शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

एम्टा व पोलीस प्रशासनाद्वारे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न

By admin | Updated: September 24, 2014 23:28 IST

कर्नाटक एम्टा कोळसा खाण प्रशासनाच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात कामगारांचे आंदोलन शांततेत सुरु आहे. मात्र सदर आंदोलन चिघळून टाकण्याचा कर्नाटक एम्टा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

भद्रावती: कर्नाटक एम्टा कोळसा खाण प्रशासनाच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात कामगारांचे आंदोलन शांततेत सुरु आहे. मात्र सदर आंदोलन चिघळून टाकण्याचा कर्नाटक एम्टा प्रशासनाचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून आंदोलनकर्त्या १५ कामगारांवर खोटा आरोप लावला. त्यामुळे त्यांना अटक केल्याचा आरोप राष्ट्रीय कोयला कामगार संघर्ष संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मोहोड यांनी पत्रपरिषदेत केला.१ नोव्हेंबर २०१४ पासून सुरू होणाऱ्या नवीन वेतन श्रेणीच्या मागणीवरुन कामगारांचा एम्टा प्रशासनासोबत वाद सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून काही प्रमुख कामगारांना कंपनीने दुसऱ्या राज्यातील आपल्या कोळसा खाणीत बदली केली. एवढेच नाही तर कॅन्टींग बंद केली. याठिकाणी कार्यरत कॅप्टीव्ह कोयला मजदूर काँग्रेस (इंटक) आणि राष्ट्रीय कोयला कामगार संघर्ष संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एस. क्यू. जामा, प्रमोद मोहोड यांनी सुरुवातीला एम्टा प्रशासनासोबत समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु यश न आल्याने अखेर २२ सप्टेंबरपासून खाण बंद आंदोलन सुरु केले. सदर आंदोलन शांततेत सुरु असताना पोलिसांच्या देखरेखीत बाहेरील कामगारांना कामावर लावून खाण सुरु केली. या प्रकाराने संपावरील कामगार चिडले. शांतता भंग करतील असे प्रशासनाला वाटत होते. परंतु तसा प्रकार न घडल्याने अखेर बाहेरील कामगार विजयसिंग रायबहादुरसिंग याला एम्टा व पोलीस प्रशासनाने १५ प्रमुख कामगाराच्या विरोधात मारहाणीची तक्रार द्यायवयाला लावली असा आरोप मोहोड यांनी केला. २३ सप्टेंबरला सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी जयस्वाल, ठाणेदार परघने यांनी १५ कामगारांना अटक केली. यात विशाल दुधे, महेश पेटकर, दिनेश वानखेडे, संदीप घुगूल, उपेंद्र यादव, तालेश्वर वर्मा, राजेंद्र यादव, मनोज राय, हाकीमचंद पांडे, प्रमोद ठाकूर, अभिजीत मालाकार, अनिल प्रेमसागर तिवारी, अरविंद देवगडे, परशुराम यादव या कामगारांचा समावेश आहे. या सर्वांवर शांतता भंग करणे, मारहान व तीक्ष्ण शस्त्राने मारहाण करणे या स्वरुपाचे खोटे गुन्हे लावल्याचा आरोपही त्यांनी केला.कंपनी कामगारांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र कामगार संघटना तसे होऊ देणार नसून कामगारांना न्याय मिळवून देणार असल्याचेही ते म्हणाले. कंपनी पोलिसांना हाताशी घेऊन कामगार कायद्याचा भंग करीत असल्याचा आरोपही मोहोड यांनी केले. पत्रपरिषदेला धनंजय गुंडावार, संजय दुबे यांच्यासह कामगार नेते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)