शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

सिंगलफेजमुळे पाण्याच्या टाक्या झाल्या ‘ड्राय’

By admin | Updated: June 8, 2014 23:47 IST

शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनासुद्धा शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे, याकरिता शासनाने ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत गाव खेड्यात योजना कार्यान्वित केल्या आहेत. गावातील नळाच्या टाक्या भरण्याकरिता

संजय वरघने - चिमूरशहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनासुद्धा शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे, याकरिता शासनाने ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत गाव खेड्यात योजना कार्यान्वित केल्या आहेत. गावातील नळाच्या टाक्या भरण्याकरिता दहा ते पंधरा तास थ्री फेज वीज पुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र सध्या चिमूर तालुक्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीद्वारे सिंगल फेज विद्युत पुरवठा होत असल्याने तालुक्यातील खंडसंगी, भिसी, शंकरपूर, नेरी, मासळ, मदनापूर, चिमूर, टेकेपार तथा इतरही गावातील पाण्याच्या टाक्या पाण्याविना ड्राय झाल्या आहेत. तर अनेक ग्रामीण भागात पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण होऊनसुद्धा शोभेच्या वस्तु बनल्या आहेत. अनेक गावात तांत्रिक अडचणीमुळे नळ योजना थंडबस्त्यात पडल्या आहेत. चिमूर तालुक्यात ९८ ग्रामपंचायती असून २६५ गावांचा समावेश आहे. ८२५ हातपंप सुरळीत सुरु असून १८ हातपंप नव्याने मंजूर आहे.  ६ नळ योजना दुरुस्तीसाठी मंजुरी मिळाली आहे. तालुक्यात पाणी टंचाईग्रस्त गावे नसल्यामुळे प्रत्येक गावात हातपंपाद्वारे पाणी पुरवठा होत आहे. फक्त तांत्रिक अडचण सिंगलफेज व विद्युत पुरवठा खंडीत या समस्येमुळे ग्रामीण भागामध्ये कमी प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत आहे. तालुक्यातील परिसरात बर्‍याच भागात पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त आहे. फ्लोराईडमुळे अनेक नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत होता. डायरीया या आजाराचे प्रमाण वाढले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकार्‍यांनी निवासी राहून या आजाराबाबत सेवा द्यावी.शासनाने ५६0 हातपंपाची दुरुस्ती केल्यामुळे व काही बिघाड आलेल्या हातपंपालाही दुरुस्ती सुरु असल्यामुळे तालुक्यात कोणत्याच गावाला पाण्याचा फटका बसला नाही. शहरासह ग्रामीण जनतेलाही स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, याकरिता शासनाने ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ वर्षाआधी नळ योजना सुरु केली. ही नळ योजना पूर्णत: विद्युतीकरणावर अवलंबून आहे. मात्र सध्या चिमूर वीज वितरण उपविभागाद्वारे मागील अनेक दिवसांपासून भारनियमनाचे नावाखाली सिंगलफेज विद्युत पुरवठा १८ तास करण्यात येत आहे. तर उर्वरित सहा तास थ्री फेज विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. तसेच भिसी परिसरात दोन दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा होत असून शुद्ध पाणी न मिळाल्यामुळे इथेही नागरिकांना दोन ते तीन किलोमीटर अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. चिमूर येथील ठक्कर वॉर्ड येथील नागरिकांना बारमाही पिण्याच्या पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर अंतरावरुन पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.नळ योजनेद्वारे पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पुन्हा विहिरीचे किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या आधार घ्यावा लागत आहे. खडसंगी परिसरात चंद्रपूर जिल्ह्यात फ्लोराईडच्या प्रमाणापेक्षाजास्त आहे. या फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या सबबीखाली शासनाने या गावांना नळ योजना दिली, त्या उद्देशाला वीज वितरण कंपनीच्या सिंगलफेजमुळे हरताळ फासला जात आहे.