शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

आंब्याची आवक घटल्याने चव महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 23:18 IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. बाजारात विविध प्रजाती व किमतीचे आंबे अगदी स्वस्त दरात मिळत होते. मागील हंगामाचा विचार केल्यास यंदा फळांची आवक कमी असल्याने ग्राहकांना पंसतीचे आंबे मिळणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देफ ळ बाजार : शहरातील ग्राहकांकडून कच्च्या आंब्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : उन्हाळ्याची चाहूल लागताच आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. बाजारात विविध प्रजाती व किमतीचे आंबे अगदी स्वस्त दरात मिळत होते. मागील हंगामाचा विचार केल्यास यंदा फळांची आवक कमी असल्याने ग्राहकांना पंसतीचे आंबे मिळणे कठीण झाले आहे.गेल्यावर्षी दशहरी, बेगनपल्ली, गावराणी आंब्यांनी शहरातील बाजारपेठ फुलून गेली होती. मात्र, यंदा बेगनपल्ली आंब्याव्यतिरिक्त अन्य अन्य प्रजातींची फळे आली नाहीत. मागील वर्षी दशहरी व अन्य आंबे ६० ते ७० रुपये आणि अखेरीस ३० रुपये किलो दराने मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले होते. त्यामुळे ग्राहकांना चव चाखता आली. परंतु, यंदा अजूनही बाजारात विविध प्रकारचा आंबा मुबलक व वाजवी दराने उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांना खरेदी करण्यासाठी विचार करावा लागत आहे. सध्या बेगनपल्ली हा एकमेव आंबा बाजारात कमी प्रमाणात दिसत आहे. पण, त्याचाही भाव २०० रुपये किलोच्या घरात आहे. सुरुवातीला शहरात बेगनपल्ली, दशेरी व लालबाग व हापूस आंबे मोठ्या प्रमाणात नागपूर व अन्य ग्रामीण भागातून बाजारपेठातून येत होते. पण, यावर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यात वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसल्याने आंब्याची आवक कमी झाल्याचे दिसून येत आहे.वादळी तडाख्याचा परिणामबेगनपल्ली आंब्याचा रस मुख्यत्वे मोठ्या प्रमाणावर केला जातो. कमी किमतीने उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्यांना परवडण्यासारखे असते. यावर्षी त्याचाही दर १५० ते २०० रुपये किलो आहे. पण, मागणीप्रमाणे पुरवठा नाही. त्यामुळे आंब्याची चव महागली आहे. मे महिन्यात आवक वाढल्यास सर्व प्रकारचे आंबा उपलब्ध होऊ शकतात. वादळी तडाख्याने आवक कमी असल्याची माहिती विक्रेत्यांंनी दिली.