शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

देयके अदा होत नसल्याने घोडाझरी उपकालव्याचे काम बंद

By admin | Updated: February 23, 2016 00:37 IST

शासनाकडून देयकेच अदा होत नसल्याने घोडाझरी उपकालव्याचे काम करणाऱ्या अनेक कंत्राटदार कंपन्यानी या कालव्याचे काम बंद केले आहे.

घनश्याम नवघडे नागभीडशासनाकडून देयकेच अदा होत नसल्याने घोडाझरी उपकालव्याचे काम करणाऱ्या अनेक कंत्राटदार कंपन्यानी या कालव्याचे काम बंद केले आहे. परिणामी गेल्या तीन-चार वर्षापासून या कालव्याचे काम बंदच आहे.गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला आहे. सहा ते सात वर्षापूर्वी या कालव्याचे काम सुरु करण्यात आले होते. तत्पूर्वी या कालव्यासाठी लागणारी जमीन अधिग्रहीतही करण्यात आली आणि काम धडाक्यात सरु करण्यात आले. हे काम करण्यासाठी मेंढा (किरमिटी) येथे एफएसी नवेगाव पांडव येथे एचसीसी, खैरीचक येथे बी.टी.पाटील आणि महालक्ष्मी तर कोदेपार एसएमएस या कंत्राटदार कंपन्यानी आपले युनिट सुद्धा सुरु केले. काही दिवस हे काम सुरळीत सुरु राहिले. पण नंतर शासनाने आपले हात आखडते घेणे सुरु केल्याने या कंत्राटदार कंपन्यासमोर मोठा बिकट प्रसंग सुरु झाला.अशाही अवस्थेत काही कंपन्यानी काम सुरु ठेवले तर काही कंपन्यानी काम बंद केले. नवेगाव पांडव येथील एचसीसी या कंपनीने तर लाखो रुपये खर्च करुन उभारलेले युनिटच येथून हलविले. आता या बाबीस तीन ते चार वर्षाचा कालावधी होत आहे. दरम्यान राज्यात सत्तांतर झाले. भाजप-सेना युतीचे शासन राज्यात सत्तारुढ झाले. आता तरी या कालव्याचे मागे लागलेली साडेसाती संपेल, अशी अपेक्षा होती. पण नव्या शासन काळातही या कालव्याच्या नशीबी असलेला भोग संपले असे दिसत नाही. खरे तर या कालव्याचा नागभीड तालुक्यातील बहुतांश शेतीला सकृतदर्शनी काहीच लाभ होत नाही. नागभीड तालुक्यातील गेलेला हा कालवा पूर्णत: भूमिगत स्वरूपाचा आहे. पण मागेपुढे या कालव्याचे काम पूर्ण झालेच आणि येथून पाणी जाऊ लागले तर लिफ्ट इंरिगेशन सारखी योजना कार्यान्वीत होऊ शकते.कंपन्यांची अवस्था बिकटकंत्राटदार कंपन्यानी काम बंद केले असले तरी काही कंपन्यांचे युनिट अद्यापही सुरु आहेत. खैरी चक आणि मेंढा (किरमिटी) येथील कंपन्याचे याबाबत उदाहरण देता येईल. पण शासनाकडून केलेल्या कामाचे देयके मिळत नसल्याचे या कंपन्यांची अवस्था अडकित्यामधील सुपारी सारखी झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या ठरताहेत भारखरे तर या कालव्याच्या देखरेखीसाठी सायगाटा, नागभीड येथे वसाहती निर्माण करण्यात आल्या आहेत. कार्यकारी उपविभागीय अभियंत्यांच्या अनेक जागा भरण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्या आहेत. पण कामच नसल्याने या वसाहती आणि नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी भूईला भार ठरत आहेत.