शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

प्रदूषणामुळे चंद्रपूरची ओळख काळवंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

चंद्रपूर जिल्हा कोळसा खाणीसाठी प्रसिध्द आहे. जिल्हाभर पसरलेल्या कोळसा खाणी, सिमेंट कंपन्या, चूनखड्यांची खाण, पेपर मील, राईस मिल, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे जिल्ह्यात वायू प्रदूषण सर्वाधिक झाले आहे. कोळसा खाणीतून कोळशाची होणारी वाहतूक, शहराजवळचे कोल डेपो व डिझेलच्या वाहनांमुळे वायू प्रदूषणात सर्वाधिक भर पडत आहे, असे खासदार बाळू धानोरकर यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देअधिवेशनात होणार का चर्चा? : कोळसा खाणी, वीज केंद्राकडून नियमांची पायमल्ली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या प्रदूषित शहरांच्या सेपी स्कोरनुसार चंद्रपूर राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले आहे. चंद्रपूरचा सेपी स्कोर ७६.४१ आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, विपुल वनसंपदा आणि नद्यांचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख होती. मात्र सध्या प्रदूषणामुळे चंद्रपूरची ओळख काळवंडली आहे.विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर हे संसदेत याबाबत भाष्य करून सभागृहाचे लक्ष वेधत केंद्र शासनाला जाब विचारणार आहे. यासोबत काही दिवसात नागपूर येथे राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात स्थानिक आमदारांनी चंद्रपूरच्या प्रदूषणाबाबतचे गांभीर्य लक्षात आणून देणे अपेक्षित आहे. मात्र हिवाळी अधिवेशन केवळ सहाच दिवस चालणार असल्याने हा गंभीर मुद्दाही चर्चेपासून दूर राहणार आहे.चंद्रपूर जिल्हा कोळसा खाणीसाठी प्रसिध्द आहे. जिल्हाभर पसरलेल्या कोळसा खाणी, सिमेंट कंपन्या, चूनखड्यांची खाण, पेपर मील, राईस मिल, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे जिल्ह्यात वायू प्रदूषण सर्वाधिक झाले आहे. कोळसा खाणीतून कोळशाची होणारी वाहतूक, शहराजवळचे कोल डेपो व डिझेलच्या वाहनांमुळे वायू प्रदूषणात सर्वाधिक भर पडत आहे, असे खासदार बाळू धानोरकर यांनी म्हटले आहे.संसदेत होणार चर्चा; मात्र राज्याच्या अधिवेशनात काय?खासदार बाळू धानोरकर हे सोमवारी संसदेत चंद्रपूरच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करून केंद्र शासनाचे लक्ष वेधणार आहेत. जिल्हावासीयांच्या आरोग्यासाठी हे प्रदूषण दिवसेंदिवस घातक होत आहे. त्यामुळे हा गंभीर मुद्दा नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनातही उपस्थित केला जाणे आवश्यक आहे. मात्र हिवाळी अधिवेशन केवळ फार्स ठरेल काय, अशी भीती आतापासूनच व्यक्त होत आहे. हे अधिवेशन सहा दिवसच चालेल, अशी चर्चा असल्याने प्रदूषणासारखा चंद्रपुरातील गंभीर मुद्दा तसाच कायम राहण्याची शक्यता आहे.वीज केंद्रातून सर्वाधिक प्रदूषणचंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून सर्वाधिक प्रदूषण होत आहे. मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर वीज केंद्र नियमांना तिलांजली देत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर आणि आजुबाजुच्या गावात विषारी वायू नागरिकांच्या जिवावर उठत आहे. या वीज केंद्रातील युनीट क्रमांक १ व २ हे अनेक वर्ष जुने युनीट आहे. युनीट क्रमांक १- १९८३ मध्ये तर युनीट क्रमांक २-१९८४ ला स्थापित झाले आहेत. यातून सस्पेंडेड पर्टीक्युलर मॅटर (एसपीएम) अनुक्रमे ३८१ मिली गॅम पर क्युबिक मीटर आणि ६४३ मिलीग्रॅम पर क्युबिक मीटर दररोज निघत असते. हे प्रमाण सामान्यापेक्षा अधिक आहे. सामान्यता ते १०० मिलीग्रॅम पर क्युबिक मीटर असले पाहिजे. त्याची उंचीही ९० मीटर आहे, जे नियमानुसार नसल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे, असेही खासदार बाळू धानोरकर यांनी म्हटले आहे. नियमानुसार याची उंची २७५ मीटर असणे गरजेचे आहे. याच कारणामुळे वीज केंद्रातून सर्वाधिक प्रदूषण होत आहे.कोळसा डेपो हटवाशहर किंवा गावाजवळच्या मोकळ्या जागेत कोळसा डेपो आहेत. तिथेच कोळसा डम्प केला जातो. चंद्रपूर जिल्ह्याचे प्रदूषण कमी करायचे असेल तर गावाजवळचे कोळसा डेपो दूर अंतरावर स्थलांतरित करून कोळसा डम्प केला पाहिजे. याशिवाय चंद्रपूर वीज केंद्र व काही कंपन्या जे नियमांना तिलांजली देत उत्पादन घेत आहे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. याकडेही खासदार धानोरकर यांनी लक्ष वेधले आहे.असा आहे प्रदूषणाचा मापदंड६० सेपी स्कोरच्या आतील शहरे हे प्रदूषित असतात. ६० ते ७० सेपी स्कोर असलेल्या शहारांना अत्यंत प्रदूषित शहर संबोधले जाते तर ७० च्यावर सेपी स्कोर असेल तर अशा शहरांना घातक प्रदूषित श्रेणीत टाकले जाते.

टॅग्स :pollutionप्रदूषण