शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अकाली पावसामुळे कापूस झाडावरच खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:19 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस पडलेल्या अकाली पावसामुळे कापूस व हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापसाची शेवटची वेचणी व्हायची असताना पावसाने झोडपल्यामुळे कापूस झाडावरच खराब झाला आहे. जिल्ह्यात नऊ कापूस उत्पादक तालुक्यांना याचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देकापूस उत्पादक चिंतेत : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना फटका

आशिष देरकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस पडलेल्या अकाली पावसामुळे कापूस व हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापसाची शेवटची वेचणी व्हायची असताना पावसाने झोडपल्यामुळे कापूस झाडावरच खराब झाला आहे. जिल्ह्यात नऊ कापूस उत्पादक तालुक्यांना याचा फटका बसला आहे.जुलै-आॅगष्ट महिन्यात पडलेल्या संततधार पावसामुळे ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. अशातच कसेबसे पीक सावरले. मात्र, कोरडवाहू शेतकऱ्यांचा शेवटचा वेचा व ओलित शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचे दोन वेचे शिल्लक असताना पडलेल्या अकाली पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशेचा किरण हिरावला आहे. अकाली पावसामुळे काही शेतकऱ्यांचा झाडावरचा कापूस जमीनदोस्त झाला तर काही कापूस ओला झाल्याने कापसाला भाव कमी मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, जिवती, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, गोंडपिपरी, बल्लारपूर यासह काही तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना अकाली पावसाचा फटका बसला असून शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद घेण्याची आवश्यकता आहे.काही शेतकºयांनी चालू हंगामात हरभरा पेरला असताना पिके उगवायला लागली होती. दरम्यान काही शेतकºयांचे हरभरा पीक फुलावर आले होते. अकाली पावसामुळे आलेला बहर गळाल्याच्याही घटना घडल्या आहे.नेहमी अस्मानी किंवा सुलतानी संकटात सापडणाऱ्या शेतकऱ्यांवर यावेळी अवकाळी पावसाने घाला घातल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.गुलाबी बोंडअळीचाही प्रकोपकोरपना तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कापसावर गुलाबी बोंडअळीचाही प्रकोप दिसून येत आहे. कापसाच्या ऐन शेवटच्या हंगामात बोंडअळी आल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. तालुक्यातील खिर्डी येथील धनराज मालेकर या शेतकऱ्याच्या शेतातील कापूस पिकावर बोंडअळी आल्यामुळे पिकाला धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील अनेक तालुके शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळले असून सर्वेक्षणामध्ये चुका झालेल्या आहेत. अशातच अकाली पावसाने घाला घातल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित सर्वेक्षण करू नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत जाहीर करावी.- सुभाष धोटे, माजी आमदार, राजुराआमच्याकडे कापूस व हरभरा दोन्ही पीक असून अकाली पावसामुळे दोन्ही पिकाचे नुकसान झाले आहे. झाडावरचा कापूस ओला झाला असून काही कापूस गळून पडला आहे तर हरभरा पिकाचा बहरसुद्धा खाली गळून पडला आहे.- जैराम ढेंगळे, शेतकरी