शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

कार्यालयातील धूळ होणार साफ

By admin | Updated: October 1, 2014 23:19 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासकीय कार्यालयांना पत्र मिळताच कार्यालयातील धूळ साफ होऊ लागली आहे. मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या अनेक फाईल आता

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासकीय कार्यालयांना पत्र मिळताच कार्यालयातील धूळ साफ होऊ लागली आहे. मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या अनेक फाईल आता स्वच्छ होणार असून गांधी जयंतीपासून या कार्याला गती येणार आहे. विशेष म्हणजे, कर्मचारी स्वच्छतेसाठी शपथ घेणार आहे. त्यानंतर श्रमदान करून प्रत्येक दिवशी दोन तास स्वच्छतेसाठी देणार आहे.स्वच्छता अभियानांतर्गत आठ बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यात कर्मचारी स्वत: प्रत्येक दिवशी दोन तास श्रमदान करणार आहे. प्रत्येकांनी श्रमदान करून स्वच्छता कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंतीही पत्रात करण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्येकांनी किमान १०० जणांना स्वच्छतेसाठी प्रेरित करण्याचा संकल्प करण्याचे सांगण्यात आले आहे. राज्याचे नगर विकास विकास मंत्रालयातून जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदेलाही पत्र मिळाले आहे. आॅक्टोबर महिन्याला स्वच्छता महिना घोषित करण्यात आले आहे.नगर विकास मंत्रालयातून जिल्हा परिषदेला मिळालेल्या पत्रानुसार २ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत सदर अभियान सुरु ठेवण्यात येणार आहे. प्रथम महात्मा गांधी जयंतीनिमित्त सर्वांना शपथ घ्यायची आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेतील अधिकारी या कामाला लागले असून सदर काम जोमाने करू, असे मत मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांनी व्यक्त केले आहे. याव्यतिरिक्त सर्व पंचायत समिती तसेच ग्राम पंचायतस्तरावरही स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)