शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

अकाली पावसामुळे कापूस झाडावरच खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:19 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस पडलेल्या अकाली पावसामुळे कापूस व हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापसाची शेवटची वेचणी व्हायची असताना पावसाने झोडपल्यामुळे कापूस झाडावरच खराब झाला आहे. जिल्ह्यात नऊ कापूस उत्पादक तालुक्यांना याचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देकापूस उत्पादक चिंतेत : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना फटका

आशिष देरकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस पडलेल्या अकाली पावसामुळे कापूस व हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापसाची शेवटची वेचणी व्हायची असताना पावसाने झोडपल्यामुळे कापूस झाडावरच खराब झाला आहे. जिल्ह्यात नऊ कापूस उत्पादक तालुक्यांना याचा फटका बसला आहे.जुलै-आॅगष्ट महिन्यात पडलेल्या संततधार पावसामुळे ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. अशातच कसेबसे पीक सावरले. मात्र, कोरडवाहू शेतकऱ्यांचा शेवटचा वेचा व ओलित शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचे दोन वेचे शिल्लक असताना पडलेल्या अकाली पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशेचा किरण हिरावला आहे. अकाली पावसामुळे काही शेतकऱ्यांचा झाडावरचा कापूस जमीनदोस्त झाला तर काही कापूस ओला झाल्याने कापसाला भाव कमी मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, जिवती, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, गोंडपिपरी, बल्लारपूर यासह काही तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना अकाली पावसाचा फटका बसला असून शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद घेण्याची आवश्यकता आहे.काही शेतकºयांनी चालू हंगामात हरभरा पेरला असताना पिके उगवायला लागली होती. दरम्यान काही शेतकºयांचे हरभरा पीक फुलावर आले होते. अकाली पावसामुळे आलेला बहर गळाल्याच्याही घटना घडल्या आहे.नेहमी अस्मानी किंवा सुलतानी संकटात सापडणाऱ्या शेतकऱ्यांवर यावेळी अवकाळी पावसाने घाला घातल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.गुलाबी बोंडअळीचाही प्रकोपकोरपना तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कापसावर गुलाबी बोंडअळीचाही प्रकोप दिसून येत आहे. कापसाच्या ऐन शेवटच्या हंगामात बोंडअळी आल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. तालुक्यातील खिर्डी येथील धनराज मालेकर या शेतकऱ्याच्या शेतातील कापूस पिकावर बोंडअळी आल्यामुळे पिकाला धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील अनेक तालुके शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळले असून सर्वेक्षणामध्ये चुका झालेल्या आहेत. अशातच अकाली पावसाने घाला घातल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित सर्वेक्षण करू नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत जाहीर करावी.- सुभाष धोटे, माजी आमदार, राजुराआमच्याकडे कापूस व हरभरा दोन्ही पीक असून अकाली पावसामुळे दोन्ही पिकाचे नुकसान झाले आहे. झाडावरचा कापूस ओला झाला असून काही कापूस गळून पडला आहे तर हरभरा पिकाचा बहरसुद्धा खाली गळून पडला आहे.- जैराम ढेंगळे, शेतकरी