शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या चंद्रपूरवरच्या भाराला उदासीनता कारणीभूत

By admin | Updated: November 20, 2014 22:48 IST

तब्बल ५०० वर्षे जुन्या असलेल्या चंद्रपूर शहराला वैभवी इतिहास असला तरी, या इतिहासाच्या पाऊलखुणा पुसत चंद्रपुरातील पराकोटात वस्तीला वस्ती भीडत आहे. यामुळे पराकोटातील परिसरात

पूरक्षेत्रात वाढतेयं वस्ती : पराकोटात माणसांची दाटीगोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरतब्बल ५०० वर्षे जुन्या असलेल्या चंद्रपूर शहराला वैभवी इतिहास असला तरी, या इतिहासाच्या पाऊलखुणा पुसत चंद्रपुरातील पराकोटात वस्तीला वस्ती भीडत आहे. यामुळे पराकोटातील परिसरात माणसांची आणि वाहनांची दाटी झाली आहे. या दाटलेल्या वस्तीचा पूर आता चक्क पूरग्रस्त क्षेत्रातही पोहचल्याने भविष्यात चंद्रपूर महानगर पालिकेची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसायला लागली आहे.चंद्रपूरचा नियोजन आराखडा नगर रचना विभागाने आखला असला तरी तो राबविलेला कुठेच दिसत नाही. गेल्या २० वर्षात त्याची अंमलबजावणीच न झाल्याने शहराची अवस्था विकोपाला गेली आहे. जनप्रतिनिधींनीही या विषयाकडे कधीच गांभीर्याने न पाहिल्याने जनता त्यांनाही दोषाचे वाटेकरी मानत आहेत. पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने २५० कोटींचा निधी घोषित झाला होता. मात्र मिळालेल्या २५ कोटी रूपयांचा पूर्ण खर्चही प्रशासनाला आणि महानगरपालिकेला करता आला नाही. आता तर, या २५० कोटींच्या निधीची फाईलच बंद झाल्याचे वित्तमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढचा निधी पदरात पडेपर्यंत विकासाचे भविष्य धूसरच आहे.चंद्रपूरच्या विकासाची ही अवस्था लक्षात घेऊन १९९३ मध्ये जुळ्या चंद्रपूरची आखणी करण्यात आली. त्यावर खर्चही झाला. मात्र हा विषय नागरिकांच्या मनात उतरविण्याचे म्हणावे तसे प्रयत्न प्रशानसाकडून झालेच नाही. परिणामत: शहरातील वाढती वस्ती जुळ्या चंद्रपूरकडे प्रवाहित झालीच नाही. पराकोटातील आहे त्याच मर्यादित जागेत जनता वास्तव्याला राहिली. या स्थितीचा फायदा घेत सक्रिय झालेल्या बिल्डर लॉबीने चक्क पूरप्रवण क्षेत्रात वसाहतीसाठी प्लॉट पाडले. सदनिका उभारल्या. महत्वाचे म्हणजे या सदनिकांना महानगर पालिकेने परवानगीही दिली. पराकोटाबाहेरील पठाणपुरा गेट, बिनबा गेट बाहेरील भूखंड आणि सदनिकांची योजना हे त्याचे नमुनेदार उदाहरण आहे.कोट्यवधी रूपये खर्च करून जुळ्या चंद्रपूरमध्ये वसाहत निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. त्यासाठी खुटाळा, दाताळा, कोसारा, लखमापूर रिठ या गावांचा अंतर्भाव करण्यात आला, हेसुद्धा खरे आहे. मात्र या परिसरात वसाहत वाढावी, यासाठी प्रयत्न मात्र कुणीही केले नाहीत. एमआयडीसीसाठी पुरक ठरू पहाणाऱ्या या नव्या वसाहतीमध्ये लोकवस्ती वाढावी, यासाठी जनप्रतिनिधींनीही आजवर नेटाने प्रयत्न केले नाही. अधिकाऱ्यांचीही सदैव कमतरता राहिली. त्यांच्या इच्छाशक्तीच्या अभावाने नवे चंद्रपूर ओसाडच राहिले.