शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नवीन बसस्थानकामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांची समस्या सुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:40 IST

नागभीड येथे विश्रामगृहाच्या जागेवर सुरू करण्यात आलेले नवीन बसस्थानक अनेकांना गैरसोयीचे वाटत आहे. पण, ग्रामीण भागातून येणाऱ्या शहरात शिक्षणासाठी येणाºया शेकडो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय सोयीचे झाले आहे. नवीन बसस्थानकाचा परिसर विस्तीर्ण असल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत रस्त्यावर उभे राहण्याची गरच उरली नाही.

ठळक मुद्देये-जा करण्यासाठी सुविधा । शाळेच्या तासिकांना वेळेवर उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड येथे विश्रामगृहाच्या जागेवर सुरू करण्यात आलेले नवीन बसस्थानक अनेकांना गैरसोयीचे वाटत आहे. पण, ग्रामीण भागातून येणाऱ्या शहरात शिक्षणासाठी येणाºया शेकडो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय सोयीचे झाले आहे. नवीन बसस्थानकाचा परिसर विस्तीर्ण असल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत रस्त्यावर उभे राहण्याची गरच उरली नाही.नागभीड हे तालुक्याचे ठिकाण आहे. संपूर्ण तालुक्यातून शेकडो विद्यार्थी येथे शिकायला येतात. त्यातच शासनाकडून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने बसेसची विनामूल्य सोय केली. परिणामी, शहरात शिकायला येणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नागभीड शहरातील प्रवाशांच्या आवागमणासाठी तीन बसस्थानके होती. पण ही तिन्ही बसस्थानके रस्त्यावरच होती. प्रवाशी आणि विद्यार्थ्यांची बसची दिवसभर प्रतीक्षा करताना कुचंबना व्हायची. मुलींना टोमणे खावे लागत होते. उन्हाळा व पावसाळ्यात रस्त्यावरच उभे राहावे लागत होते. अथवा एखाद्या उपहारगृहाचा आधार घेण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. कधी बसही वेळेवर येत नसल्याने भर रस्त्यावर उभे राहणे विद्यार्थी व विद्यार्थिंनींना नाकीनऊ यायचे. पण, शिक्षणासाठी या साºया अडचणी विद्यार्थी सहन करीत होते. येथील विश्रामगृहाच्या जागेवर नवीन बसस्थानक सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा होत असलेला हा कोंडमारा दूर झाला आहे. नवीन बसस्थानकाचा परिसर विस्तीर्ण व स्वच्छ आहे. परिसरात झाडे आहेत. या परिसराचा उपयोग विद्यार्थी आपापल्या सोयीने बसू शकतात. पाऊस आला तर आडोसा घेण्यासाठी सुविधा आहे. आतापर्यंत विद्यार्थी राम मंदिर व टी पाईंट या चौकातून सोयीने प्रवास करीत होते. नवीन बसस्थानकामुळे बहुतेक विद्यार्थी आता नवीन बसस्थानकातच येत असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांसोबतच इतर प्रवाशीही याच बसस्थानकातून पुढचा प्रवास करतात. बसस्थानकात दिवसभर चांगलीच गर्दी असते. बसस्थानकात प्रवाशांच्या दृष्टीने मूलभूत सुविधांची आवश्यक आहे. त्या मूलभूत सुविधा राज्य परिवहन मंडळाने त्वरित उपलब्ध करून देण्याची गरज आहेसुविधांमध्ये वाढ करण्याची मागणीतालुक्यातून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. त्यामुळे बसस्थानकात मोठी गर्दी असते. परंतु, प्रवाशांच्या दृष्टीने मूलभूत सुविधांची आवश्यकता आहे. शिवाय, ग्रामीण विद्यार्थ्यांकरिता वाढीव सुरू केल्यास अडचणी दूर होऊ शकतात. राज्य परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक व पालकांनी केली आहे.