शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बहिष्कार मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:27 IST

चिखलगाव ते लाडजदरम्यानच्या नदीपात्रावर पूल कम बंधारा बांधण्याची मागणी दोन्ही गावातील गावकरी मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे लाडज-चिखलगाववासीयांनी मागणी पूर्ण झाली नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देलाडज, चिखलगाववासी निर्णयावर ठाम

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : चिखलगाव ते लाडजदरम्यानच्या नदीपात्रावर पूल कम बंधारा बांधण्याची मागणी दोन्ही गावातील गावकरी मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे लाडज-चिखलगाववासीयांनी मागणी पूर्ण झाली नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.तालुक्यातील लाडज हे गाव तालुका १२ किमी अंतरावर असून वैनगंगा नदीने या गावाला चारही बाजूंनी वेढले असल्याने सदर गावाला ‘बेटाचे’ स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील शेतजमीन वैनगंगा नदीच्या पुरामुळे अत्यंत सुपीक झाली असून भाजीपाल्याची बाजारपेठ म्हणून लाडज तालुक्यात प्रसिद्ध आहे.या गावाची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने १९८० मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील ‘गांधीनगर’ याठिकाणी पुनर्वसन केले. पुनर्वसनाच्या वेळी जवळपास तीनशे कुटुंब गांधीनगर येथे स्थलांतरित झाले. परंतु काही लोकांनी स्थलांतरित न होण्याची भूमिका घेतली. त्यामुळे या गावाचे पुर्णपणे पुनर्वसन झाले नाही. सद्यस्थितीत या गावाची लोकसंख्या १३३५ असून १ ते ७ पर्यंत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुरू आहे. २०१२ मध्ये २५ लाख रुपयांचा निधी रस्ता दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार १३०० मीटर रस्त्याचे खडीकरण झाले. आजपर्यंत ६०-७० लाख रुपयांचे सिमेंटचे रस्ते या गावात बांधण्यात आले आहे. या गावात ९६७ हेक्टर सुपीक जमीन असून लाडज, चिखलगाव, सोंद्री, सुरबोडी, पिंपळगाव (भो) या गावातील नागरिकांच्या शेतजमिनी याठिकाणी आहेत. जर शासन लाडजवासीयांना १९८०मध्ये पुनर्वसन होऊनसुद्धा एवढया मोठया प्रमाणावर सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहे तर मग चिखलगाव ते लाडज या नदीपात्रात तीनशे मीटर अंतराचा पूल-कम-बंधारा का बांधून देत नाही, असा संतप्त सवाल लाडज, चिखलगाव येथील नागरिक करीत आहेत. त्यामुळे लाडज-चिखलगाववासीयांनी लोकसभा निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन या महत्वपूर्ण समस्येकडे शासनाचे लक्ष वेधून घेतलेग्रामस्थांसोबत घेतली बैठकनिवडणुकीवर बहिष्कार टाकू नये, यासाठी गावकऱ्यांची समजूत घालण्यासाठी ब्रम्हपुरीचे तहसीलदार विद्यासागर चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन गावकऱ्यांना बहिष्कार मागे घेण्याची विनंती करून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचा आग्रह धरला. परंतु येथील नागरिक बहिष्काराच्या भूमिकेवर ठाम आहेत. जोपर्यंत पूल-कम-बंधारा बांधून देण्यासाठी मंजुरी मिळाल्याचे दस्तऐवज शासनाकडून मिळत नाही. तोपर्यंत बहिष्कार सुरूच ठेवण्याचा निर्णय दोन्ही गावातील नागरिकांनी केला आहे.