शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

अकाली पावसामुळे कापूस झाडावरच खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:19 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस पडलेल्या अकाली पावसामुळे कापूस व हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापसाची शेवटची वेचणी व्हायची असताना पावसाने झोडपल्यामुळे कापूस झाडावरच खराब झाला आहे. जिल्ह्यात नऊ कापूस उत्पादक तालुक्यांना याचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देकापूस उत्पादक चिंतेत : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना फटका

आशिष देरकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस पडलेल्या अकाली पावसामुळे कापूस व हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापसाची शेवटची वेचणी व्हायची असताना पावसाने झोडपल्यामुळे कापूस झाडावरच खराब झाला आहे. जिल्ह्यात नऊ कापूस उत्पादक तालुक्यांना याचा फटका बसला आहे.जुलै-आॅगष्ट महिन्यात पडलेल्या संततधार पावसामुळे ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. अशातच कसेबसे पीक सावरले. मात्र, कोरडवाहू शेतकऱ्यांचा शेवटचा वेचा व ओलित शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचे दोन वेचे शिल्लक असताना पडलेल्या अकाली पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशेचा किरण हिरावला आहे. अकाली पावसामुळे काही शेतकऱ्यांचा झाडावरचा कापूस जमीनदोस्त झाला तर काही कापूस ओला झाल्याने कापसाला भाव कमी मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, जिवती, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, गोंडपिपरी, बल्लारपूर यासह काही तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना अकाली पावसाचा फटका बसला असून शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद घेण्याची आवश्यकता आहे.काही शेतकºयांनी चालू हंगामात हरभरा पेरला असताना पिके उगवायला लागली होती. दरम्यान काही शेतकºयांचे हरभरा पीक फुलावर आले होते. अकाली पावसामुळे आलेला बहर गळाल्याच्याही घटना घडल्या आहे.नेहमी अस्मानी किंवा सुलतानी संकटात सापडणाऱ्या शेतकऱ्यांवर यावेळी अवकाळी पावसाने घाला घातल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.गुलाबी बोंडअळीचाही प्रकोपकोरपना तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कापसावर गुलाबी बोंडअळीचाही प्रकोप दिसून येत आहे. कापसाच्या ऐन शेवटच्या हंगामात बोंडअळी आल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. तालुक्यातील खिर्डी येथील धनराज मालेकर या शेतकऱ्याच्या शेतातील कापूस पिकावर बोंडअळी आल्यामुळे पिकाला धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील अनेक तालुके शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळले असून सर्वेक्षणामध्ये चुका झालेल्या आहेत. अशातच अकाली पावसाने घाला घातल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित सर्वेक्षण करू नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत जाहीर करावी.- सुभाष धोटे, माजी आमदार, राजुराआमच्याकडे कापूस व हरभरा दोन्ही पीक असून अकाली पावसामुळे दोन्ही पिकाचे नुकसान झाले आहे. झाडावरचा कापूस ओला झाला असून काही कापूस गळून पडला आहे तर हरभरा पिकाचा बहरसुद्धा खाली गळून पडला आहे.- जैराम ढेंगळे, शेतकरी