शहरं
Join us  
Trending Stories
1
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
2
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
3
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
4
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
5
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
6
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
7
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
8
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
9
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
10
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
11
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
12
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
13
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
14
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
15
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
16
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
17
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
18
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
19
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
20
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट

निवडणूक यंत्रणेने इव्हीएम मशीन परस्पर केल्या सील

By admin | Updated: April 21, 2017 00:50 IST

मतदान झाल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या समक्ष मतदान यंत्र सील करून ठेवताना हॉल सील करताना त्यावर

नरेश पुगलियांचा आरोप : अधिकाऱ्यांना निवेदन सादरचंद्रपूर : मतदान झाल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या समक्ष मतदान यंत्र सील करून ठेवताना हॉल सील करताना त्यावर उमेदवारांची सही घेणे आवश्यक असते; मात्र निवडणूक यंत्रणेने उमेदवारांच्या सह्या न घेता परस्पर मतदान यंत्र सील केले. यामुळे मतदानानंतरच्या निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणवार घोळ होऊ शकतो, अशी तक्रार काँगे्रसचे नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी गुरूवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.चंद्रपूर महानगर पालिकेसाठी १९ एप्रिलला मतदान पार पडले. मतदानानंतर केंद्रांवरील इव्हिएम मशीन सील करण्यात आल्या. मतदानाची प्रक्रिया सायंकाळी ६.३० पर्यंत चालली. त्यानंतर बहुतेक केंद्रांवरील मशीन उपस्थित उमेदवारांच्या अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षरीने सील न करता परस्पर करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे चंद्रपूर शहर जिल्हा कमेटीचे अध्यक्ष गजाजनन गावंडे यांनी एका तक्रारीतून केला आहे. मनपाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, तथा पाचही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या संदर्भात माहिती देताना नरेश पुगलिया म्हणाले, मतदानानंतर सर्व इव्हिएम मशीन जिल्हा क्रीडा संकूलाच्या वरच्या मजल्यावर ठेवण्यात आल्या. मशीन ठेवलेल्या हॉलला सील करताना उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या घेवून मनपाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी सील करायला हव्या. त्यानंतर मतमोजणीच्या वेळी संबंधित उमेदवारांच्या समक्ष हे सील उघडले जावे, अशी पद्धत आहे. मात्र तसे न करता, हा हॉल सील करताना पाचही झोनच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या एका रजिस्टरवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. त्यानंतर एका उमेदवाराच्या पतीची स्वाक्षरी घेवून सील करण्यात आले. ही पद्धत चुकीची असून यात गैरप्रकाराला वाव असल्याचा आरोप नरेश पुगलिया यांनी केला आहे. या संदर्भात पुगलिया पुढे म्हणाले, यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत ही पद्धत पाळली गेली आहे. मात्र या वेळी बगल देण्यात आली. हा प्रकार लक्षात आल्यावर काँग्रसचे प्रचार उपप्रमुख देवेंद्र बेले यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. मात्र त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे सूचविले. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने मनपाच्या आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भेट घडली नाही. त्यांना देण्यासाठी लेखी निवेदनही घेवून काँगे्रसचे कार्यकर्ते गेले असता त्यांनी भेटच दिली नाही. मतमोजणीच्या काळात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी आयुक्तांचीच राहील, असे पुगलिया या वेळी म्हणाले. वारंवार विनंती करूनही या गंभीर प्रकाराकडे लक्ष न देणे चुकीचे आहे. मतमोजणीत गैरप्रकार असल्याचे लक्षात आल्यास शहरात २४ तासात गंभीर परिणाम उमटतील, असा इशाराही पुगलिया यांनी यावेळी दिला. पत्रकार परिषदेला गावंडे गुरूजी, नंदू नागरकर, सुनिता लोढीया, प्रकाश इटनकर, देवेंद्र बेले, अशोक नागापुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)