शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

नवीन बसस्थानकामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांची समस्या सुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:40 IST

नागभीड येथे विश्रामगृहाच्या जागेवर सुरू करण्यात आलेले नवीन बसस्थानक अनेकांना गैरसोयीचे वाटत आहे. पण, ग्रामीण भागातून येणाऱ्या शहरात शिक्षणासाठी येणाºया शेकडो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय सोयीचे झाले आहे. नवीन बसस्थानकाचा परिसर विस्तीर्ण असल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत रस्त्यावर उभे राहण्याची गरच उरली नाही.

ठळक मुद्देये-जा करण्यासाठी सुविधा । शाळेच्या तासिकांना वेळेवर उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड येथे विश्रामगृहाच्या जागेवर सुरू करण्यात आलेले नवीन बसस्थानक अनेकांना गैरसोयीचे वाटत आहे. पण, ग्रामीण भागातून येणाऱ्या शहरात शिक्षणासाठी येणाºया शेकडो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय सोयीचे झाले आहे. नवीन बसस्थानकाचा परिसर विस्तीर्ण असल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत रस्त्यावर उभे राहण्याची गरच उरली नाही.नागभीड हे तालुक्याचे ठिकाण आहे. संपूर्ण तालुक्यातून शेकडो विद्यार्थी येथे शिकायला येतात. त्यातच शासनाकडून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने बसेसची विनामूल्य सोय केली. परिणामी, शहरात शिकायला येणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नागभीड शहरातील प्रवाशांच्या आवागमणासाठी तीन बसस्थानके होती. पण ही तिन्ही बसस्थानके रस्त्यावरच होती. प्रवाशी आणि विद्यार्थ्यांची बसची दिवसभर प्रतीक्षा करताना कुचंबना व्हायची. मुलींना टोमणे खावे लागत होते. उन्हाळा व पावसाळ्यात रस्त्यावरच उभे राहावे लागत होते. अथवा एखाद्या उपहारगृहाचा आधार घेण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. कधी बसही वेळेवर येत नसल्याने भर रस्त्यावर उभे राहणे विद्यार्थी व विद्यार्थिंनींना नाकीनऊ यायचे. पण, शिक्षणासाठी या साºया अडचणी विद्यार्थी सहन करीत होते. येथील विश्रामगृहाच्या जागेवर नवीन बसस्थानक सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा होत असलेला हा कोंडमारा दूर झाला आहे. नवीन बसस्थानकाचा परिसर विस्तीर्ण व स्वच्छ आहे. परिसरात झाडे आहेत. या परिसराचा उपयोग विद्यार्थी आपापल्या सोयीने बसू शकतात. पाऊस आला तर आडोसा घेण्यासाठी सुविधा आहे. आतापर्यंत विद्यार्थी राम मंदिर व टी पाईंट या चौकातून सोयीने प्रवास करीत होते. नवीन बसस्थानकामुळे बहुतेक विद्यार्थी आता नवीन बसस्थानकातच येत असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांसोबतच इतर प्रवाशीही याच बसस्थानकातून पुढचा प्रवास करतात. बसस्थानकात दिवसभर चांगलीच गर्दी असते. बसस्थानकात प्रवाशांच्या दृष्टीने मूलभूत सुविधांची आवश्यक आहे. त्या मूलभूत सुविधा राज्य परिवहन मंडळाने त्वरित उपलब्ध करून देण्याची गरज आहेसुविधांमध्ये वाढ करण्याची मागणीतालुक्यातून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. त्यामुळे बसस्थानकात मोठी गर्दी असते. परंतु, प्रवाशांच्या दृष्टीने मूलभूत सुविधांची आवश्यकता आहे. शिवाय, ग्रामीण विद्यार्थ्यांकरिता वाढीव सुरू केल्यास अडचणी दूर होऊ शकतात. राज्य परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक व पालकांनी केली आहे.