शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

वैनगंगा नदीच्या पुरामुळे नदीकाठची शेती झाली वाळवंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST

ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव, कोलारी, अऱ्हेर नवरगाव, भालेश्वर, चिखलगाव, पिंपळगाव (भो), लाडज, हरदोली, चिंचोली, सोनेगाव, सोंद्री, सावलगाव, बेटाळा, बोळेगाव, जुगनाळा, मांगली, बेलपातळी, किन्ही, रणमोचन, खरकाडा, निलज, रूई, पाचगाव, बरडकिन्ही, चिचगाव, हळदा, आवळगाव शिवारातील शेतजमीन पुराच्या पाण्याखाली आल्याने पूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावले : तालुक्यातील २५ हजार हेक्टर शेतीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : गोसेखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग होण्यासाठी ३३ दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर आल्याने वैनगंगा नदीकाठावरील निलज, पिंपळगाव, खरकाड परिसरातील शेतीला रेतीमुळे वाळवंटाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे काही वर्ष पिकच घेता येणार नाही, या प्रश्नाने शेतकरी भीती व्यक्त केली जात आहे.पुरामुळेशेतकऱ्यांची शेतातील मोटरपंप, पाईप, वीज मीटर वाहुन गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील सुमारे २५ हजार हेक्टर शेतजमीन पुराच्या पाण्याखाली आली होती. नदीकाठावर असलेल्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हाहाकार उडाला होता. ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव, कोलारी, अऱ्हेर नवरगाव, भालेश्वर, चिखलगाव, पिंपळगाव (भो), लाडज, हरदोली, चिंचोली, सोनेगाव, सोंद्री, सावलगाव, बेटाळा, बोळेगाव, जुगनाळा, मांगली, बेलपातळी, किन्ही, रणमोचन, खरकाडा, निलज, रूई, पाचगाव, बरडकिन्ही, चिचगाव, हळदा, आवळगाव शिवारातील शेतजमीन पुराच्या पाण्याखाली आल्याने पूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे या सर्व पूरग्रस्त शेतीचे पंचनामे करून तातडीने मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मत्स्य व्यावसायिकांचे नाव गेले वाहूनवैनगंगा नदीमध्ये ढिवर समाज बांधव अनेक वर्षांपासून मासेमारी करून प्रपंच चालवतात. महापुरामूळे मासेमारी करणाºया अनेकांचे नाव वाहून केले. शासनाने नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करताना पारंपरिक मत्स्य व्यावसायिकांकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी निलज येथील भारत मांढरे आदींसह अनेकांनी केली आहे.

 

टॅग्स :floodपूरagricultureशेती