शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची पाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 14:29 IST

आगार प्रमुखांना साकडे : बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क सिंदेवाही/नवरगाव : नवरगाव विद्यार्थ्यांना सकाळी घ्यायला बस येते. मात्र सायंकाळी सोडायला बस येत नसल्याने १३ किमी घनदाट जंगलातून जायचे कसे, असा गंभीर प्रश्न विद्यार्थी व कारवावासीयांसमोर निर्माण झाला आहे.

सिंदेवाही तालुक्याच्या अगदी शेवटच्या टोकावर ताडोबाच्या कोअर झोन अभयारण्यात कारवा गाव असून गावामध्ये जिल्हा परिषदेची चवथी पर्यंत शाळा आहे. त्या समोरील शिक्षण घेण्यासाठी १३ किमी संपूर्ण घनदाट जंगलातून शिवणी, तर उच्च शिक्षणासाठी ३० किमी. सिंदेवाही वा इतर ठिकाणी जावे लागते. विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेऊन मागणी केल्याने बस सुरू झाली. त्यानुसार मानव विकास कार्यक्रमांतर्गत सिंदेवाही शिवणी कारवा ही बस सकाळी ९ वाजता गावात येते. त्यामुळे गावातील विद्यार्थी शिवणी येथे शिक्षण घेण्यासाठी जातात. मात्र सायंकाळी ५ वाजता येणारी बस बंद केली असल्याने शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना गावाला परत जाण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने १३ किलोमीटर हे अंतर पायी चालत जावे लागते. रस्ता पूर्णतः जंगलाने व्यापलेला असून ताडोबा अभयारण्य असल्याने वन्यप्राण्यांची प्रचंड दहशत सुरू आहे. त्यामुळे कधीही प्राण्यांचा धोका होऊ शकतो. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी शाळेत जाणेच बंद केले. तर काही विद्यार्थ्यांना शिवणी येथील नातेवाईकांकडे आधार घेण्याची वेळ आली.

सकाळी बस धावते, मग रात्री का नाही? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून सकाळी ९ वाजता कारवा गावात बस जाऊ शकते, तर सायंकाळी ५ वाजता बस का जात नाही, असा गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. यासंबंधी गावकऱ्यांनी जिल्हा आगार प्रमुख कार्यालय चंद्रपूर आणि विधानसभा विरोधी पक्षनेते तथा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना निवेदनाद्वारे सदर बस पूर्ववत विद्यार्थ्यांच्या सुटीच्या वेळी सायंकाळी ५ वाजता नियमित सुरू करावी, अशी मागणी कारवावासीयांनी केली आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर