शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

मासळ परिसरातील उमेदवारांकडून सायंकाळच्या प्रचारावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:23 IST

तालुक्यात बहुतांश गावामध्ये सर्व पक्ष मिळून पॅनल निर्मितीला भर दिलेला आहे. स्थानिक राजकारणात पक्षापेक्षा व्यक्तीला व विकासाला महत्व दिले ...

तालुक्यात बहुतांश गावामध्ये सर्व पक्ष मिळून पॅनल निर्मितीला भर दिलेला आहे. स्थानिक राजकारणात पक्षापेक्षा व्यक्तीला व विकासाला महत्व दिले जात आहे. ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत अनेक तरुणांना संधी दिल्यामुळे परिसरातील अनेक गावात तरुणांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे महत्व वाढताना दिसून येत आहे. प्रामुख्यांने प्रचारात गावाच्या विकासाच्या प्रश्नावर जास्त भर दिला जात आहे.

गावाची कुटुंब संख्या कमी असल्याने व उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्त्रोत नसल्याने गावाच्या विकास कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. तालुक्यातील मासळ परिसरातील अनेक गावांची विकासाची तहान अजूनही भागलेली नाही. अनेक गावे फक्त रेकाॅर्डवर व नावापुरते हागणदारी मुक्त झालेली आहेत. शाळा,अंगणवाडीच्या इमारतीची दैनावस्था पहावयास मिळत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार विकासकामांवर भर देताना दिसत आहे.

मत मागणे चिन्ह कोणते, याबाबत माहिती देण्यासाठी उमेदवार घरोघरी फिरत असून रात्रीचा खर्चदेखील वाढला आहे. त्यामुळे थंडी जास्त नसली तरी, निवडणुकीत जास्तच वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.