शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

ब्रह्मपुरीतील कुक्कुसापासून तयार केलेले खाद्यतेल देशात दुसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2022 14:16 IST

धानापासून तांदूळ तयार करताना कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या कुक्कुसात काही टक्के तेलाचे प्रमाण असते. या कुक्कुसापासून तयार होणारे खाद्यतेल (rice bran oil) मानवी आरोग्याला पोषक असून त्याला भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे.

ठळक मुद्देचंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

दत्तात्रय दलाल

चंद्रपूर : शैक्षाणिक नगरी अशी ओळख असलेल्या ब्रह्मपुरी शहरातून अनेक दिग्गज निर्माण झाले आहेत. त्यात आता मानाचा नवा तुरा येथील रामदेवबाबा साल्वंट प्रा. लिमिटेडने रोवला आहे. देशातील राइस ब्रॅन्ड खाद्यतेल बनविण्यात उच्च प्रतीचे खाद्यतेल म्हणून तुलसी राइस ब्रॅन्ड खाद्य तेलाचा देशात दुसरा क्रमांक लागलेला आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी शहराची औद्योगिक नगरी म्हणून नवी ओळख निर्माण झाली आहे.

ब्रह्मपुरी शहराची महाराष्ट्रात विविध कारणांनी एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. उच्चशिक्षित होऊन अनेक दिग्गज या भूमीत निर्माण झाले आहेत. शहरात तसेच तालुक्यात मोठ्या राइस मिल आहेत. पूर्वी धान भरडाई केल्यानंतर शिल्लक कुक्कुस जनावरांचा चारा म्हणून वापरला जात होता. काही वर्षांपूर्वी येथील रामदेवबाबा साल्वंट प्रा. लिमिटेडने कुक्कुसापसून तुलसी खाद्य तेल तयार करण्याला सुरुवात केली. महाराष्ट्रात एकमेव राइस ब्रॅन्ड तेल निर्माण करणारी ही कंपनी आहे.

दररोज १०० मेट्रिक टन उत्पादन

ब्रह्मपुरी येथे दररोज शंभर मेट्रिक टन खाद्य तेलाचे उत्पादन घेण्यात येते. तर नागपूर जिल्ह्यात मोहदा येथे दुसरा कारखाना निर्माण केला आहे. त्यातही कुक्कुसावर प्रक्रिया करून शंभर मेट्रिक टन तुलसी खाद्य तेल तयार करण्यात येते.

५०० हून अधिक नागरिकांना मिळाला रोजगार

कुक्कुसावर प्रक्रिया करून तेल तयार करण्यात येत असल्याने धानाला जास्त दर मिळतो. विदर्भातील कुक्कस छत्तीसगड राज्यात जात होता. त्यामुळे जास्त किराया द्यावा लागत होता. आता मात्र, विदर्भातील शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. या कंपनीत स्थानिक पाचशेहून अधिक नागरिकांना रोजगार मिळालेला आहे. मागील सप्टेंबर महिन्यात एका कार्यक्रमात कुकुसापासून उच्च प्रतीचे राइस ब्रॅन्ड तुलसी खाद्य तेल बनविणारी भारतात दुसऱ्या क्रमांकाची कंपनी म्हणून गोवा ( पणजी) येथे गौरव करण्यात आला.

भारत आयात खाद्यतेलावर अवलंबून आहे. ते कमी करण्यासाठी मेड इन इंडिया या तत्त्वाला अनुसरून भारतातच उच्च प्रतीच्या कुक्कुसावर प्रक्रिया करून खाद्यतेल निर्मिती करण्यात येते. मागील सात वर्षांपासून कुक्कुसावर प्रक्रिया करून खाद्यतेल निर्मिती करण्यात येत आहे. हे तेल छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांत निर्यात करण्यात येते.

- नीलेश मोहता, संचालक, रामदेवबाबा साल्वंट प्रा. लिमिटेड, ब्रह्मपुरी

टॅग्स :businessव्यवसाय