शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाला उदासीनतेचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 05:00 IST

१९८९ ते  १९९२ दरम्यान प्रकल्पाच्या मुख्य भिंतीचे काम करण्यात आले. १९९३ ला प्रत्यक्षात पाणी संचयनास सुरुवात झाली. या प्रकल्पातून इंजापूर व लोणीकडे जाणारे दोन मुख्य कालवे तर अनेक शेती सिंचन कालवे काढण्यात आले. आजघडीला मुख्य कालवे सुस्थितीत असले तरी शेती सिंचन कालव्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या बांधावर बऱ्याच ठिकाणी पाणी पोहोचत नाही. या कारणाने धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती निर्माण झालेली आहे.

जयंत जेनेकरलोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यातील पकडीगुड्डम सिंचन प्रकल्प हा शेती सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणारा प्रकल्प आहे. मात्र या प्रकल्पाकडे शासनाच्या उदासीन धोरणामुळे दुर्लक्ष होत आहे.सदर सिंचन प्रकल्प माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी व कोरपना - जिवती तालुक्याच्या अगदी सिमारेषेला लागलेला आहे. हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य आहे. या प्रकल्पाला १९८० च्या दशकात तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री कमलनाथ यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली होती. १९८९ ते  १९९२ दरम्यान प्रकल्पाच्या मुख्य भिंतीचे काम करण्यात आले. १९९३ ला प्रत्यक्षात पाणी संचयनास सुरुवात झाली. या प्रकल्पातून इंजापूर व लोणीकडे जाणारे दोन मुख्य कालवे तर अनेक शेती सिंचन कालवे काढण्यात आले. आजघडीला मुख्य कालवे सुस्थितीत असले तरी शेती सिंचन कालव्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या बांधावर बऱ्याच ठिकाणी पाणी पोहोचत नाही. या कारणाने धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती निर्माण झालेली आहे. प्रस्तावित प्रकल्पानूसार ११.०७ दलघमी जल संचयन अपेक्षित असताना. प्रकल्प निर्मितीदरम्यान पूर्णता खोलीकरण व सपाटीकरण आदी कामे करण्यात न आल्याने प्रत्यक्षात ७ दलघमी जलसंचय होत असल्याची माहिती आहे. यामधून ३.०३ वाणिज्य वापराकरिता अंबूजा सिमेंट , ०.५३ सोनूर्ली पाणीपुरवठा योजना यांना आरक्षित आहे.  २९६८ हेक्टर शेती क्षेत्रावर जलसिंचन अपेक्षित असताना हजार हेक्टरच्या वर शेती सिंचन होत नाही.कारगाव, पिपरडा, कुसळ, धानोली, वनसडी, दहेगाव रिठ, चिंचखोड रिठ , खैरगाव रिठ , सोनूर्ली, चिंचोली, बेलगाव, वडगाव , खिरडी, पाकडहीरा, इंजापूर , लोणी आदी गावाजवळील शेती सिंचन कालवे बुजले गेले असल्याने  मोजक्याच शेतांना याचा फायदा होतो. त्यामुळे सिंचन कालव्याची दुरुस्ती , नवीन कालव्याची निर्मिती, तलाव खोलीकरण, सपाटीकरण,  वेस्टवेअर दुरुस्ती, प्रकल्प उंची वाढविणे आदी आवश्यक आहे. तसेच प्रकल्प स्थानी प्रकल्पाच्या माहिती संदर्भात माहिती फलक ही लावणे लोक माहितीच्या दृष्टीने गरजेचे आहे.

प्रकल्पाचे कार्यालय गडचांदूरला पकडीगुड्डम मध्यम सिंचन प्रकल्पाचे शाखा कार्यालय वनसडी किंवा कोरपना येथे असणे अपेक्षित असताना गडचांदूर येथे आहे. त्यामुळे अमलनाला व पकडीगुड्डम दोन्ही प्रकल्पांचे काम एकाच ठिकाणाहून पाहिले जाते. परिणामी प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. प्रकल्पाचा कारभार सांभाळणे हे उंटावरून शेळ्या हाकण्यासारखे होते आहे. या कारणाने हे कार्यालय रिक्त पदे भरून कोरपना येथे सनियंत्रणासाठी हलवण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सदनिकांची होतेय दुर्दशापकडीगुड्डम सिंचन प्रकल्पासाठी सोनुली येथे सदनिका बांधण्यात आल्या. मात्र प्रकल्प निर्मितीपासून या सदनिकांत कुठलाही कर्मचारी वास्तव्यास न आल्याने दुरवस्थेकडे वाटचाल करत आहे. इमारतींची बरीच नासधुस झाली आहे. या सदनिका इतर विभागांच्या कामासाठी किंवा गरजूंना देऊन उपयोगात आणाव्यात, अशी मागणी होत आहे.

पर्यटनदृष्ट्याही उपेक्षाच पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाला पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त आहे; मात्र या स्थानी पर्यटनविषयक कुठल्याही सोयी-सुविधा निर्माण करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. यास्थानी बागबगीचा तयार करून बोटिंग आदी पर्यटन सुविधा करावी, अशी अपेक्षा पर्यटकांकडून व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प