शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिच्या कोळसा वाहतुकीमुळे रस्त्याची दैनावस्था

By admin | Updated: November 23, 2014 23:17 IST

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत नव्याने सुरु झालेल्या गोवरी डीप या कोळसा खाणीतून होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे राजुरा-गोवरी- कवठाळा मार्गावरील माथरा ते गोवरी दरम्यानचा रस्ता पूर्णत: उखडला आहे.

सास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत नव्याने सुरु झालेल्या गोवरी डीप या कोळसा खाणीतून होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे राजुरा-गोवरी- कवठाळा मार्गावरील माथरा ते गोवरी दरम्यानचा रस्ता पूर्णत: उखडला आहे. त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाणही वाढले असून वाहतूक करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत विविध कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणीमुळे तालुक्यातील नागरिकांना विविध समस्यांना तोड द्यावे लागते. त्यात प्रामुख्याने वेकोलिच्या उत्खननामुळे होणारे मातीचे मोठमोठे ढिगारे व त्यामुळे कृत्रिम पुराचा फटका, होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे बसणारे हादरे व त्यामुळे घरांना जाणारे तडे, वेकोलि परिसरात होणारे धुळीचे प्रदूषण, या प्रकारामुळे परिसरातील पिकांचेही नुकसान होत आहे.मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्खननामुळे परिसरातील पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यातच महत्वाची समस्या म्हणजे कोळसा खाणीतून केल्या जाणाऱ्या ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे होणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था. मोठ्या उत्पादनामुळे वेकोलिला फायदा होत असला तरी नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वेकोलि परिसरातून राजुरा- गोवरी- पोवनी- कवठाळा हा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरुन वेकोलिची मोठी कोळसा वाहतूक होते. परिसरातील माथरा, गोयेगाव, चिंचोली, साखरी, वरोडा, पेल्लोरा, चार्ली, निर्ली, धिडशी, कढोली, बाबापूर, मानोलीसह अनेक गावातील नागरिक या रस्त्याने वाहतूक करतात.वेकोलिच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे या मार्गाची नेहमीच दयनीय अवस्था असते. वेळोवेळी दुरुस्ती केली जाते. परंतु रस्ता कधीच चांगल्या स्थितीत नसतो. सध्या वेकोलिच्या गोवारी डीप या नव्या कोळसा खाणीमुळे या मार्गावरील माथरा ते गोवरी दरम्यानचा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. त्यावर होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे मोठेमोठे खड्डे पडले आहते. रस्ता पूर्णत: दबल्या गेला आहे. त्यामुळे यावरुन जाणाऱ्या वाहन चालकांना कमालीची कसरत करावी लागते. रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अपघातांवर आळा घालण्याच्या दृष्टीने रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या मार्गावरील धुळीवर नियंत्रण करणेही गरजेचे असून रस्ता दुरुस्तीची मागणी परिसरातील जनतेनी केली आहे. (वार्ताहर)