कुचना : समाजातील मूल्ये खूप खालावत असून माणूस हा फक्त डॉक्टर, इंजिनिअर, उद्योगपती घडवत आहे. मात्र माणूस घडविण्यात आपले शिक्षण कमी पडत आहे. राष्ट्रसंतांना समाज घडविण्यासाठी गरजेचा असणारा प्रामाणिक, निर्व्यसनी, समाजसेवी विचार असलेला माणूस हा ग्रामगीतेच्या विचारातूनच तयार होईल, आदर्श समाज व्यवस्था तयार होऊ शकेल. खरे रामराज्य या भूतलावर अवतरित होईल, असे विचार मोझरी गुरुकुल आश्रमाचे प्रमुख रावीदादा मानव यांनी व्यक्त केले.
पाटाळा येथे राष्ट्रसंतांच्या पवित्र ग्रामगीता तत्त्वज्ञानाच्या भक्तिमय वातावरणात संत जगन्नाथ बाबा मंदिर येथे अश्विनी अंकुशराव आगलावे हिचा वाढदिवस आदर्श पद्धतीने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला हारार्पण. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामगीता प्रसारक सेवकराम मिलमिले, गमे गुरुजी, नरेंद्र जीवतोडे, अर्चना जीवतोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी तालुक्यातील गुरुदेव भजन मंडळ तसेच नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचा ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला. गाव आदर्श करण्याचा संकल्प करण्यात आला.