शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ब्रह्मपुरीतील कुक्कुसापासून तयार केलेले खाद्यतेल देशात दुसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2022 14:16 IST

धानापासून तांदूळ तयार करताना कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या कुक्कुसात काही टक्के तेलाचे प्रमाण असते. या कुक्कुसापासून तयार होणारे खाद्यतेल (rice bran oil) मानवी आरोग्याला पोषक असून त्याला भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे.

ठळक मुद्देचंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

दत्तात्रय दलाल

चंद्रपूर : शैक्षाणिक नगरी अशी ओळख असलेल्या ब्रह्मपुरी शहरातून अनेक दिग्गज निर्माण झाले आहेत. त्यात आता मानाचा नवा तुरा येथील रामदेवबाबा साल्वंट प्रा. लिमिटेडने रोवला आहे. देशातील राइस ब्रॅन्ड खाद्यतेल बनविण्यात उच्च प्रतीचे खाद्यतेल म्हणून तुलसी राइस ब्रॅन्ड खाद्य तेलाचा देशात दुसरा क्रमांक लागलेला आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी शहराची औद्योगिक नगरी म्हणून नवी ओळख निर्माण झाली आहे.

ब्रह्मपुरी शहराची महाराष्ट्रात विविध कारणांनी एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. उच्चशिक्षित होऊन अनेक दिग्गज या भूमीत निर्माण झाले आहेत. शहरात तसेच तालुक्यात मोठ्या राइस मिल आहेत. पूर्वी धान भरडाई केल्यानंतर शिल्लक कुक्कुस जनावरांचा चारा म्हणून वापरला जात होता. काही वर्षांपूर्वी येथील रामदेवबाबा साल्वंट प्रा. लिमिटेडने कुक्कुसापसून तुलसी खाद्य तेल तयार करण्याला सुरुवात केली. महाराष्ट्रात एकमेव राइस ब्रॅन्ड तेल निर्माण करणारी ही कंपनी आहे.

दररोज १०० मेट्रिक टन उत्पादन

ब्रह्मपुरी येथे दररोज शंभर मेट्रिक टन खाद्य तेलाचे उत्पादन घेण्यात येते. तर नागपूर जिल्ह्यात मोहदा येथे दुसरा कारखाना निर्माण केला आहे. त्यातही कुक्कुसावर प्रक्रिया करून शंभर मेट्रिक टन तुलसी खाद्य तेल तयार करण्यात येते.

५०० हून अधिक नागरिकांना मिळाला रोजगार

कुक्कुसावर प्रक्रिया करून तेल तयार करण्यात येत असल्याने धानाला जास्त दर मिळतो. विदर्भातील कुक्कस छत्तीसगड राज्यात जात होता. त्यामुळे जास्त किराया द्यावा लागत होता. आता मात्र, विदर्भातील शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. या कंपनीत स्थानिक पाचशेहून अधिक नागरिकांना रोजगार मिळालेला आहे. मागील सप्टेंबर महिन्यात एका कार्यक्रमात कुकुसापासून उच्च प्रतीचे राइस ब्रॅन्ड तुलसी खाद्य तेल बनविणारी भारतात दुसऱ्या क्रमांकाची कंपनी म्हणून गोवा ( पणजी) येथे गौरव करण्यात आला.

भारत आयात खाद्यतेलावर अवलंबून आहे. ते कमी करण्यासाठी मेड इन इंडिया या तत्त्वाला अनुसरून भारतातच उच्च प्रतीच्या कुक्कुसावर प्रक्रिया करून खाद्यतेल निर्मिती करण्यात येते. मागील सात वर्षांपासून कुक्कुसावर प्रक्रिया करून खाद्यतेल निर्मिती करण्यात येत आहे. हे तेल छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांत निर्यात करण्यात येते.

- नीलेश मोहता, संचालक, रामदेवबाबा साल्वंट प्रा. लिमिटेड, ब्रह्मपुरी

टॅग्स :businessव्यवसाय