शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

निवडणूक यंत्रणेने इव्हीएम मशीन परस्पर केल्या सील

By admin | Updated: April 21, 2017 00:50 IST

मतदान झाल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या समक्ष मतदान यंत्र सील करून ठेवताना हॉल सील करताना त्यावर

नरेश पुगलियांचा आरोप : अधिकाऱ्यांना निवेदन सादरचंद्रपूर : मतदान झाल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या समक्ष मतदान यंत्र सील करून ठेवताना हॉल सील करताना त्यावर उमेदवारांची सही घेणे आवश्यक असते; मात्र निवडणूक यंत्रणेने उमेदवारांच्या सह्या न घेता परस्पर मतदान यंत्र सील केले. यामुळे मतदानानंतरच्या निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणवार घोळ होऊ शकतो, अशी तक्रार काँगे्रसचे नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी गुरूवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.चंद्रपूर महानगर पालिकेसाठी १९ एप्रिलला मतदान पार पडले. मतदानानंतर केंद्रांवरील इव्हिएम मशीन सील करण्यात आल्या. मतदानाची प्रक्रिया सायंकाळी ६.३० पर्यंत चालली. त्यानंतर बहुतेक केंद्रांवरील मशीन उपस्थित उमेदवारांच्या अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षरीने सील न करता परस्पर करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे चंद्रपूर शहर जिल्हा कमेटीचे अध्यक्ष गजाजनन गावंडे यांनी एका तक्रारीतून केला आहे. मनपाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, तथा पाचही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या संदर्भात माहिती देताना नरेश पुगलिया म्हणाले, मतदानानंतर सर्व इव्हिएम मशीन जिल्हा क्रीडा संकूलाच्या वरच्या मजल्यावर ठेवण्यात आल्या. मशीन ठेवलेल्या हॉलला सील करताना उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या घेवून मनपाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी सील करायला हव्या. त्यानंतर मतमोजणीच्या वेळी संबंधित उमेदवारांच्या समक्ष हे सील उघडले जावे, अशी पद्धत आहे. मात्र तसे न करता, हा हॉल सील करताना पाचही झोनच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या एका रजिस्टरवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. त्यानंतर एका उमेदवाराच्या पतीची स्वाक्षरी घेवून सील करण्यात आले. ही पद्धत चुकीची असून यात गैरप्रकाराला वाव असल्याचा आरोप नरेश पुगलिया यांनी केला आहे. या संदर्भात पुगलिया पुढे म्हणाले, यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत ही पद्धत पाळली गेली आहे. मात्र या वेळी बगल देण्यात आली. हा प्रकार लक्षात आल्यावर काँग्रसचे प्रचार उपप्रमुख देवेंद्र बेले यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. मात्र त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे सूचविले. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने मनपाच्या आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भेट घडली नाही. त्यांना देण्यासाठी लेखी निवेदनही घेवून काँगे्रसचे कार्यकर्ते गेले असता त्यांनी भेटच दिली नाही. मतमोजणीच्या काळात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी आयुक्तांचीच राहील, असे पुगलिया या वेळी म्हणाले. वारंवार विनंती करूनही या गंभीर प्रकाराकडे लक्ष न देणे चुकीचे आहे. मतमोजणीत गैरप्रकार असल्याचे लक्षात आल्यास शहरात २४ तासात गंभीर परिणाम उमटतील, असा इशाराही पुगलिया यांनी यावेळी दिला. पत्रकार परिषदेला गावंडे गुरूजी, नंदू नागरकर, सुनिता लोढीया, प्रकाश इटनकर, देवेंद्र बेले, अशोक नागापुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)