शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाच्या कॅॅमेऱ्यांना बिबट्याची हुलकावणी

By admin | Updated: November 22, 2014 00:24 IST

येथून जवळच असलेल्या आणि बफर झोनमध्ये येत असलेल्या वायगावमध्ये बिबट्याची दहशत काही केल्या कमी झाली नाही.

चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या आणि बफर झोनमध्ये येत असलेल्या वायगावमध्ये बिबट्याची दहशत काही केल्या कमी झाली नाही. बिबट्यावर नजर ठेवण्यासाठी वनविभागाने ठिकठिकणी कॅमेरे लावले आहे. मात्र या कॅमेऱ्याची नजर चुकवून बिबट्या गावात प्रवेश करीत आहे. मागील दोन दिवसांमध्ये बिबट्याने कुत्रे आणि कोंबड्यावर ताव मारला आहे. एवढेच नाही तर, गुरांच्या गोठ्यात बिबट घुसला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे गोठ्यातून त्याला हुसकावण्यात यश आले आहे. दोन दिवसापूर्वी एका वासराचा बळी घेतल्यानंतर गावात दहशत आहे. वनविभागाने उपाययोजना सुरु केल्या आहे. मात्र त्या तुटपुंज्या असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.आदिवासीबहुल गाव म्हणून ओळख असलेल्या वायगावमध्ये बहुतांश नागरिकांकडे शेती आहे. शेती व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांना शेतात जाणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकांकडे मोठ्या संख्येने जनावरे तसेच कोंबड्या, कुत्रे आहे. मागील काही दिवसांपासून गाव परिसरात बिबट्याने अक्षरश: धुमाकूळ सुरु केला आहे.बिबट्याच्या दहशतीनंतर वनविभागाने काही ठिकाणी कॅमेरे लावले आहे. मात्र या कॅमेऱ्याचा कुठेच फायदा होत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावात वनविभागाने गस्त सुरु केली. मात्र १० वाजेपर्यंत वनकर्मचारी येथे राहत नसल्याचे समजते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नजरेत बिबट्या येत नाही. गावात काही ठिकाणी सौर दिवे लावण्यात आले आहे. मात्र ते झाडांच्या खाली लावण्यात आले आहे. त्यामुळे सूर्यप्रकाश पडत नसल्याने त्याचाही काही उपयोग होताना दिसत नाही. केवळ एक ते दोन तास प्रकाश पडल्यानंतर ते दिवेही बंद पडत आहे.विशेष म्हणजे, गावात शौचालयाची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे किमान वनविभागाने ग्रामस्थांना शौचालयाचे बांधकाम करून दिल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकते.वायगाव येथील माजी सरपंच विलास तोडासे म्हणाले, गाव परिसरात जंगल आहे. त्यामुळे नेहमी वन्यप्राण्यांचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागतो. त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना केल्यास काही प्रमाणात हा त्रास सुटू शकतो. वनविभागाने गावात सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या तसेच बिबट्याला पकडण्यासाठी पिंरजे लावावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या शेती हंगाम असतानाही वाघाच्या दहशतीमुळे अनेकांनी शेतात जाणे बंद केले आहे. दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढत आहे. आता तर, बिबट्याने गावात प्रवेश करणे सुरु केला आहे. मात्र वनविभागाने पाहिजे तशा उपाययोजना अद्यापही केल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.सौरदिवे कुचकामीगावातील काही रस्त्यांवर सौरदिवे लावण्यात आले आहे. मात्र सदर दिवे कुचकामी ठरत आहे. काही दिवे अगदी झाडाच्या खाली लावण्यात आल्याने त्यावर सूर्यप्रकाश पडत नाही परिणामी ते बंदच असते. तर काही दिवे रात्री १० ते ११ वाजेपर्यंत चालल्यानंतर तेही बंद पडते. त्यामुळे जेव्हा प्रकाशाची गरज असते तेव्हाच सौरदिवे बंद असल्याचे चित्र सध्या गावात आहे. त्यामुळे वन्यप्राणी गावात येत असले तरी नागरिकांना तसेच वनकर्मचाऱ्यांनाही दिसत नाही. (नगर प्रतिनिधी)