शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यावर भीषण दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:08 IST

यंदा जोरदार पर्जन्यमानाचा वेधशाळेचा अंदाज फोल ठरला. पावसाळ्याचे जून व जुलै हे दोन महिने लोटूनही जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही.

ठळक मुद्दे३५ टक्केच पाऊस : सिंचन प्रकल्पात निम्म्याहून कमी जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यंदा जोरदार पर्जन्यमानाचा वेधशाळेचा अंदाज फोल ठरला. पावसाळ्याचे जून व जुलै हे दोन महिने लोटूनही जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही. जिल्ह्याची पावसाची सरासरी ११३५.४०६ मिमी असताना आतापर्यंत केवळ सरासरी ४०२.४८९ मिमी पाऊसच पडला. परिणामी जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांसह ग्रामीण जलस्रोतांची स्थितीही बिकट आहे. एकूणच जिल्ह्यात यंदा भीषण कोरड्या दुष्काळाचे संकट घोंगाऊ लागले आहे.वेळशाळेच्या अंदाजाला यंदा पावसाने चांगलीच चपराक दिली. जुलै हा पावसाळ्यातील सर्वाधिक पावसाचा महिना मानला जातो. चार दिवसांचा अपवाद वगळला तर हा संपूर्ण महिना कोरडा गेला. जिल्ह्याची पावसाची सरासरी ११३६.४०६ मिमी आहे. मागील वर्षी सरासरी ओलांडून म्हणजेच १३९५.७१३ मिमी पाऊस बरसला.मात्र यावर्षी वरूणराजाने जिल्ह्याला वाकुल्या दाखविल्या. जून आणि जुलै या दोन महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३९६.५६ मिमी पाऊस पडला. आज ३ आॅगस्ट रोजी सरासरी ४०२.४८९ मिमी पावसाची नोंद झाली. म्हणजेच केवळ ३० ते ३५ टक्केच पाऊस पडला. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर कमी असतो. या दोन महिन्यात पावसाची ७० टक्के उणीव कशी भरून निघेल, हा प्रश्नच आहे.कमी पावसामुळे जिल्ह्यात नदी, नाले, बोड्या, तलाव यातील जलसाठाही चिंताजनक आहे. १० ते २० टक्के धान उत्पादक शेतकºयांचे अद्याप रोवणे शिल्लक आहे. उर्वरित शेतकºयांचे रोवणे झाले. मात्र आता पिकांना पाणी हवे आहे. पाऊस पडला नाही, तर शेतकºयांचे यंदा अतोनात नुकसान होणार आहे.चंद्रपूरकरांवरही पाण्याचे संकटचंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र सद्य:स्थितीत इरई धरणात केवळ ३६.६३ टक्केच पाणी आहे. या धरणातून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रालाही पाणी दिले जाते. त्यामुळे या धरणातून झपाट्याने पाण्याची पातळी कमी होते. येत्या काही दिवसात या धरणात पाणी जमा झाले नाही, तर पुढे चंद्रपूरकरांवर पाण्याचे भीषण संकट ओढवू शकते.सिंचन प्रकल्पांची स्थिती चिंताजनकजिल्ह्यातील आसोलामेंढा प्रकल्पात ६३.११ टक्के जलसाठा आहे. हा अपवाद सोडला तर उर्वरित दहाही सिंचन प्रकल्पांची स्थिती जुलै महिन्यातच चिंताजनक आहे. घोडाझरी प्रकल्प ३१.७५ टक्के, नलेश्वर-३४.८३, चंदई-३८.९७, चारगाव-३५.२३, अमलनाला-१७.५८, लभानसराड-०.०३, पकडीगुड्डम-१०.९३, डोंगरगाव-४२.४७, इरई-३६.६३ आणि लालनाला प्रकल्पात १९.७८ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात या प्रकल्पात ७० ते ७२ टक्के जलसाठा होता.