकानिहाय बैठका घेणे सुरु करण्यात आले असून गावागावात पोहचून या निवडणुकीकडे अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.