शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

‘ती’ अतिक्रमित जमीन वन विभागाचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:36 IST

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाजवळील अतिक्रमित जमिनीचा ताबा न्यायालयाने वन विभागाला दिला.

ठळक मुद्देन्यायालयाचा आदेश : वन विभागाकडून विसापूरच्या जागेवर रोपवन सुरू

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाजवळील अतिक्रमित जमिनीचा ताबा न्यायालयाने वन विभागाला दिला. परिणामी या जागेवर आता वन विभागाने रोपवनाचे काम सुरु केले आहेविसापूर गावाजवळील जुना भूमापन सर्वे क्रमांक ३०५/१, नवीन सर्वे क्रमांक ४५९/१ या वनविभागाचे जागेपैकी २ हेक्टर जागेवर देवकुमार बुध्दलाल धामणे यांनी अतिक्रमण केले होते. याशिवाय अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. दरम्यान, संयुक्त दिवाणी न्यायाधिशांनी (वरिष्ठ स्तर) ही जमीन वनविभागाची असल्याचा आदेश जारी केला आहे. संबंधित जमीन प्रकरणातील प्रतिवादी मध्य चांदा उपवनसंरक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेशही दिले. त्यानुसार उपवनसंरक्षक यांनी प्रस्ताव सादर केला होता. ही जागा वनविभागाची असून वनखंड क्र ५७९, जुना सर्वे क्र ३०५/१ आणि नवीन सर्वे क्र ४५९/१ मधील दावा जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात सुरू होता. परंतु, सदर प्रकरण ठरवून दिलेल्या शासन निकषात बसत नसल्यामुळे वादी देवकुमार धामणे यांची मागणी अमान्य करून प्रकरण निकाली काढण्यात आले. प्रकरणाचा निकाल वनविभागाच्या बाजूने लागला. त्यामुळे या जागेत डिसेंबर २०१७ पासून नवीन रोपवन घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणात शासनाकडून अधिवक्ता शरद आंबटकर यांनी काम बाजू मांडली. न्यायालयाचा निर्णय वनविभागाच्या बाजूने लागल्याने या ठिकाणी रोपवनाचे काम सुरू करण्यात आले, अशी माहिती मध्य चांदा उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी दिली आहे. चंद्रपूर वनविभागाने विविध पुराव्यांचा आधार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे रोपवनासोबतच बॉटनिकल गार्डनच्या कामाला सुरुवात झाली आहे.