शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

नवीन बसस्थानकामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांची समस्या सुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:40 IST

नागभीड येथे विश्रामगृहाच्या जागेवर सुरू करण्यात आलेले नवीन बसस्थानक अनेकांना गैरसोयीचे वाटत आहे. पण, ग्रामीण भागातून येणाऱ्या शहरात शिक्षणासाठी येणाºया शेकडो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय सोयीचे झाले आहे. नवीन बसस्थानकाचा परिसर विस्तीर्ण असल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत रस्त्यावर उभे राहण्याची गरच उरली नाही.

ठळक मुद्देये-जा करण्यासाठी सुविधा । शाळेच्या तासिकांना वेळेवर उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड येथे विश्रामगृहाच्या जागेवर सुरू करण्यात आलेले नवीन बसस्थानक अनेकांना गैरसोयीचे वाटत आहे. पण, ग्रामीण भागातून येणाऱ्या शहरात शिक्षणासाठी येणाºया शेकडो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय सोयीचे झाले आहे. नवीन बसस्थानकाचा परिसर विस्तीर्ण असल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत रस्त्यावर उभे राहण्याची गरच उरली नाही.नागभीड हे तालुक्याचे ठिकाण आहे. संपूर्ण तालुक्यातून शेकडो विद्यार्थी येथे शिकायला येतात. त्यातच शासनाकडून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने बसेसची विनामूल्य सोय केली. परिणामी, शहरात शिकायला येणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नागभीड शहरातील प्रवाशांच्या आवागमणासाठी तीन बसस्थानके होती. पण ही तिन्ही बसस्थानके रस्त्यावरच होती. प्रवाशी आणि विद्यार्थ्यांची बसची दिवसभर प्रतीक्षा करताना कुचंबना व्हायची. मुलींना टोमणे खावे लागत होते. उन्हाळा व पावसाळ्यात रस्त्यावरच उभे राहावे लागत होते. अथवा एखाद्या उपहारगृहाचा आधार घेण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. कधी बसही वेळेवर येत नसल्याने भर रस्त्यावर उभे राहणे विद्यार्थी व विद्यार्थिंनींना नाकीनऊ यायचे. पण, शिक्षणासाठी या साºया अडचणी विद्यार्थी सहन करीत होते. येथील विश्रामगृहाच्या जागेवर नवीन बसस्थानक सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा होत असलेला हा कोंडमारा दूर झाला आहे. नवीन बसस्थानकाचा परिसर विस्तीर्ण व स्वच्छ आहे. परिसरात झाडे आहेत. या परिसराचा उपयोग विद्यार्थी आपापल्या सोयीने बसू शकतात. पाऊस आला तर आडोसा घेण्यासाठी सुविधा आहे. आतापर्यंत विद्यार्थी राम मंदिर व टी पाईंट या चौकातून सोयीने प्रवास करीत होते. नवीन बसस्थानकामुळे बहुतेक विद्यार्थी आता नवीन बसस्थानकातच येत असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांसोबतच इतर प्रवाशीही याच बसस्थानकातून पुढचा प्रवास करतात. बसस्थानकात दिवसभर चांगलीच गर्दी असते. बसस्थानकात प्रवाशांच्या दृष्टीने मूलभूत सुविधांची आवश्यक आहे. त्या मूलभूत सुविधा राज्य परिवहन मंडळाने त्वरित उपलब्ध करून देण्याची गरज आहेसुविधांमध्ये वाढ करण्याची मागणीतालुक्यातून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. त्यामुळे बसस्थानकात मोठी गर्दी असते. परंतु, प्रवाशांच्या दृष्टीने मूलभूत सुविधांची आवश्यकता आहे. शिवाय, ग्रामीण विद्यार्थ्यांकरिता वाढीव सुरू केल्यास अडचणी दूर होऊ शकतात. राज्य परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक व पालकांनी केली आहे.