शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची पाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 14:29 IST

आगार प्रमुखांना साकडे : बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क सिंदेवाही/नवरगाव : नवरगाव विद्यार्थ्यांना सकाळी घ्यायला बस येते. मात्र सायंकाळी सोडायला बस येत नसल्याने १३ किमी घनदाट जंगलातून जायचे कसे, असा गंभीर प्रश्न विद्यार्थी व कारवावासीयांसमोर निर्माण झाला आहे.

सिंदेवाही तालुक्याच्या अगदी शेवटच्या टोकावर ताडोबाच्या कोअर झोन अभयारण्यात कारवा गाव असून गावामध्ये जिल्हा परिषदेची चवथी पर्यंत शाळा आहे. त्या समोरील शिक्षण घेण्यासाठी १३ किमी संपूर्ण घनदाट जंगलातून शिवणी, तर उच्च शिक्षणासाठी ३० किमी. सिंदेवाही वा इतर ठिकाणी जावे लागते. विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेऊन मागणी केल्याने बस सुरू झाली. त्यानुसार मानव विकास कार्यक्रमांतर्गत सिंदेवाही शिवणी कारवा ही बस सकाळी ९ वाजता गावात येते. त्यामुळे गावातील विद्यार्थी शिवणी येथे शिक्षण घेण्यासाठी जातात. मात्र सायंकाळी ५ वाजता येणारी बस बंद केली असल्याने शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना गावाला परत जाण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने १३ किलोमीटर हे अंतर पायी चालत जावे लागते. रस्ता पूर्णतः जंगलाने व्यापलेला असून ताडोबा अभयारण्य असल्याने वन्यप्राण्यांची प्रचंड दहशत सुरू आहे. त्यामुळे कधीही प्राण्यांचा धोका होऊ शकतो. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी शाळेत जाणेच बंद केले. तर काही विद्यार्थ्यांना शिवणी येथील नातेवाईकांकडे आधार घेण्याची वेळ आली.

सकाळी बस धावते, मग रात्री का नाही? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून सकाळी ९ वाजता कारवा गावात बस जाऊ शकते, तर सायंकाळी ५ वाजता बस का जात नाही, असा गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. यासंबंधी गावकऱ्यांनी जिल्हा आगार प्रमुख कार्यालय चंद्रपूर आणि विधानसभा विरोधी पक्षनेते तथा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना निवेदनाद्वारे सदर बस पूर्ववत विद्यार्थ्यांच्या सुटीच्या वेळी सायंकाळी ५ वाजता नियमित सुरू करावी, अशी मागणी कारवावासीयांनी केली आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर