शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन

By admin | Updated: April 14, 2016 01:05 IST

महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मंजूर करण्यात याव्या आणि कर्मचाऱ्यांप्रति शासनाने सहानुभूती दाखवावी,....

उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : न्याय मागण्या तत्काळ मंजूर करण्याची मागणीबल्लारपूर : महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मंजूर करण्यात याव्या आणि कर्मचाऱ्यांप्रति शासनाने सहानुभूती दाखवावी, यासाठी बल्लारपूर येथील तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लेखणीबंद आंदोलन केले.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील उपविभागीय अधिकारी कल्पना निळ यांना निवेदन सादर केले.राज्य महसूल कर्मचारी संघटना कित्येक दिवसांपासून सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्याची मागणी करीत आहे. मात्र राज्य सरकार महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागत आहे. याचा विपरित परिणाम महसूल प्रशासनाशी निगडित जनतेच्या कामकाजावर होत आहे. राज्याच्या प्रशासनात महसूल विभाग महत्त्वाचा घटक आहे. याच विभागावर प्रशासनाचा आर्थिक डोलारा उभा आहे. परंतु या विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे शासनस्तरावरुन डोळेझाक केली जात आहे.शासनस्तरावर न्याय मागण्याचा निर्णय जोपर्यंत लागणार नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे, असे संघटनेने म्हटले आहे. नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, महसूल विभागातील लिपीकांना महसूल सहायक म्हणून मान्यता देण्यात याावी, नायब तहसीलदारांची पदे पदोन्नतीने भरण्यात यावी. कोतवालांना चर्तुथ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, यासह एकूण २६ मागण्या शासनाकडे लावून धरण्यात आल्या आहेत. न्याय मागण्या सरकारने लागू कराव्या, अशी अपेक्षा अजय मेकलवार यांनी व्यक्त केली.महसूल कर्मचाऱ्यांच्या भावना व मागण्याची सोडवणूक करण्यात याावी म्हणून उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अजय मेकलवार, कुणाल सोनकर, जी.एम. मेश्राम, एम.टी. वादीकर, दत्तराज कुळसंगे, पी.आर. अडबाले, पोर्णिमा नैताम, व्ही.एन. उईके, राजू अंडेलकर, शोभा मुंडरे, ए.एच. गोहणे, निलेश मत्ते, एस.बी. वाढई यांच्या समावेश होता. विशेष म्हणजे मागील आठवड्यात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला होता. लेखनीबंद आंदोलनामुळे नागरिकांची कामे खोळंबत आहेत. (शहर प्रतिनिधी)