शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

विरुर परिसरात विजेचा लपंडाव

By admin | Updated: August 17, 2015 00:48 IST

राजुरा तालुक्यातील विरुर (स्टे.) व परिसरात मागील कित्येक दिवसापासून विजेचा लपंडाव सुरु आहे.

विरुर (स्टे.) : राजुरा तालुक्यातील विरुर (स्टे.) व परिसरात मागील कित्येक दिवसापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई भासत असून महिलांना पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विजेचा कमी अधिक दाब व सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे वीज उपकरणात बिघाड होत असून काही उपकरणे जळाल्याची माहिती आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात विजेचा खेळखंडोबा सुरु असून नागरिकांची अनेकदा गैरसोय होत आहे.सध्या सणसुदीचे दिवस आहेत. नागपंचमी, रक्षाबंधन यांच्यासह अनेक सण एका पाठोपाठ येत असून हे सण नागरिक साजरे करण्याचा मनस्थितीत असताना रात्रंदिवस वीज खंडीत होण्याचे प्रकार विरुरसह परिसरातील गावात घडत आहे. हा परिसर नक्षलग्रस्त भागात मोडत असून या भागात बहुतांश आदिवासी जमात वास्तव्याला आहे. अंधाराचा फायदा घेत नक्षलवाद्यांनी विरुर पोलीस ठाण्यावर सन १९९७ ला हल्ला चढविला. तसेच सन २००४ ला माकुडी या रेल्वेस्थानकावर जाळपोळ करण्यात आली. तेव्हापासूनच नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील एका महिन्यापासून वीज पाच मिनीटे राहते तर अर्धा तास जाते. वीज किती वेळा जाते अन कितीवेळा येते, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या व्यवसायिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यातच वारंवार बंद होणाऱ्या विजेमुळे ओलीत करणारे शेतकरी वर्गसुद्धा त्रस्त झाला आहे. याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. अलिकडे तर १२ तासाचे भारनियमन होत असल्याचे जाणवते. विजेवर चालणारे उद्योगधंदे प्रभावित झाले आहे. लहान आटाचक्की, कांडप केंद्र, एसटीडी केंद्र, इंलेक्ट्रॉनिक्स वस्तु विकणारे व दुरुस्ती करणारे आदी धंदे धोक्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या परिसरातील वीज पुरवठा नसल्यासारखाच असतो. मात्र वीज देयके तेवढेच. विरुर येथे २२० केव्ही व ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र आहेत. त्यामुळे या ठिकाणी कनिष्ठ अभियंता व वीज कर्मचारी मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. परंतु स्वत:च्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच स्वत:च्या सोईसाठी अधिकारी वर्ग व कर्मचारी बाहेर गावावरुन येणे-जाणे करतात. त्यामुळे वीज सेवा खंडीत झाल्यास वीज कर्मचाऱ्यांची चतकोराप्रमाणे वाट बघत राहवे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळते. विरुरात दोन वीज कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. परंतु त्यातील एक वीज कर्मचारी विद्युत पोलवर चढून काम करु शकत नाही. वीज कर्मचारी दारूच्या आहारी जाऊन तुल्ल असतात. त्यामुळे अडचण पुन्हा वाढली आहे. त्यांच्याकडून काम करुन घेणे धोक्याचे असते.विजेच्या लपंडावामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. विरुर परिसरात विजेचा लपंडाव थांबवावा व कनिष्ठ अभियंता तसेच वीज कर्मचारी मुख्यालयी रहावे, अशी मागणी जि.प. सदस्य अविनाश जाधव, भिमराव अंगलवार, अशोक जयस्वाल, बंडू रामटेके, मंगेश मडावी, रवी होरे, मारोती पोटे, सर्वानंद वाघमारे, संतोष मेडपुरवार, अरुण चौधरी, बापू धोटे आदींनी केली आहे. (वार्ताहर)