शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

देयके अदा होत नसल्याने घोडाझरी उपकालव्याचे काम बंद

By admin | Updated: February 23, 2016 00:37 IST

शासनाकडून देयकेच अदा होत नसल्याने घोडाझरी उपकालव्याचे काम करणाऱ्या अनेक कंत्राटदार कंपन्यानी या कालव्याचे काम बंद केले आहे.

घनश्याम नवघडे नागभीडशासनाकडून देयकेच अदा होत नसल्याने घोडाझरी उपकालव्याचे काम करणाऱ्या अनेक कंत्राटदार कंपन्यानी या कालव्याचे काम बंद केले आहे. परिणामी गेल्या तीन-चार वर्षापासून या कालव्याचे काम बंदच आहे.गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला आहे. सहा ते सात वर्षापूर्वी या कालव्याचे काम सुरु करण्यात आले होते. तत्पूर्वी या कालव्यासाठी लागणारी जमीन अधिग्रहीतही करण्यात आली आणि काम धडाक्यात सरु करण्यात आले. हे काम करण्यासाठी मेंढा (किरमिटी) येथे एफएसी नवेगाव पांडव येथे एचसीसी, खैरीचक येथे बी.टी.पाटील आणि महालक्ष्मी तर कोदेपार एसएमएस या कंत्राटदार कंपन्यानी आपले युनिट सुद्धा सुरु केले. काही दिवस हे काम सुरळीत सुरु राहिले. पण नंतर शासनाने आपले हात आखडते घेणे सुरु केल्याने या कंत्राटदार कंपन्यासमोर मोठा बिकट प्रसंग सुरु झाला.अशाही अवस्थेत काही कंपन्यानी काम सुरु ठेवले तर काही कंपन्यानी काम बंद केले. नवेगाव पांडव येथील एचसीसी या कंपनीने तर लाखो रुपये खर्च करुन उभारलेले युनिटच येथून हलविले. आता या बाबीस तीन ते चार वर्षाचा कालावधी होत आहे. दरम्यान राज्यात सत्तांतर झाले. भाजप-सेना युतीचे शासन राज्यात सत्तारुढ झाले. आता तरी या कालव्याचे मागे लागलेली साडेसाती संपेल, अशी अपेक्षा होती. पण नव्या शासन काळातही या कालव्याच्या नशीबी असलेला भोग संपले असे दिसत नाही. खरे तर या कालव्याचा नागभीड तालुक्यातील बहुतांश शेतीला सकृतदर्शनी काहीच लाभ होत नाही. नागभीड तालुक्यातील गेलेला हा कालवा पूर्णत: भूमिगत स्वरूपाचा आहे. पण मागेपुढे या कालव्याचे काम पूर्ण झालेच आणि येथून पाणी जाऊ लागले तर लिफ्ट इंरिगेशन सारखी योजना कार्यान्वीत होऊ शकते.कंपन्यांची अवस्था बिकटकंत्राटदार कंपन्यानी काम बंद केले असले तरी काही कंपन्यांचे युनिट अद्यापही सुरु आहेत. खैरी चक आणि मेंढा (किरमिटी) येथील कंपन्याचे याबाबत उदाहरण देता येईल. पण शासनाकडून केलेल्या कामाचे देयके मिळत नसल्याचे या कंपन्यांची अवस्था अडकित्यामधील सुपारी सारखी झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या ठरताहेत भारखरे तर या कालव्याच्या देखरेखीसाठी सायगाटा, नागभीड येथे वसाहती निर्माण करण्यात आल्या आहेत. कार्यकारी उपविभागीय अभियंत्यांच्या अनेक जागा भरण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्या आहेत. पण कामच नसल्याने या वसाहती आणि नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी भूईला भार ठरत आहेत.