शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

बहिष्कार मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:27 IST

चिखलगाव ते लाडजदरम्यानच्या नदीपात्रावर पूल कम बंधारा बांधण्याची मागणी दोन्ही गावातील गावकरी मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे लाडज-चिखलगाववासीयांनी मागणी पूर्ण झाली नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देलाडज, चिखलगाववासी निर्णयावर ठाम

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : चिखलगाव ते लाडजदरम्यानच्या नदीपात्रावर पूल कम बंधारा बांधण्याची मागणी दोन्ही गावातील गावकरी मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे लाडज-चिखलगाववासीयांनी मागणी पूर्ण झाली नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.तालुक्यातील लाडज हे गाव तालुका १२ किमी अंतरावर असून वैनगंगा नदीने या गावाला चारही बाजूंनी वेढले असल्याने सदर गावाला ‘बेटाचे’ स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील शेतजमीन वैनगंगा नदीच्या पुरामुळे अत्यंत सुपीक झाली असून भाजीपाल्याची बाजारपेठ म्हणून लाडज तालुक्यात प्रसिद्ध आहे.या गावाची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने १९८० मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील ‘गांधीनगर’ याठिकाणी पुनर्वसन केले. पुनर्वसनाच्या वेळी जवळपास तीनशे कुटुंब गांधीनगर येथे स्थलांतरित झाले. परंतु काही लोकांनी स्थलांतरित न होण्याची भूमिका घेतली. त्यामुळे या गावाचे पुर्णपणे पुनर्वसन झाले नाही. सद्यस्थितीत या गावाची लोकसंख्या १३३५ असून १ ते ७ पर्यंत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुरू आहे. २०१२ मध्ये २५ लाख रुपयांचा निधी रस्ता दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार १३०० मीटर रस्त्याचे खडीकरण झाले. आजपर्यंत ६०-७० लाख रुपयांचे सिमेंटचे रस्ते या गावात बांधण्यात आले आहे. या गावात ९६७ हेक्टर सुपीक जमीन असून लाडज, चिखलगाव, सोंद्री, सुरबोडी, पिंपळगाव (भो) या गावातील नागरिकांच्या शेतजमिनी याठिकाणी आहेत. जर शासन लाडजवासीयांना १९८०मध्ये पुनर्वसन होऊनसुद्धा एवढया मोठया प्रमाणावर सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहे तर मग चिखलगाव ते लाडज या नदीपात्रात तीनशे मीटर अंतराचा पूल-कम-बंधारा का बांधून देत नाही, असा संतप्त सवाल लाडज, चिखलगाव येथील नागरिक करीत आहेत. त्यामुळे लाडज-चिखलगाववासीयांनी लोकसभा निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन या महत्वपूर्ण समस्येकडे शासनाचे लक्ष वेधून घेतलेग्रामस्थांसोबत घेतली बैठकनिवडणुकीवर बहिष्कार टाकू नये, यासाठी गावकऱ्यांची समजूत घालण्यासाठी ब्रम्हपुरीचे तहसीलदार विद्यासागर चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन गावकऱ्यांना बहिष्कार मागे घेण्याची विनंती करून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचा आग्रह धरला. परंतु येथील नागरिक बहिष्काराच्या भूमिकेवर ठाम आहेत. जोपर्यंत पूल-कम-बंधारा बांधून देण्यासाठी मंजुरी मिळाल्याचे दस्तऐवज शासनाकडून मिळत नाही. तोपर्यंत बहिष्कार सुरूच ठेवण्याचा निर्णय दोन्ही गावातील नागरिकांनी केला आहे.