शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

कोळशाच्या धुळीने पांढरे सोने काळवंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:52 IST

कोळशाच्या धुळीने पांढरे सोने पूर्णत: काळवंडले असल्याने कापूस वेचणी करायला मजूर येत नाही. परिणामी, कापूस शेतकऱ्यांना नाईलाजाने झाडावरच ठेवावा लागत आहे.

ठळक मुद्देकापसाची प्रतवारी घसरली : शेतकºयांना बसतोय आर्थिक भुर्दंड

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कोळशाच्या धुळीने पांढरे सोने पूर्णत: काळवंडले असल्याने कापूस वेचणी करायला मजूर येत नाही. परिणामी, कापूस शेतकऱ्यांना नाईलाजाने झाडावरच ठेवावा लागत आहे. कोळशाच्या काळ्या धुळीने कापसाची प्रत घसरली असून कवडीमोल भावात हे पांढरे सोने विकावे लागत आहे.राजुरा तालुका प्रदूषणात अग्रेसर आहे. तालुक्यात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव परिसरात नेहमीच कोळशाचा धुराळा उडत असतो. या परिसरात कोळसा खाणी असल्याने पांढरे सोने समजले जाणारे कापसाचे पीक पूर्णत: काळे पडले आहे. परिणामी, या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धुळीमुळे धोक्यात आले आहे.दिवसंरात्र सुरु असणारी जड वाहतूक व त्यापासून होणारे प्रदूषण हाही चिंतेचा विषय झाला आहे. याचे दुरगामी परिणाम परिसरातील जनतेला नेहमीच सहन करावे लागत आहे. यावर्षी कापसाला भाव नसल्याने शेतकºयांना कवडीमोल दरात आपला कापूस विकावा लागत आहे. हे शेतकºयांचे धगधगते वास्तव असताना कोळशाच्या धुळीने कापूस पीक पूर्णत: काळे पडले आहे. अशा कापसाला बाजारपेठेत कवडीमोल दर दिला जातो. त्याचा सारा आर्थिक भुर्दंड शेतकºयांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून सरकारने आता शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.प्रदूषणाल आळा घालणार कोण ?प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. चंद्रपूर जिल्हा प्रदूषणात अग्रेसर असताना येथील नागरिकांच्या जीवाला प्रदूषणाने धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील शेतीही प्रदूषणाने धोक्यात आली असून याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांत रोष पसरला आहे.काळा कापूस वेचायला मजूर सापडेनाकोळसा खाण परिसर व रस्त्याच्या दुर्तफा असणारी शेती कोळशाच्या धुळीने पूर्णत: माखली आहे. सध्या शेतात कापसाचे पीक उभे आहे. परंतु कोळशाच्या धुळीने कापूस काळा पडल्याने असा काळा कापूस वेचायला मजूर येत नसल्याने कापूस अजूनही झाडावरच लोंबकळत आहे.