शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

कोळशाच्या धुळीने पांढरे सोने काळवंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:52 IST

कोळशाच्या धुळीने पांढरे सोने पूर्णत: काळवंडले असल्याने कापूस वेचणी करायला मजूर येत नाही. परिणामी, कापूस शेतकऱ्यांना नाईलाजाने झाडावरच ठेवावा लागत आहे.

ठळक मुद्देकापसाची प्रतवारी घसरली : शेतकºयांना बसतोय आर्थिक भुर्दंड

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कोळशाच्या धुळीने पांढरे सोने पूर्णत: काळवंडले असल्याने कापूस वेचणी करायला मजूर येत नाही. परिणामी, कापूस शेतकऱ्यांना नाईलाजाने झाडावरच ठेवावा लागत आहे. कोळशाच्या काळ्या धुळीने कापसाची प्रत घसरली असून कवडीमोल भावात हे पांढरे सोने विकावे लागत आहे.राजुरा तालुका प्रदूषणात अग्रेसर आहे. तालुक्यात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव परिसरात नेहमीच कोळशाचा धुराळा उडत असतो. या परिसरात कोळसा खाणी असल्याने पांढरे सोने समजले जाणारे कापसाचे पीक पूर्णत: काळे पडले आहे. परिणामी, या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धुळीमुळे धोक्यात आले आहे.दिवसंरात्र सुरु असणारी जड वाहतूक व त्यापासून होणारे प्रदूषण हाही चिंतेचा विषय झाला आहे. याचे दुरगामी परिणाम परिसरातील जनतेला नेहमीच सहन करावे लागत आहे. यावर्षी कापसाला भाव नसल्याने शेतकºयांना कवडीमोल दरात आपला कापूस विकावा लागत आहे. हे शेतकºयांचे धगधगते वास्तव असताना कोळशाच्या धुळीने कापूस पीक पूर्णत: काळे पडले आहे. अशा कापसाला बाजारपेठेत कवडीमोल दर दिला जातो. त्याचा सारा आर्थिक भुर्दंड शेतकºयांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून सरकारने आता शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.प्रदूषणाल आळा घालणार कोण ?प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. चंद्रपूर जिल्हा प्रदूषणात अग्रेसर असताना येथील नागरिकांच्या जीवाला प्रदूषणाने धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील शेतीही प्रदूषणाने धोक्यात आली असून याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांत रोष पसरला आहे.काळा कापूस वेचायला मजूर सापडेनाकोळसा खाण परिसर व रस्त्याच्या दुर्तफा असणारी शेती कोळशाच्या धुळीने पूर्णत: माखली आहे. सध्या शेतात कापसाचे पीक उभे आहे. परंतु कोळशाच्या धुळीने कापूस काळा पडल्याने असा काळा कापूस वेचायला मजूर येत नसल्याने कापूस अजूनही झाडावरच लोंबकळत आहे.