शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
4
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
5
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
9
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
10
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
11
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
12
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
13
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
14
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
15
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
16
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
17
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
18
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
20
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ

पुरामुळे शेकडो हेक्टरवरील पिके कुजण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:06 IST

पुरामुळे कापूस व सोयाबीन पिके दोन दिवसांपासून पाण्याखाली आहेत. यामुळे शेकडो हेक्टरवरील शेती कुजण्याच्या मार्गावर आली आहे. याचा सर्वाधिक फटका राजुरा, बल्लारपूर, व कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे.

ठळक मुद्देपुराचा तडाखा : राजुरा, बल्लारपूर, कोरपना तालुक्यात सर्वाधिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पुरामुळे कापूस व सोयाबीन पिके दोन दिवसांपासून पाण्याखाली आहेत. यामुळे शेकडो हेक्टरवरील शेती कुजण्याच्या मार्गावर आली आहे. याचा सर्वाधिक फटका राजुरा, बल्लारपूर, व कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. गतवर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस नष्ट झाला होता. यंदा पुराच्या पाण्यामुळे उत्पादनावर अनिष्ठ परिणाम होणार असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.राजुरा, बल्लारपूर, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुक्यात मागील चार दिवसांपासून संततधार पाऊस पडला. वैनगंगा व वर्धा नदीला पूर आल्याने नाल्याच्या सहाय्याने पुराचे पाणी शेतात शिरले. मागील दोन दिवसांपासून शेकडो हेक्टर पीक पुराच्या पाण्याखाली आहे. यामध्ये सोयाबीन व कापसाचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती पुढे आली आहे. वर्धा नदीला लागून असलेल्या सर्वच नाल्यांना पूर आला . पुराचे पाणी थेट शेतात शिरल्याने पीक कुजण्याचा धोका निर्माण झाला. गतवर्षी तालुक्यांमध्ये सुरूवातीला पावसाचे प्रमाण अल्प होते. पेरणी झाल्यानंतर पावसाने वेग धरला. मात्र पूर येईल, अशी स्थिती मागील वर्षी निर्माण झाली होती. यंदा वैनगंगा व वर्धा नदीला पूर आल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील शेती पाण्याखाली आली आहे. पूर ओसरण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील, अशी माहिती शेतकºयांनी दिली.धान पिकाचेही नुकसानराजुरा, बल्लारपूर, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुक्यात कापूस, सोयाबी सोबतच भाताची शेती केली जाते. बहुतांश शेतकºयांची शेती नाल्याच्या काठावर आहे. पुराचे पाणी नाल्यात शिरून शेतात पसरले. याचा धान पिकालाही फटका बसला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर