शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

वेकोलिच्या कोळसा वाहतुकीमुळे रस्त्याची दैनावस्था

By admin | Updated: November 23, 2014 23:17 IST

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत नव्याने सुरु झालेल्या गोवरी डीप या कोळसा खाणीतून होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे राजुरा-गोवरी- कवठाळा मार्गावरील माथरा ते गोवरी दरम्यानचा रस्ता पूर्णत: उखडला आहे.

सास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत नव्याने सुरु झालेल्या गोवरी डीप या कोळसा खाणीतून होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे राजुरा-गोवरी- कवठाळा मार्गावरील माथरा ते गोवरी दरम्यानचा रस्ता पूर्णत: उखडला आहे. त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाणही वाढले असून वाहतूक करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत विविध कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणीमुळे तालुक्यातील नागरिकांना विविध समस्यांना तोड द्यावे लागते. त्यात प्रामुख्याने वेकोलिच्या उत्खननामुळे होणारे मातीचे मोठमोठे ढिगारे व त्यामुळे कृत्रिम पुराचा फटका, होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे बसणारे हादरे व त्यामुळे घरांना जाणारे तडे, वेकोलि परिसरात होणारे धुळीचे प्रदूषण, या प्रकारामुळे परिसरातील पिकांचेही नुकसान होत आहे.मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्खननामुळे परिसरातील पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यातच महत्वाची समस्या म्हणजे कोळसा खाणीतून केल्या जाणाऱ्या ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे होणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था. मोठ्या उत्पादनामुळे वेकोलिला फायदा होत असला तरी नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वेकोलि परिसरातून राजुरा- गोवरी- पोवनी- कवठाळा हा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरुन वेकोलिची मोठी कोळसा वाहतूक होते. परिसरातील माथरा, गोयेगाव, चिंचोली, साखरी, वरोडा, पेल्लोरा, चार्ली, निर्ली, धिडशी, कढोली, बाबापूर, मानोलीसह अनेक गावातील नागरिक या रस्त्याने वाहतूक करतात.वेकोलिच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे या मार्गाची नेहमीच दयनीय अवस्था असते. वेळोवेळी दुरुस्ती केली जाते. परंतु रस्ता कधीच चांगल्या स्थितीत नसतो. सध्या वेकोलिच्या गोवारी डीप या नव्या कोळसा खाणीमुळे या मार्गावरील माथरा ते गोवरी दरम्यानचा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. त्यावर होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे मोठेमोठे खड्डे पडले आहते. रस्ता पूर्णत: दबल्या गेला आहे. त्यामुळे यावरुन जाणाऱ्या वाहन चालकांना कमालीची कसरत करावी लागते. रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अपघातांवर आळा घालण्याच्या दृष्टीने रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या मार्गावरील धुळीवर नियंत्रण करणेही गरजेचे असून रस्ता दुरुस्तीची मागणी परिसरातील जनतेनी केली आहे. (वार्ताहर)