शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
2
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
3
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
4
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
5
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
6
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
7
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
8
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
9
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
10
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
11
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
12
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
13
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
14
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
15
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
16
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
17
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
18
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
19
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
20
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!

थोर महापुरुषांचे विचार आत्मसात करा

By admin | Updated: August 10, 2016 00:34 IST

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी लढा दिला. वेळप्रसंगी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

नाना श्यामकुळे यांचे प्रतिपादन : क्रांतिदिनी चंद्रपुरात निघाली तिरंगा यात्रा चंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी लढा दिला. वेळप्रसंगी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या प्रयत्नामुळेच भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यांचे विचार प्रत्येकांनी आत्मसात करावे, असे आवाहन आमदार नाना शामकुळे यांनी मंगळवारी भाजपातर्फे आयोजीत तिरंगा यात्रा कार्यक्रमाप्रसंगी केले. स्वातंत्र्यापूर्वी ९ आॅगस्ट १९४२ रोजी इंग्रजांविरुद्ध चले जाव आंदोलनाची सुरवात झाली. त्याला ७५ वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. यानिमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे तिरंगा यात्रा काढण्यात आली. याप्रसंगी जिल्हा कारागृहात क्रांतिवीर शहीद वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या स्मारकास आमदार नाना शामकुळे यांनी पुष्पमाला अर्पण केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंता देशमुख, नगरसेवक अनिल फुलझेले, नगरसेविका अंजली घोटेकर, नगरसेविका वनश्री गेडाम, नगरसेविका मायाताई उईके, राजेंद्र अडपेलवार, नगरसेवक धनंजय हुंड, मोहन चौधरी, रघुवीर अहीर, ललीताताई गराड, सुषमा नागोसे, देवानंद वाढई, रवी गुरनूले, तुषार सोम, जितेंद्र धोटे, प्रमोद शास्त्रकार, राजेंद्र खांडेकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यानंतर हुतात्मा स्मारक येथे पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी मनपाचे आयुक्त संजय काकडे, उपायुक्त इंगोले, मनपाचे अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी हजर होते. तिरंगा यात्रा प्रमुख मागार्ने निघाली. यात शेकडो मोटारस्वार सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)मोबाईल सेवा ठरतेयं कुचकामी पेंढरी (कोके) : सिंदेवाही, चिमूर तालक्यातील ग्रामीण भागात मोबाईल कंपन्यांनी जाळे पसरविले आहे. मात्र नेटवर्कच्या समस्येमुळे मोबाईल सेवा ढेपाळली आहे. कंपन्यांनी आपल्या टोॅवरची रेंज वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)