शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बहिष्कार मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:27 IST

चिखलगाव ते लाडजदरम्यानच्या नदीपात्रावर पूल कम बंधारा बांधण्याची मागणी दोन्ही गावातील गावकरी मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे लाडज-चिखलगाववासीयांनी मागणी पूर्ण झाली नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देलाडज, चिखलगाववासी निर्णयावर ठाम

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : चिखलगाव ते लाडजदरम्यानच्या नदीपात्रावर पूल कम बंधारा बांधण्याची मागणी दोन्ही गावातील गावकरी मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे लाडज-चिखलगाववासीयांनी मागणी पूर्ण झाली नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.तालुक्यातील लाडज हे गाव तालुका १२ किमी अंतरावर असून वैनगंगा नदीने या गावाला चारही बाजूंनी वेढले असल्याने सदर गावाला ‘बेटाचे’ स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील शेतजमीन वैनगंगा नदीच्या पुरामुळे अत्यंत सुपीक झाली असून भाजीपाल्याची बाजारपेठ म्हणून लाडज तालुक्यात प्रसिद्ध आहे.या गावाची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने १९८० मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील ‘गांधीनगर’ याठिकाणी पुनर्वसन केले. पुनर्वसनाच्या वेळी जवळपास तीनशे कुटुंब गांधीनगर येथे स्थलांतरित झाले. परंतु काही लोकांनी स्थलांतरित न होण्याची भूमिका घेतली. त्यामुळे या गावाचे पुर्णपणे पुनर्वसन झाले नाही. सद्यस्थितीत या गावाची लोकसंख्या १३३५ असून १ ते ७ पर्यंत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुरू आहे. २०१२ मध्ये २५ लाख रुपयांचा निधी रस्ता दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार १३०० मीटर रस्त्याचे खडीकरण झाले. आजपर्यंत ६०-७० लाख रुपयांचे सिमेंटचे रस्ते या गावात बांधण्यात आले आहे. या गावात ९६७ हेक्टर सुपीक जमीन असून लाडज, चिखलगाव, सोंद्री, सुरबोडी, पिंपळगाव (भो) या गावातील नागरिकांच्या शेतजमिनी याठिकाणी आहेत. जर शासन लाडजवासीयांना १९८०मध्ये पुनर्वसन होऊनसुद्धा एवढया मोठया प्रमाणावर सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहे तर मग चिखलगाव ते लाडज या नदीपात्रात तीनशे मीटर अंतराचा पूल-कम-बंधारा का बांधून देत नाही, असा संतप्त सवाल लाडज, चिखलगाव येथील नागरिक करीत आहेत. त्यामुळे लाडज-चिखलगाववासीयांनी लोकसभा निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन या महत्वपूर्ण समस्येकडे शासनाचे लक्ष वेधून घेतलेग्रामस्थांसोबत घेतली बैठकनिवडणुकीवर बहिष्कार टाकू नये, यासाठी गावकऱ्यांची समजूत घालण्यासाठी ब्रम्हपुरीचे तहसीलदार विद्यासागर चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन गावकऱ्यांना बहिष्कार मागे घेण्याची विनंती करून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचा आग्रह धरला. परंतु येथील नागरिक बहिष्काराच्या भूमिकेवर ठाम आहेत. जोपर्यंत पूल-कम-बंधारा बांधून देण्यासाठी मंजुरी मिळाल्याचे दस्तऐवज शासनाकडून मिळत नाही. तोपर्यंत बहिष्कार सुरूच ठेवण्याचा निर्णय दोन्ही गावातील नागरिकांनी केला आहे.