शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्ह्यावर भीषण दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:08 IST

यंदा जोरदार पर्जन्यमानाचा वेधशाळेचा अंदाज फोल ठरला. पावसाळ्याचे जून व जुलै हे दोन महिने लोटूनही जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही.

ठळक मुद्दे३५ टक्केच पाऊस : सिंचन प्रकल्पात निम्म्याहून कमी जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यंदा जोरदार पर्जन्यमानाचा वेधशाळेचा अंदाज फोल ठरला. पावसाळ्याचे जून व जुलै हे दोन महिने लोटूनही जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही. जिल्ह्याची पावसाची सरासरी ११३५.४०६ मिमी असताना आतापर्यंत केवळ सरासरी ४०२.४८९ मिमी पाऊसच पडला. परिणामी जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांसह ग्रामीण जलस्रोतांची स्थितीही बिकट आहे. एकूणच जिल्ह्यात यंदा भीषण कोरड्या दुष्काळाचे संकट घोंगाऊ लागले आहे.वेळशाळेच्या अंदाजाला यंदा पावसाने चांगलीच चपराक दिली. जुलै हा पावसाळ्यातील सर्वाधिक पावसाचा महिना मानला जातो. चार दिवसांचा अपवाद वगळला तर हा संपूर्ण महिना कोरडा गेला. जिल्ह्याची पावसाची सरासरी ११३६.४०६ मिमी आहे. मागील वर्षी सरासरी ओलांडून म्हणजेच १३९५.७१३ मिमी पाऊस बरसला.मात्र यावर्षी वरूणराजाने जिल्ह्याला वाकुल्या दाखविल्या. जून आणि जुलै या दोन महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३९६.५६ मिमी पाऊस पडला. आज ३ आॅगस्ट रोजी सरासरी ४०२.४८९ मिमी पावसाची नोंद झाली. म्हणजेच केवळ ३० ते ३५ टक्केच पाऊस पडला. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर कमी असतो. या दोन महिन्यात पावसाची ७० टक्के उणीव कशी भरून निघेल, हा प्रश्नच आहे.कमी पावसामुळे जिल्ह्यात नदी, नाले, बोड्या, तलाव यातील जलसाठाही चिंताजनक आहे. १० ते २० टक्के धान उत्पादक शेतकºयांचे अद्याप रोवणे शिल्लक आहे. उर्वरित शेतकºयांचे रोवणे झाले. मात्र आता पिकांना पाणी हवे आहे. पाऊस पडला नाही, तर शेतकºयांचे यंदा अतोनात नुकसान होणार आहे.चंद्रपूरकरांवरही पाण्याचे संकटचंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र सद्य:स्थितीत इरई धरणात केवळ ३६.६३ टक्केच पाणी आहे. या धरणातून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रालाही पाणी दिले जाते. त्यामुळे या धरणातून झपाट्याने पाण्याची पातळी कमी होते. येत्या काही दिवसात या धरणात पाणी जमा झाले नाही, तर पुढे चंद्रपूरकरांवर पाण्याचे भीषण संकट ओढवू शकते.सिंचन प्रकल्पांची स्थिती चिंताजनकजिल्ह्यातील आसोलामेंढा प्रकल्पात ६३.११ टक्के जलसाठा आहे. हा अपवाद सोडला तर उर्वरित दहाही सिंचन प्रकल्पांची स्थिती जुलै महिन्यातच चिंताजनक आहे. घोडाझरी प्रकल्प ३१.७५ टक्के, नलेश्वर-३४.८३, चंदई-३८.९७, चारगाव-३५.२३, अमलनाला-१७.५८, लभानसराड-०.०३, पकडीगुड्डम-१०.९३, डोंगरगाव-४२.४७, इरई-३६.६३ आणि लालनाला प्रकल्पात १९.७८ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात या प्रकल्पात ७० ते ७२ टक्के जलसाठा होता.