शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सरकार विरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:55 IST

राज्य सरकार सरकारी कर्मचारी विरोधात धोरण राबवित आहे. नोकर भरती प्रक्रिया जाणीवपूर्वक थांबवित आहे. परिणामी कार्यरत कर्मचाऱ्यांवर तणाव पडत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देतीन दिवसांच्या संपाची हाक : सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करा

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : राज्य सरकार सरकारी कर्मचारी विरोधात धोरण राबवित आहे. नोकर भरती प्रक्रिया जाणीवपूर्वक थांबवित आहे. परिणामी कार्यरत कर्मचाऱ्यांवर तणाव पडत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी राज्य कर्मचाऱ्यांना लागू करा व २ नोव्हेंबर २००५ पासून कर्मचाऱ्यांना निश्चित लाभाची वैधानिक पेन्शन योजना मंजूर करावी, यासह अन्य प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ आॅगस्ट दरम्यान तीन दिवसाच्या संपाची हाक दिली. येथील उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या सभेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात कर्मचाºयांनी एल्गार पुकारून संघर्ष करण्याचा इशारा दिला.राज्यभरातील सरकारी कार्यालयात १९ लाखांवर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यातील दीड ते दोन लाखांवर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. मात्र राज्य सरकारने गोंडस नाव धारण करून ७२ हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली. ही बाब दिशाभूल करणारी आहे. सरकारी सेवेतील भरती पदामध्ये कंत्राटीकरण येणार याचा विचार केला नाही. मात्र सरकार नेहमीच कर्मचाऱ्यांना वेठीस धरत आहे. सरकार विरोधात भूमिका घेणाऱ्यांना देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्याच्या विकासात कर्मचाऱ्यांचे योगदान असून ही सरकार कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या सोडवत नाही, असाही आरोप सभेच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या पदािधकाºयांनी यावेळी केला.यावेळी सभेला मार्गदर्शक म्हणून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना निमंत्रक रमेश पिंपळशेंडे, जिल्हाध्यक्ष दीपक जेऊरकर, कार्याध्यक्ष राजू धांडे, बल्लारपूर उपविभागाचे अध्यक्ष अजय मेकलवार, राजेश लक्कावार आदी पदाधिकारी उपस्थित होते. सभेला राज्य सरकारी कर्मचारी, जि.प. कर्मचारी, चतुर्थश्रेणी कर्मचारी, सरकारी व निम सरकारी कर्मचारी उपस्थिती होते. संचालन प्रमोद अडबाले यांनी तर आभार अजय मेकलवार यांनी मानले.कर्मचाऱ्यांनो, बेमुदत संपाची तयारी ठेवा -पिंपळशेंडेराज्य सरकारी कर्मचारी संघटना जेव्हा जेव्हा आंदोलन करण्याचा इशारा देते, तेव्हा तेव्हा सरकार आश्वासनाची खैरात पुढे करते. परिणामी कर्मचाऱ्यांत संभ्रम निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. वसंत दादा पाटील मुख्यमंत्री असताना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी ५४ दिवसांचा बेमुदत संप केला होता. हा इतिहास आहे. राज्य सरकार मधील सचिवस्तरावरील अधिकारी एखादा आदेश निर्गमित करून कर्मचाऱ्यांना लालीपाप दाखवतील त्यावर संघटनेशिवाय, विश्वास ठेवू नका. जर आपल्या हिताचा निर्णय सरकारने घेतला नाही. तर सर्वांनी बेमुदत संपाची मानसिकता बाळगावी, असे आवाहन सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रण रमेश पिंपळशेंडे यांनी उपस्थित कर्मचाºयांना केले.अशा आहेत मागण्याराज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून न्याय मागण्या सोडविण्यासाठी अनेकदा सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र आश्वासनाशिवाय सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करा, १ नोव्हेंबर २००५ पासून लाभाची पेन्शन योजना मंजूर करावी, नोकर भरतीवर बंदी त्वरीत रद्द करावी, कंत्राटी सेवेतील कर्मचाऱ्यांना कायम करावे, ५० टक्के महागाई भत्ता मूळ वेतनात वर्ग करावा, श्रम व औद्योगिक कायद्याची अंमलबजावणी करावी, निवृत्तीचे वय ६० वर्ष करून आठवडा पाच दिवसाचा करावा, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना भत्ता मंजूर करावा, आगाऊ वेतनवाढीचा शासन निर्णय, निर्गमित करावा, जात वैधता पडताळणी / विना / विलंब दूर करावी आदी प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी सलग तीन दिवसांच्या संपाचे हत्यार पुढे करण्यात आले आहे.