शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

उन्हामुळे घरगुती विजेचा अमर्याद वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण लॉकडाऊन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद आहे. त्यामुळे लहान-मोठे उद्योग बंद असल्याने पंधरवाड्यात विजेच्या मागणीत मोठी घट झाली. मात्र, चंद्रपूर शहराह जिल्ह्यात कडक उन्हाचा तडाखा बसू लागल्याने घरघुती विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती पुढे आली.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : जिल्ह्यातील उन्हाचा पारा पुन्हा भडकणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण लॉकडाऊन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद आहे. त्यामुळे लहान-मोठे उद्योग बंद असल्याने पंधरवाड्यात विजेच्या मागणीत मोठी घट झाली. मात्र, चंद्रपूर शहराह जिल्ह्यात कडक उन्हाचा तडाखा बसू लागल्याने घरघुती विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती पुढे आली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अधिक मागणी होत आहे. उन्हाची तीव्रता जशी वाढेल तशी विजेची मागणी पुन्हा जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.राज्यात विजेची मागणी गेल्या आठवड्यात १४ मेगावॉटपर्यंत नोंदविली गेली होती. त्यात दिवसागणिक वाढ होत गेली. उन्हाळ्यामुळे घरगुती विजेचा वापर वाढल्याने मागणीतही सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे विजेची मागणी वाढली असली तरी मेरिट आॅर्डर डिस्पॅचमुळे राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या महानिर्मितीच्या चार विद्युत केंद्रांना झिरो शेड्युलमुळे बंद ठेवावे लागले आहे. यात नाशिक, कोराडी, परळी व भुसावळ येथील वीजनिर्मिती केंद्रांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या खापरखेडा, पारस, चंद्रपूर या तीन वीजनिर्मिती केंद्राबरोबरच उरण गॅस टर्बाईनच्या हायड्रो, सोलरची अशी महानिर्मितीची ३२९९ मेगावॉट वीजनिर्मिती आहे. त्या तुलनेत खासगी क्षेत्रातील जिंदाल, अदाणी, धारीवाल, एस. डब्ल्यू. पी. जी. एल. आणि इतरांची मिळून ४७३४ मेगावॉट वीजनिर्मिती आहे. खासगी क्षेत्रातील वीजनिर्मिती १४०० मेगावॉटने जास्त आहे. सद्या महावितरणाची मागणी १५ हजार मेगावॉटच्या वर आहे. केंद्राच्या अखत्यारीतील वीज स्वस्त असल्याने महावितरणचा कल तेथील वीज खरेदी करण्याकडे असल्याचे दिसते.एकूणच राज्याची विजेची मागणी १७ हजाराच्या वर गेली असली तरी त्या तुलनेत इतर राज्यांची मागणी कमी असल्याने लॉकडाऊन असेपर्यंत विजेच्या मागणीची स्थिती जैसे थे असण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे. म्हणून महानिर्मितीचे संच आहे त्याच स्थितीत वीज निर्मिती करतील. त्यामुळे सद्यस्थितीत बंद असलेले संच अजूनही काही दिवस बंदच राहतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.कुलर सुरू झालेकोरोनाची दहशत सुरू असतानाच काहींनी कुलर लावल्यास प्रशासन कारवाई करणार, अशी अफवा समाज माध्यमातून पसरविण्यात आली होती. परंतू ती फेक निघाल्याने कुलर सुरू झाले आहेत.

टॅग्स :electricityवीज