शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निधीअभावी सिंचन विहिरी रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:28 IST

सध्या तालुक्यात धडक सिंचन विहिर योजनेची कामे जोमाने सुरु आहेत. खोदकाम केलेल्या लाभार्थ्यांला मार्च एंडीगमुळे तत्काळ काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

ठळक मुद्देजनावरांना धोका : अनुदान मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त

ऑनलाईन लोकमतपोंभुर्णा : सध्या तालुक्यात धडक सिंचन विहिर योजनेची कामे जोमाने सुरु आहेत. खोदकाम केलेल्या लाभार्थ्यांला मार्च एंडीगमुळे तत्काळ काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र मंजूर झालेल्या विहिरीचे खोदकाम करूनही दोन महिन्यांपासून अनुदान मिळत नसल्याने अनेकांच्या विहिरींचे बांधकाम रखडले आहे. खोदकाम केलेल्या खड्ड्यांमुळे जनावरांना धोका निर्माण झाला आहे.पोंभुर्णा पंचायत समिती अंतर्गत तालुक्यात सर्वत्र धडक सिंचन विहिर योजनेची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक शेतकºयांच्या विहिरीचे बांधकाम अंतिम टप्प्यामध्ये आहे. काही शेतकºयांनी खोदकाम करून काम सुरू न केल्याने त्यांना काम सुरू करण्याचे आदेश पंचायत समिती स्तरावरुन देण्यात येत आहे. तर दुसरीकडे मंजूर विहिरीचे लेआऊट देवून खोदकाम केल्यानंतर दोन महिने लोटूनही पंचायत समितीकडून अनुदान मिळाले नाही. त्यामुळे मय्यत लाभार्थी शेतकºयांचे वारसान पोंभूर्णा पं.स. कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून उंबरठे झिजवत आहेत.संबंधित शेतकºयांनी वडीलाच्या निधनानंतर तलाठी कार्यालयात फेरफार करून सातबारावर आपले नाव चढविले. इतर वारसानचे संमतीपत्र व शपथपत्र जोडून सुद्धा अजूनपर्यंत खोदकाम केलेल्या कामाचे अनुदान मिळत नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत. परिणामी परिसरामध्ये अशा खोदकाम करून ठेवलेल्या खड्ड्यांमुळे लहान जनावरे पाणी पिण्यासाठी जावून पडल्याने किरकोळ घटना घडत आहेत. त्यातच लहान मुले गोवऱ्या वेचण्यासाठी शिवारामध्ये जात असतात आणि पाणी पिण्यासाठी खड्ड्यात उतरतात. त्यामुळे त्यांचा तोल जावून त्यांना सुद्धा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.परिसरातील जनावरांना व लहान मुलांना भविष्यात धोका निर्माण होणार नाही, यासाठी खोदकाम करण्यात आलेल्या सिंचन विहिरीचे अनुदान तत्काळ देण्यात यावे. जेणेकरून संबंधित लाभार्थ्याला बांधकाम करणे सोयीचे होईल. पंचायत समिती प्रशासनाने याची वेळीच दखल घेवून लाभार्थ्यांना सिंचन विहिरींचे अनुदान वितरीत करून पायपीट थांबविण्याची मागणी होत आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून विहिरींचे बांधकाम करण्यात येत असून अनेक शेतकºयांना शेतातच सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांनी विहिर बांधकामासाठी अर्ज केले आहेत.मृत लाभार्थी शेतकºयांच्या वारसानचे प्रस्ताव आले. परंतु, त्यांच्या वारसांना अनुदान देण्यासाठी मय्यत लाभार्थ्यांच्या नावाऐवजी वारसानचे नाव चढविण्याचा अधिकार एसडीओ व जिल्हाधिकारी कार्यालयाला आहे. सदर प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविले असून त्यांच्याकडून मंजुरी आल्यास अनुदान दिले जाईल. परिसरातील खोदकाम केलेल्या खड्ड्यांमध्ये धोका उद्भवू नये यासाठी संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना लाभार्थ्यांच्या भेटी घेवून बांबूचे संरक्षण करण्याची सूचना देण्यात आली आहे.- शशिकांत शिंदे,संवर्ग विकास अधिकारी,पोंभूर्णा