शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

नवीन बसस्थानकामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांची समस्या सुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:40 IST

नागभीड येथे विश्रामगृहाच्या जागेवर सुरू करण्यात आलेले नवीन बसस्थानक अनेकांना गैरसोयीचे वाटत आहे. पण, ग्रामीण भागातून येणाऱ्या शहरात शिक्षणासाठी येणाºया शेकडो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय सोयीचे झाले आहे. नवीन बसस्थानकाचा परिसर विस्तीर्ण असल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत रस्त्यावर उभे राहण्याची गरच उरली नाही.

ठळक मुद्देये-जा करण्यासाठी सुविधा । शाळेच्या तासिकांना वेळेवर उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड येथे विश्रामगृहाच्या जागेवर सुरू करण्यात आलेले नवीन बसस्थानक अनेकांना गैरसोयीचे वाटत आहे. पण, ग्रामीण भागातून येणाऱ्या शहरात शिक्षणासाठी येणाºया शेकडो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय सोयीचे झाले आहे. नवीन बसस्थानकाचा परिसर विस्तीर्ण असल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत रस्त्यावर उभे राहण्याची गरच उरली नाही.नागभीड हे तालुक्याचे ठिकाण आहे. संपूर्ण तालुक्यातून शेकडो विद्यार्थी येथे शिकायला येतात. त्यातच शासनाकडून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने बसेसची विनामूल्य सोय केली. परिणामी, शहरात शिकायला येणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नागभीड शहरातील प्रवाशांच्या आवागमणासाठी तीन बसस्थानके होती. पण ही तिन्ही बसस्थानके रस्त्यावरच होती. प्रवाशी आणि विद्यार्थ्यांची बसची दिवसभर प्रतीक्षा करताना कुचंबना व्हायची. मुलींना टोमणे खावे लागत होते. उन्हाळा व पावसाळ्यात रस्त्यावरच उभे राहावे लागत होते. अथवा एखाद्या उपहारगृहाचा आधार घेण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. कधी बसही वेळेवर येत नसल्याने भर रस्त्यावर उभे राहणे विद्यार्थी व विद्यार्थिंनींना नाकीनऊ यायचे. पण, शिक्षणासाठी या साºया अडचणी विद्यार्थी सहन करीत होते. येथील विश्रामगृहाच्या जागेवर नवीन बसस्थानक सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा होत असलेला हा कोंडमारा दूर झाला आहे. नवीन बसस्थानकाचा परिसर विस्तीर्ण व स्वच्छ आहे. परिसरात झाडे आहेत. या परिसराचा उपयोग विद्यार्थी आपापल्या सोयीने बसू शकतात. पाऊस आला तर आडोसा घेण्यासाठी सुविधा आहे. आतापर्यंत विद्यार्थी राम मंदिर व टी पाईंट या चौकातून सोयीने प्रवास करीत होते. नवीन बसस्थानकामुळे बहुतेक विद्यार्थी आता नवीन बसस्थानकातच येत असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांसोबतच इतर प्रवाशीही याच बसस्थानकातून पुढचा प्रवास करतात. बसस्थानकात दिवसभर चांगलीच गर्दी असते. बसस्थानकात प्रवाशांच्या दृष्टीने मूलभूत सुविधांची आवश्यक आहे. त्या मूलभूत सुविधा राज्य परिवहन मंडळाने त्वरित उपलब्ध करून देण्याची गरज आहेसुविधांमध्ये वाढ करण्याची मागणीतालुक्यातून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. त्यामुळे बसस्थानकात मोठी गर्दी असते. परंतु, प्रवाशांच्या दृष्टीने मूलभूत सुविधांची आवश्यकता आहे. शिवाय, ग्रामीण विद्यार्थ्यांकरिता वाढीव सुरू केल्यास अडचणी दूर होऊ शकतात. राज्य परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक व पालकांनी केली आहे.