शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन

By admin | Updated: April 14, 2016 01:05 IST

महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मंजूर करण्यात याव्या आणि कर्मचाऱ्यांप्रति शासनाने सहानुभूती दाखवावी,....

उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : न्याय मागण्या तत्काळ मंजूर करण्याची मागणीबल्लारपूर : महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मंजूर करण्यात याव्या आणि कर्मचाऱ्यांप्रति शासनाने सहानुभूती दाखवावी, यासाठी बल्लारपूर येथील तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लेखणीबंद आंदोलन केले.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील उपविभागीय अधिकारी कल्पना निळ यांना निवेदन सादर केले.राज्य महसूल कर्मचारी संघटना कित्येक दिवसांपासून सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्याची मागणी करीत आहे. मात्र राज्य सरकार महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागत आहे. याचा विपरित परिणाम महसूल प्रशासनाशी निगडित जनतेच्या कामकाजावर होत आहे. राज्याच्या प्रशासनात महसूल विभाग महत्त्वाचा घटक आहे. याच विभागावर प्रशासनाचा आर्थिक डोलारा उभा आहे. परंतु या विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे शासनस्तरावरुन डोळेझाक केली जात आहे.शासनस्तरावर न्याय मागण्याचा निर्णय जोपर्यंत लागणार नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे, असे संघटनेने म्हटले आहे. नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, महसूल विभागातील लिपीकांना महसूल सहायक म्हणून मान्यता देण्यात याावी, नायब तहसीलदारांची पदे पदोन्नतीने भरण्यात यावी. कोतवालांना चर्तुथ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, यासह एकूण २६ मागण्या शासनाकडे लावून धरण्यात आल्या आहेत. न्याय मागण्या सरकारने लागू कराव्या, अशी अपेक्षा अजय मेकलवार यांनी व्यक्त केली.महसूल कर्मचाऱ्यांच्या भावना व मागण्याची सोडवणूक करण्यात याावी म्हणून उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अजय मेकलवार, कुणाल सोनकर, जी.एम. मेश्राम, एम.टी. वादीकर, दत्तराज कुळसंगे, पी.आर. अडबाले, पोर्णिमा नैताम, व्ही.एन. उईके, राजू अंडेलकर, शोभा मुंडरे, ए.एच. गोहणे, निलेश मत्ते, एस.बी. वाढई यांच्या समावेश होता. विशेष म्हणजे मागील आठवड्यात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला होता. लेखनीबंद आंदोलनामुळे नागरिकांची कामे खोळंबत आहेत. (शहर प्रतिनिधी)