शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कृषी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे!

By admin | Updated: January 12, 2017 00:40 IST

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत.

हंसराज अहीर यांचे निर्देश : कृषी विकास आढावा बैठक, कामांचे अहवाल सादरचंद्रपूर : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. केंद्र व राज्य सरकारने शेतकरी हिताच्या अनेक महत्त्वाकाक्षी योजनांची अंमलबजावणी करून भरीव निधीची तरतूद केली आहे. जिल्ह्यात कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे लक्ष्य कालबद्ध वेळेत पूर्ण करून या योजनांचा लाभ तालुकानिहाय अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवितानाच सिंचन व अन्य योजनांना रचनात्मक स्वरूप देवून शेतकऱ्यांच्या उत्थानाकरिता या योजा प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी कृषी विभागाच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.सदर आढावा बैठकीस कृषी विभागाचे उपसंचालक घावटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हसनावदे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी देशमुख, जि.प.चे कार्यकारी अभियंता (सिंचाई) सहारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी देशपांडे या अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीस भाजपाचे जेष्ठ नेते विजय राऊत, जिल्हा सचिव राहुल सराफ, तुळशीराम श्रीराम, नरेंद्र जीवतोडे, राजू घरोटे, राजू येले, महेश देवकाते, अ‍ॅड. प्रशांत घरोटे, विजय पिदुरकर, दिनकर पावडे, शेख जुम्मन रिझवी उपस्थित होते.सदर आढावा बैठक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार योजना, केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, मागेल त्याला शेततळे, बोडी, जिल्ह्यातील डब्ल्यू १६ मेगा पाणलोट व डब्ल्यूजीएएम २ मेगा पाणलोट, मृदा संधारण, कुकूटपालन, मधुमक्षिकापालन, सौर दिवे, सौर पथदिवे, कृषी साहित्य, प्रेरक प्रवेश उपक्रम आदी योजनांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विकास कामाची माहिती आकडेवारीनुसार सादर करण्यात आली.यावेळी खरीप व रब्बी हंगामानंतर उपलब्ध खत साठ्याचा आढावा, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतानाच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ सर्वव्यापी होण्याकरिता मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. लक्षांकापेक्षा जास्त आलेल्या अनेक कागदपत्रांची मागणी केली जाते. त्यामध्ये सुकरता येण्याकरिता व या योजनेचा लाभ परिवारातील सदस्यांना मिळण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना ना. अहीर यांनी दिल्या. (नगर प्रतिनिधी)