शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:54 IST

अंबुजा सिमेंट कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. मात्र आश्वासनाप्रमाणे स्थायी नोकरी दिली नाही.

ठळक मुद्देमोबदला व नोकरी द्या : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : अंबुजा सिमेंट कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. मात्र आश्वासनाप्रमाणे स्थायी नोकरी दिली नाही. नव्या धोरणानुसार जमिनीची वाढीव रक्कमही दिली नाही. नोकरी व वाढीव रक्कम तत्काळ देण्याची यावी, या मागणीसाठी कोरपना तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांनी एल्गार पुकारला आहे. शनिवारपासून हे प्रकल्पग्रस्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.कोरपना तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून अंबुजा उद्योग कार्यरत आहे. या प्रकल्पासाठी पाचशेहून अधिक शेतकºयांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. यातील १०० च्या जवळपास प्रकल्पग्रस्तांना कंपनीने स्थायी नोकरी दिली. मात्र इतरांना अद्याप प्रतीक्षाच करावी लागत आहे. मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रकल्पग्रस्तांनी २००५ मध्ये अंबुजा सिमेंट कंपनीच्या विरोधात राजुरा तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले होते. या मोर्चाचे नेतृत्व तत्कालीन खासदार व विद्यमान केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले होते. हरदोना ते राजुरा असा हा मोर्चा निघाला होता. यावेळी कंपनी व्यवस्थापनाने ना. अहीर यांच्या समक्ष प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.मात्र आश्वासनाची अद्यापही पूर्तता केली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आता एल्गार पुकारला आहे. दरम्यान, शनिवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला बसलेल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये आकाश नानाजी लोडे, सचिन विनायक पिंपळशेंडे, निखील सुधाकर भोजेकर, संजय मारोती मोरे, सत्यपाल धर्मु किन्नाके आदींचा समावेश आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा भूमिका प्रकल्पग्रस्तांची आहे.ग्रामपंचायतीच्या ठरावांना ठेंगाउद्योगामध्ये सडक्या दुर्गंधीयुक्त प्लॉस्टिकचा वापर केला जातो. या दुर्गंधीमुळे उपरवाही व आसपासच्या गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत उपरवाही गावातील लोकांनी अनेकवेळा ग्रामसभेत ठराव घेऊन कार्यवाहीसाठी प्रशासनाकडे पाठविला. मात्र प्रशासनानेही ग्रामसभांच्या या ठरावांना ठेंगा दाखविला आहे, असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे.