शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यावर भीषण दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:08 IST

यंदा जोरदार पर्जन्यमानाचा वेधशाळेचा अंदाज फोल ठरला. पावसाळ्याचे जून व जुलै हे दोन महिने लोटूनही जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही.

ठळक मुद्दे३५ टक्केच पाऊस : सिंचन प्रकल्पात निम्म्याहून कमी जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यंदा जोरदार पर्जन्यमानाचा वेधशाळेचा अंदाज फोल ठरला. पावसाळ्याचे जून व जुलै हे दोन महिने लोटूनही जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही. जिल्ह्याची पावसाची सरासरी ११३५.४०६ मिमी असताना आतापर्यंत केवळ सरासरी ४०२.४८९ मिमी पाऊसच पडला. परिणामी जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांसह ग्रामीण जलस्रोतांची स्थितीही बिकट आहे. एकूणच जिल्ह्यात यंदा भीषण कोरड्या दुष्काळाचे संकट घोंगाऊ लागले आहे.वेळशाळेच्या अंदाजाला यंदा पावसाने चांगलीच चपराक दिली. जुलै हा पावसाळ्यातील सर्वाधिक पावसाचा महिना मानला जातो. चार दिवसांचा अपवाद वगळला तर हा संपूर्ण महिना कोरडा गेला. जिल्ह्याची पावसाची सरासरी ११३६.४०६ मिमी आहे. मागील वर्षी सरासरी ओलांडून म्हणजेच १३९५.७१३ मिमी पाऊस बरसला.मात्र यावर्षी वरूणराजाने जिल्ह्याला वाकुल्या दाखविल्या. जून आणि जुलै या दोन महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३९६.५६ मिमी पाऊस पडला. आज ३ आॅगस्ट रोजी सरासरी ४०२.४८९ मिमी पावसाची नोंद झाली. म्हणजेच केवळ ३० ते ३५ टक्केच पाऊस पडला. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर कमी असतो. या दोन महिन्यात पावसाची ७० टक्के उणीव कशी भरून निघेल, हा प्रश्नच आहे.कमी पावसामुळे जिल्ह्यात नदी, नाले, बोड्या, तलाव यातील जलसाठाही चिंताजनक आहे. १० ते २० टक्के धान उत्पादक शेतकºयांचे अद्याप रोवणे शिल्लक आहे. उर्वरित शेतकºयांचे रोवणे झाले. मात्र आता पिकांना पाणी हवे आहे. पाऊस पडला नाही, तर शेतकºयांचे यंदा अतोनात नुकसान होणार आहे.चंद्रपूरकरांवरही पाण्याचे संकटचंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र सद्य:स्थितीत इरई धरणात केवळ ३६.६३ टक्केच पाणी आहे. या धरणातून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रालाही पाणी दिले जाते. त्यामुळे या धरणातून झपाट्याने पाण्याची पातळी कमी होते. येत्या काही दिवसात या धरणात पाणी जमा झाले नाही, तर पुढे चंद्रपूरकरांवर पाण्याचे भीषण संकट ओढवू शकते.सिंचन प्रकल्पांची स्थिती चिंताजनकजिल्ह्यातील आसोलामेंढा प्रकल्पात ६३.११ टक्के जलसाठा आहे. हा अपवाद सोडला तर उर्वरित दहाही सिंचन प्रकल्पांची स्थिती जुलै महिन्यातच चिंताजनक आहे. घोडाझरी प्रकल्प ३१.७५ टक्के, नलेश्वर-३४.८३, चंदई-३८.९७, चारगाव-३५.२३, अमलनाला-१७.५८, लभानसराड-०.०३, पकडीगुड्डम-१०.९३, डोंगरगाव-४२.४७, इरई-३६.६३ आणि लालनाला प्रकल्पात १९.७८ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात या प्रकल्पात ७० ते ७२ टक्के जलसाठा होता.