शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयातील धूळ होणार साफ

By admin | Updated: October 1, 2014 23:19 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासकीय कार्यालयांना पत्र मिळताच कार्यालयातील धूळ साफ होऊ लागली आहे. मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या अनेक फाईल आता

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासकीय कार्यालयांना पत्र मिळताच कार्यालयातील धूळ साफ होऊ लागली आहे. मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या अनेक फाईल आता स्वच्छ होणार असून गांधी जयंतीपासून या कार्याला गती येणार आहे. विशेष म्हणजे, कर्मचारी स्वच्छतेसाठी शपथ घेणार आहे. त्यानंतर श्रमदान करून प्रत्येक दिवशी दोन तास स्वच्छतेसाठी देणार आहे.स्वच्छता अभियानांतर्गत आठ बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यात कर्मचारी स्वत: प्रत्येक दिवशी दोन तास श्रमदान करणार आहे. प्रत्येकांनी श्रमदान करून स्वच्छता कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंतीही पत्रात करण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्येकांनी किमान १०० जणांना स्वच्छतेसाठी प्रेरित करण्याचा संकल्प करण्याचे सांगण्यात आले आहे. राज्याचे नगर विकास विकास मंत्रालयातून जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदेलाही पत्र मिळाले आहे. आॅक्टोबर महिन्याला स्वच्छता महिना घोषित करण्यात आले आहे.नगर विकास मंत्रालयातून जिल्हा परिषदेला मिळालेल्या पत्रानुसार २ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत सदर अभियान सुरु ठेवण्यात येणार आहे. प्रथम महात्मा गांधी जयंतीनिमित्त सर्वांना शपथ घ्यायची आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेतील अधिकारी या कामाला लागले असून सदर काम जोमाने करू, असे मत मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांनी व्यक्त केले आहे. याव्यतिरिक्त सर्व पंचायत समिती तसेच ग्राम पंचायतस्तरावरही स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)