शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

दुष्काळामुळे रोहयो मजुरांची ‘रेकॉर्ड ब्रेक’ उपस्थिती

By admin | Updated: May 12, 2015 00:58 IST

चंद्रपूर : यावर्षीच्या दुष्काळग्रस्त परिस्थतीमुळे रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांच्या उपस्थितीची ‘रेकॉर्ड ब्रेक’ नोंद झाली

५० हजारांचा आकडा पार : जिल्हाभरात कामांना सुरूवात चंद्रपूर : यावर्षीच्या दुष्काळग्रस्त परिस्थतीमुळे रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांच्या उपस्थितीची ‘रेकॉर्ड ब्रेक’ नोंद झाली आहे. आतापर्यंत रोजगार हमी योजनेर्तंगत जिल्ह्यात झालेल्या कामांवर ४० हजारच्या आसपास मजुरांची संख्या असायची. मात्र यावर्षी हा आकडा पार झाला असून गत आठवड्यात तब्बल ५० हजार ४८४ मजुरांची रोहयो कामांवर उपस्थिती होती. गतवर्षीच्या खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक घेता आले नाही. तर उशीरा आलेल्या पावसामुळे दोन ते तीन वेळा पेरणी करावी लागली. याचा फटका सहन करून शेतकऱ्यांनी कसेतरी पिकांची लागवड केली. मात्र पावसाने पून्हा दगा दिला. त्यामुळे हाती आलेले पीक करपून गेले. यात अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता. निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थीवर मात करण्यासाठी व हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांना काम देण्यासाठी शासनाने रोजगार हमी योजनेच्या कामांना लवकर सुरूवात केली. ग्रामीण भागात रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने ग्रामीणांत नैराश्य होते. मात्र रोहयो कामांमुळे आर्थिक टंचाईच्या खाईत सापडलेले शेतकरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी या कामांवर जाण्यास पसंती दिली. त्यामुळे मजुरांची उपस्थिती रेकॉर्ड ब्रेक झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यभरात कामे केली जात असून शंभर दिवसाचे काम देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे गावस्तरावर विहिर बांधकाम, तलाव खोलीकरण, रस्ता काम, रोपवन अशाप्रकारची कामे रोजगार हमी योजनेतून केली जात आहेत. ग्रामपंचायत स्तर व यंत्रणेमार्फत ही कामे केली जात आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)ग्रामपंचायत स्तरावर सर्वाधिक कामेचंद्रपूर जिल्ह्यात सध्यास्थितीत रोजगार हमी योजनेर्तंगत ११६९ कामे सुरू आहेत. यात सर्वाधिक १००१ कामे ग्राम पंचायत स्तरावर सुरू असून यंत्रणेमार्फत १६८ कामे सुरू आहेत. ग्राम पंंचायत स्तरावरील कामांवर ४८ हजार ६८१ तर यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या कामांवर १८०३ मजुरांची उपस्थिती आहे. शेल्फवरील कामांमुळे रोजगाराचा प्रश्न मिटलाजिल्ह्यात सध्यास्थितीत ११६९ कामे सुरू असली तरी शेल्फवर ११ हजार ६१७ कामे ठेवण्यात आली आहेत. मजुरांकडून रोजगाराची मागणी झाल्यास ही कामे केव्हाही सुरू करता येणार आहेत. या कामांची ७४.३६ लाख मजुर क्षमता आहे. त्यामुळे सध्यास्थितीत कोणत्याही ग्रामीण नागरिकाला मजुरीसाठी भटकंती करण्याची गरज नाही.मजुरीप्रती असंतोष ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांची लक्षणीय वाढ असली तरी मजुरीप्रति असंतोष दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रोहयो मजुरीत केवळ १३ रूपयांची वाढ शासनाने केली आहे. खासगी कामांवर यापेक्षा दुप्पट मजुरी मिळत असल्याने जोखीम पत्करून करावे लागणाऱ्या रोहयो कामाची मजुरी वाढविण्याची मागणी आहे. रोजगार हमी योजनेर्तंगत जिल्ह्यात अनेक कामे सुरू आहेत. मजुराला काम देण्याची जबाबदारी प्रशासनाची असून कोणताही मजुर कामासाठी भटकंती करू नये, यासाठी ग्रामपंचायत स्तर व यंत्रणेमार्फत कामे सुरू आहेत. यावर्षीच्या दुष्काळी परिस्थीतीमुळे रोहयो कामांवर मजुरांची लक्षणीय उपस्थिती दिसून येत आहे. - विनोद हरकांडेउपजिल्हाधिकारी रोहयो, चंद्रपूर.