शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

प्लास्टिक कचरा निर्मूलनातून गाव पातळीवर रोजगार द्या

By admin | Updated: February 19, 2017 00:30 IST

प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येने गंभीर स्वरुप धारण केले आहे. त्याचा परिणाम पशुधनावर होत आहे.

विभागीय आयुक्तांचे निर्देश : जि.प. व जिल्हाधिकारी कार्यालयात आढावाचंद्रपूर : प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येने गंभीर स्वरुप धारण केले आहे. त्याचा परिणाम पशुधनावर होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्लास्टिक कचरा निर्मूलन करण्यासाठी गावस्तरावर युनिट स्थापन करून गावातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात, असे निर्देश नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी शनिवारी येथे दिले.जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी विविध योजनांची आढावा बैठक घेतली. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. अनुपकुमार यांनी प्लास्टिक कचऱ्याकडे अधिकारी वर्गाचे लक्ष वेधले.गावात प्लास्टिक कचरा पशु खातात. त्यातून त्यांना आजार होऊन मरण पावतात. त्यामुळे पशुधन कमी झाले आहे. तसेच गार्इंचे दूधही कमी झाले आहे. ही समस्या मिटवायची असेल तर प्लास्टिक कचरा निर्मूलन करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. त्याकरिता गावपातळीवर युनिट तयार केले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.गाव पातळीवर स्वच्छ भारत मिशन आणि जलयुक्त शिवार कार्यक्रमांची कामे प्राधान्याने करण्यात यावी. या कामात हयगय करण्यात आल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा अनुपकुमार यांनी दिला. तत्पूर्वी जिल्हा विकास यंत्रणा, महिला व बालकल्याण विभाग, सिंचन विभाग, जि.प. पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग आदींचे सादरीकरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांनी केले. या बैठकीला विभागीय उपायुक्त (विकास) विपुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) रवींद्र मोहिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय जोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश राठोड यांच्यासह सर्व विभागप्रमुख, सर्व गटविकास अधिकारी, अभियंता, अधिकारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आॅरगॅनिक खाद्य पदार्थांचे ब्रॅडिंग कराबचत गटामार्फत आॅरगॅनिक खाद्य पदार्थांनी निर्मिती करण्यात यावी. या आॅरगॅनिक खाद्य पदार्थांचे ब्रँडिंग करण्यात यावे. महिला बचतगटांमध्ये मार्केटिंगचे कौशल्य निर्माण करावे. शेतकरी बचतगट आणि महिला बचतगटांची सांगड घालून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यात यावे. जिल्ह्यात चांगले बचतगट निर्माण करावेत, अशा सूचनाही अनुपकुमार यांनी दिल्या.जिल्हा ‘टॉप टेन’मध्ये राहावाविविध शासकीय योजना राबवून राज्यात चंद्रपूर जिल्हा टॉप टेनमध्ये राहिला पाहिजे. मूल व पोंभुर्णा येथे होत असलेले वॉटरपार्क आणि सॅनिटरीपार्कचे काम खुप चांगले आहे. प्रत्येक कामाचा दिवस महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने आव्हान समजून चांगली कामे करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.