शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे बळीराजा सुखावला

By admin | Updated: August 6, 2015 01:55 IST

मागील एक महिन्यापासून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

संकट मात्र अद्यापही कायम : जोरदार पावसाची अजूनही प्रतीक्षाचंद्रपूर : मागील एक महिन्यापासून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात दिवसभरच पावसाची अधेमधे पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरीही सुखावला आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या रोवण्या खोळंबल्या आहे. दोन दिवसांच्या या पावसाने दिलासा मिळाला असला तरी आतापर्यंतचा पावसाचा लहरीपणा लक्षात घेता संकट मात्र अद्यापही कायमच आहे. आज बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात २५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.यावर्षी पावसाबाबत प्रारंभपासूनच चंद्रपूर जिल्हा निराशाजनक राहिला. पावसाच्या जुन, जुलै या महिन्यातच पावसाने दडी मारली. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातही जलसाठा कमी होता. अस्सल पावसाचा जुलै महिना सुरू असतानाच जिल्ह्यातील चार सिंचन प्रकल्प कोरडे होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनही अडचणीत आले होते. यावर्षी १ जून ते ५ आॅगस्टपर्यंत एकूण ७७३८.७३ मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत सरासरी ५१६.९१६ मिमी पाऊस पडला. सर्वसामान्य सरासरीच्या तुलनेत ही टक्केवारी निम्मीही नाही. जूलै महिन्यात पाऊस सरासरी ओलांडून बरसतो, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यंदा या पावसाच्या महिन्यातही पावसाने दगा दिला. जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३९७.८४ मिमी पाऊस पडायला हवा. दरवर्षी याहून अधिकच पाऊस पडतो. मात्र यावर्षी जुलै महिन्यात पाऊस सरासरीपर्यंतही पोहचू शकला नाही.जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होताच तीन दिवस संपूर्ण जिल्ह्यातच संततधार पाऊस बरसला. त्यावेळी हवामान खात्यानेही यंदा पाऊस समाधानकारक असल्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही आनंदात होते. या आनंदातच शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. काही शेतकऱ्यांनी मात्र पावसाच्या लहरीपणाचा अनुभव लक्षात घेऊन पेरण्या थांबविल्या. पावसाने आपला लहरीपणा दाखविलाच. जून महिन्यापासून पाऊस जी दडी मारली ती जुलै महिना संपेपर्यंत कायम होती. यात दोनचार दिवसांचा अपवाद होता. पावसाच्या अभावामुळे शेतकऱ्यांची स्थिती नाजुक झाली. नदी-नाले आटायला लागले. पेरण्या डोळ्यादेखत सुकू लागल्या होत्या. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, त्यांचे बरे होते. मात्र बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या कोमेजून गेल्या. काहींनी गुंडांनी पिकांना पाणी घालून जगविण्याचा प्रयत्न चालविला. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचीही स्थिती चिंताजनक झाली होती. त्यामुळे पाऊस पडावा, यासाठी शेतकरी साकडे घालू लागले होते. मात्र आॅगस्ट महिना सुरू झाला तरी पावसाची चिन्ह दिसत नव्हती. उलट या कालावधीत जिल्ह्यात कडाक्याचे ऊन्ह तापू लागले. परिणामी शेतकरी वर्ग कमालीचा भयभित झाला होता. दरम्यान, काल ४ आॅगस्ट आणि आज चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. मंगळवारी सावली तालुका वगळता इतर तालुक्यात मुसळधार नसला तरी समाधानकारक पाऊस पडला. बुधवारी पुन्हा पावसाची रिपरिप अधेमधे सुरूच राहिली. या पावसामुळे बळीराजा तुर्तास सुखावला आहे. मात्र अद्यापही बळीराजाला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस केव्हाही दडी मारत असल्यामुळे खरीपावर संकट अद्यापही टळलेले नाही. (शहर प्रतिनिधी)मंगळवार आणि बुधवारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातही जलसाठा थोडा का होईना, वाढला आहे. जुलै महिन्यात असोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चारगाव हे प्रकल्प कोरडे पडले होते. आता मात्र केवळ आसोलामेंढा प्रकल्पच कोरडे आहे. बुधवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार घोडाझरी प्रकल्पात ७.१४ टक्के, नलेश्वर-१०.५९ टक्के, चंदई-६४.९९ टक्के, चारगाव-१२.९२ टक्के, अमलनाला-४७.९० टक्के, लभानसराड-३३.१४ टक्के, पकडीगुड्डम-६५.४४ टक्के, डोंगरगाव-७६.६६ टक्के, दिना-७६.९४ टक्के आणि इरई धरणात ४३.४८ टक्के जलसाठा आहे.