शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

कार्यालयात सुरू करणार ई मॉनिटरिंग सर्व्हिस

By admin | Updated: May 20, 2016 01:07 IST

कार्यलयीन वेळेत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पोहचतात अथवा नाही, शासकीय कामासाठी कोण बाहेर आहे...

नव्या जिल्हाधिकाऱ्यांची योजना : रिकाम्या खुर्च्यांवर चापचंद्रपूर : कार्यलयीन वेळेत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पोहचतात अथवा नाही, शासकीय कामासाठी कोण बाहेर आहे हे एका क्लिकवर बघता यावे यासाठी ‘मॉनेटरिंग ई सर्व्हिस’ सुरू करण्याचा मनोदय जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्या दिसणे योग्य नाही. बरेचदा दौऱ्याच्या नावाखाली काही कर्मचारी दांडी मारतात. त्यावर उपाय म्हणून ई मॉनिटरिंग सर्व्हिस सुरू करण्याचा विचार आहे. या माध्यमातून प्रत्येक तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती केवळ जिल्हाधिकारी कार्यालयालाच नाही तर वरीष्ठ अधिकाऱ्यांनाही बघता येईल, अशी व्यवस्था असेल. त्यातून कर्मचाऱ्यांच्या येण्याजाण्याच्या वेळांवर नियंत्रण राखले जाईल.जिल्ह्यातील दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी योजना विचारल्या असता जिल्हाधिकारी म्हणाले, दारूबंदी ही सक्तीने न करता मनपरिवर्तनातून केली जाणारी बाब आहे. त्यासाठी अधिकाधिक जनसहभाग घेतला जाईल. आपण ज्या जिल्ह्यातून आलो त्या ठिकाणीही दारूबंदी आहे. मात्र चंद्रपूरच्या दारूबंदीला अवघे एक वर्ष झाले आहे. त्यामुळे सकारात्मकपणे करता येण्यासारखे येथे बरेच काही आहे. कायद्यांच्या योग्य वापरासोबतच जनसहभागाच्या योजना राबवून या अंमलबजावणीत यश गाठण्याचा आपण प्रयत्न करू.निकाल लागल्यानंतर जात प्रमाणपत्र मिळविताना विद्यार्थी आणि पालकांची होणारी दमछाक जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास पत्रकारांनी आणून दिली. त्यावर ते म्हणाले, तहसील स्तरावर यासाठी विशेष कक्ष उभारण्याचा मानस आहे. जाती प्रमाणपत्र देताना अधिकाऱ्यांनी दहावीच्या गुणपत्रिकेची अट न घालण्यासंदर्भात आपण लक्ष घालू. निकाल लागल्यावर धावपळ करण्यापेक्षा पालकांनी आधीच प्रमाणपत्रे मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली तर यंत्रणेवरील अर्धा ताण कमी होईल. जिल्ह्यातील वाहतूक तसेच प्रदुषण नियंत्रणासंदर्भात योग्य दखल घेण्यासोबतच प्रदुषण नियंत्रण मंडळाला कामी लावले जाईल. उद्योग व्यवस्थापन, वेकोलि, वाहतुकदार संघटना, परिवहन विभाग या सह अन्य विभागांना सोबत घेवून काम करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)