शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

देयके अदा होत नसल्याने घोडाझरी उपकालव्याचे काम बंद

By admin | Updated: February 23, 2016 00:37 IST

शासनाकडून देयकेच अदा होत नसल्याने घोडाझरी उपकालव्याचे काम करणाऱ्या अनेक कंत्राटदार कंपन्यानी या कालव्याचे काम बंद केले आहे.

घनश्याम नवघडे नागभीडशासनाकडून देयकेच अदा होत नसल्याने घोडाझरी उपकालव्याचे काम करणाऱ्या अनेक कंत्राटदार कंपन्यानी या कालव्याचे काम बंद केले आहे. परिणामी गेल्या तीन-चार वर्षापासून या कालव्याचे काम बंदच आहे.गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला आहे. सहा ते सात वर्षापूर्वी या कालव्याचे काम सुरु करण्यात आले होते. तत्पूर्वी या कालव्यासाठी लागणारी जमीन अधिग्रहीतही करण्यात आली आणि काम धडाक्यात सरु करण्यात आले. हे काम करण्यासाठी मेंढा (किरमिटी) येथे एफएसी नवेगाव पांडव येथे एचसीसी, खैरीचक येथे बी.टी.पाटील आणि महालक्ष्मी तर कोदेपार एसएमएस या कंत्राटदार कंपन्यानी आपले युनिट सुद्धा सुरु केले. काही दिवस हे काम सुरळीत सुरु राहिले. पण नंतर शासनाने आपले हात आखडते घेणे सुरु केल्याने या कंत्राटदार कंपन्यासमोर मोठा बिकट प्रसंग सुरु झाला.अशाही अवस्थेत काही कंपन्यानी काम सुरु ठेवले तर काही कंपन्यानी काम बंद केले. नवेगाव पांडव येथील एचसीसी या कंपनीने तर लाखो रुपये खर्च करुन उभारलेले युनिटच येथून हलविले. आता या बाबीस तीन ते चार वर्षाचा कालावधी होत आहे. दरम्यान राज्यात सत्तांतर झाले. भाजप-सेना युतीचे शासन राज्यात सत्तारुढ झाले. आता तरी या कालव्याचे मागे लागलेली साडेसाती संपेल, अशी अपेक्षा होती. पण नव्या शासन काळातही या कालव्याच्या नशीबी असलेला भोग संपले असे दिसत नाही. खरे तर या कालव्याचा नागभीड तालुक्यातील बहुतांश शेतीला सकृतदर्शनी काहीच लाभ होत नाही. नागभीड तालुक्यातील गेलेला हा कालवा पूर्णत: भूमिगत स्वरूपाचा आहे. पण मागेपुढे या कालव्याचे काम पूर्ण झालेच आणि येथून पाणी जाऊ लागले तर लिफ्ट इंरिगेशन सारखी योजना कार्यान्वीत होऊ शकते.कंपन्यांची अवस्था बिकटकंत्राटदार कंपन्यानी काम बंद केले असले तरी काही कंपन्यांचे युनिट अद्यापही सुरु आहेत. खैरी चक आणि मेंढा (किरमिटी) येथील कंपन्याचे याबाबत उदाहरण देता येईल. पण शासनाकडून केलेल्या कामाचे देयके मिळत नसल्याचे या कंपन्यांची अवस्था अडकित्यामधील सुपारी सारखी झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या ठरताहेत भारखरे तर या कालव्याच्या देखरेखीसाठी सायगाटा, नागभीड येथे वसाहती निर्माण करण्यात आल्या आहेत. कार्यकारी उपविभागीय अभियंत्यांच्या अनेक जागा भरण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्या आहेत. पण कामच नसल्याने या वसाहती आणि नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी भूईला भार ठरत आहेत.