शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
2
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
3
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
4
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
5
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
6
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
7
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
8
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
9
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
10
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
11
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
12
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
13
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
14
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
15
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
16
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
17
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
18
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
19
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
20
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
Daily Top 2Weekly Top 5

कोळशाच्या धुळीने पांढरे सोने काळवंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:52 IST

कोळशाच्या धुळीने पांढरे सोने पूर्णत: काळवंडले असल्याने कापूस वेचणी करायला मजूर येत नाही. परिणामी, कापूस शेतकऱ्यांना नाईलाजाने झाडावरच ठेवावा लागत आहे.

ठळक मुद्देकापसाची प्रतवारी घसरली : शेतकºयांना बसतोय आर्थिक भुर्दंड

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कोळशाच्या धुळीने पांढरे सोने पूर्णत: काळवंडले असल्याने कापूस वेचणी करायला मजूर येत नाही. परिणामी, कापूस शेतकऱ्यांना नाईलाजाने झाडावरच ठेवावा लागत आहे. कोळशाच्या काळ्या धुळीने कापसाची प्रत घसरली असून कवडीमोल भावात हे पांढरे सोने विकावे लागत आहे.राजुरा तालुका प्रदूषणात अग्रेसर आहे. तालुक्यात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव परिसरात नेहमीच कोळशाचा धुराळा उडत असतो. या परिसरात कोळसा खाणी असल्याने पांढरे सोने समजले जाणारे कापसाचे पीक पूर्णत: काळे पडले आहे. परिणामी, या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धुळीमुळे धोक्यात आले आहे.दिवसंरात्र सुरु असणारी जड वाहतूक व त्यापासून होणारे प्रदूषण हाही चिंतेचा विषय झाला आहे. याचे दुरगामी परिणाम परिसरातील जनतेला नेहमीच सहन करावे लागत आहे. यावर्षी कापसाला भाव नसल्याने शेतकºयांना कवडीमोल दरात आपला कापूस विकावा लागत आहे. हे शेतकºयांचे धगधगते वास्तव असताना कोळशाच्या धुळीने कापूस पीक पूर्णत: काळे पडले आहे. अशा कापसाला बाजारपेठेत कवडीमोल दर दिला जातो. त्याचा सारा आर्थिक भुर्दंड शेतकºयांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून सरकारने आता शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.प्रदूषणाल आळा घालणार कोण ?प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. चंद्रपूर जिल्हा प्रदूषणात अग्रेसर असताना येथील नागरिकांच्या जीवाला प्रदूषणाने धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील शेतीही प्रदूषणाने धोक्यात आली असून याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांत रोष पसरला आहे.काळा कापूस वेचायला मजूर सापडेनाकोळसा खाण परिसर व रस्त्याच्या दुर्तफा असणारी शेती कोळशाच्या धुळीने पूर्णत: माखली आहे. सध्या शेतात कापसाचे पीक उभे आहे. परंतु कोळशाच्या धुळीने कापूस काळा पडल्याने असा काळा कापूस वेचायला मजूर येत नसल्याने कापूस अजूनही झाडावरच लोंबकळत आहे.