शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

लॉकडाऊनमध्ये कामगारांना रोजगार हमी योजनेचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST

बेरोजगार मजुरांना काम म्हणून शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. ‘मागेल त्याला काम’ असे ब्रिद असलेल्या या योजनेंतर्गत जॉब कार्डधारकांना कामाच्या मागणीनुसार काम देण्यात येते. कोरोना विषाणूमुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंद बंद पडले. त्यामुळे कामगार व मजुरांवर उपासमारीची वेळ आली.

ठळक मुद्देजिल्ह्यात दोन हजार १८२ कामे सुरु : ३३ हजार कामगारांना मिळाले काम

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊन काळात बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात केली. ४८४ ग्रामपंचायतीतील २ हजार १८२ कामे सुरु झाली आहे. त्यातून जिल्ह्यातील ३३ हजार ५०९ मजुरांच्या हाताला कामे मिळाली.बेरोजगार मजुरांना काम म्हणून शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. ‘मागेल त्याला काम’ असे ब्रिद असलेल्या या योजनेंतर्गत जॉब कार्डधारकांना कामाच्या मागणीनुसार काम देण्यात येते.कोरोना विषाणूमुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंद बंद पडले. त्यामुळे कामगार व मजुरांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे जॉबकार्डधारकांकडून कामाची मागणी वाढली त्यानुसार जिल्ह्यातील ८५५ ग्रामपंचायतपैकी ४८४ ग्रामपंचायतमध्ये दोन हजार १८२ कामाला सुरुवात झाली आहे. विहिरींचे बांधकाम, तलाव खोलीकरण, शेततळे बांधकाम, गाळ उपसा, रस्त्यांचे बांधकाम अशी कामे सुरु करण्यात आली आहेत. या कामावर सुमारे ३३ हजार ५०९ कामगार काम करीत आहेत. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कामे रोजगार बंद असताना रोहयोची कामे मजुरांना दिलासा देणारी ठरली आहेत.सोशल डिस्टन्सिंग पालन बंधनकारकदेशात कोरोना प्रादुर्भाव असल्याने शासनाने विविध प्रकारची नियमांवली तयार केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रोहयोची कामे सुरु झाली आहेत. त्या कामावर मजूरही कार्यरत आहेत. काम करताना कामगारांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच काम करताना मास्क बंधणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर व मास्कचा पुरवठा करण्यात आला आहे.शासनाच्या आदेशानुसार कामाच्या मागणीचा विचार करुन कामे सुरु करण्यात आली आहेत. कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर, मास्कचा पुरवठा करण्यात आला आहे. कामगारांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.- किरणकुमार धनवाडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, रोहयो, चंद्रपूर.