शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
5
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
6
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
7
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
8
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
9
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
10
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

तळोधी, आलेवाही, मेंढ्यात वन जमिनीवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 01:35 IST

तळोधी, आलेवाही, आणि मेंढा (उश्राळ) येथील नर्सरीच्या जागेवरच गर्भश्रीमंत लोकांनी अतिक्रमण केले ...

हटविण्याची मागणी : गर्भश्रीमंतांनी केला कब्जा नागभीड/तळोधी (बा.) : तळोधी, आलेवाही, आणि मेंढा (उश्राळ) येथील नर्सरीच्या जागेवरच गर्भश्रीमंत लोकांनी अतिक्रमण केले असून बोंडप्रमाणेच हे अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी आहे. काही वर्षांपूर्वी तळोधी, आलेवाही आणि मेंढा (उश्राळ) येथे वन विभागाने रोपवाटिका तयार केल्या होत्या. या रोपवाटिकांमध्ये बांबू, साग, कडूलिंब, बिव्हला आदी विविध प्रकारच्या झाडांच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली होती. या नर्सरीची तीन- चार वर्षे वन विभागाकडून निगाही राखण्यात आली. ही रोपे चांगली वाढल्यानंतर वन विभागाने या नर्सरीकडे दुर्लक्ष केले. नेमकी हीच संधी साधून काही गर्भश्रीमंत लोकांनी या नर्सऱ्यांवर अतिक्रमण करून ही संपूर्ण जमीन हडपली आहे. हे अतिक्रमण होत असताना तत्कालिन वन अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे सारे घडून आल्याची चर्चा आहे. यामुळे रस्ते व पायवाटीसुद्धा कायमच्या बंद झाल्या आहेत. या अतिक्रमणाने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. परिसरातील गुरांना आता चराईसाठी जागाच उरली नाही. या निमित्ताने निर्माण झालेली ही प्रमुख समस्या असून रानटी प्राण्यांचा गावाकडे मोठ्या प्रमाणावर ओघ वाढला आहे. ही या निमित्ताने दुसरी मोठी समस्या निर्माण झाली आहे. शिवाय लाखो रुपये किंमतीची वनसंंपदाही नष्ट करण्यात आली आहे. शासन पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, यासाठी दरवर्षी वनसंपदा जगविण्यासाठी करोडो रुपये खर्च करीत आहे. यावर्षीसुद्धा दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवून लोकांचे लक्ष्य या समस्येकडे वेधले होते. मात्र त्याचवेळी शासनाचे वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष्य केले. त्यामुळेच हे अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले, असे आता लोक खुले आम बोलत आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, वर उल्लेख केलेल्या तिन्ही ठिकाणचे अतिक्रमण पाच- दहा एकरांतील नाही तर तब्बल ७० ते ८० हेक्टर क्षेत्रात असल्याचे समजते. उल्लेखनीय बाब अशी की, मागील वर्षी तळोधी येथील काही जागृत नागरिकांनी तळोधीच्या वनाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती. पण त्या अधिकाऱ्याने याकडे पार दुर्लक्ष केले. वेळीच या अतिक्रमणाला पायबंद घातला असता तर हे अतिक्रमण वाढले नसते, असेही यासंदर्भात बोलले जात आहे. तळोधी येथे नुकत्याच रुजू झालेल्या वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी बोंंड येथील अतिक्रमण ज्या प्रकारे हटविले त्याचप्रमाणे हे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी आहे. (लोकमत चमू) या अतिक्रमणाने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गुरे चराईचा प्रश्न निर्माण झाला आहे. जंगली प्राणी गावाकडे येत आहेत. हे अतिक्रमण त्वरीत हटवावे व समस्या निकाली काढाव्यात. - दिनकर पाकमोडे सचिव, भाजपा व माजी ग्रा.पं. सदस्य, तळोधी