शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
2
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
3
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
4
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
7
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
8
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
9
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
10
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
11
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
12
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
13
सुनेवर अत्याचार, पतीचं बाहेर अफेअर; दीप्तीच्या भावाने 'कमला पसंद'च्या मालकाच्या कुटुंबावर केले आरोप!
14
बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले
15
चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन
16
घरासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सरकारी बँकांवर जास्त भरोसा; ४० टक्के कर्ज ७५ लाखांपेक्षा अधिक
17
MCX च्या शेअरनं गाठला ₹१०,२५० चा उच्चांकी स्तर; ₹१२,५०० पर्यंत जाऊ शकतो भाव, काय म्हणाले एक्सपोर्ट
18
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
19
'टेस्ला मॉडेल Y' भारतात २० लाखांनी स्वस्त होणार? कंपनीचा मोठा दावा, किंमत नाही, मालकी खर्च कमी होणार...
20
अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या चंद्रपूरवरच्या भाराला उदासीनता कारणीभूत

By admin | Updated: November 20, 2014 22:48 IST

तब्बल ५०० वर्षे जुन्या असलेल्या चंद्रपूर शहराला वैभवी इतिहास असला तरी, या इतिहासाच्या पाऊलखुणा पुसत चंद्रपुरातील पराकोटात वस्तीला वस्ती भीडत आहे. यामुळे पराकोटातील परिसरात

पूरक्षेत्रात वाढतेयं वस्ती : पराकोटात माणसांची दाटीगोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरतब्बल ५०० वर्षे जुन्या असलेल्या चंद्रपूर शहराला वैभवी इतिहास असला तरी, या इतिहासाच्या पाऊलखुणा पुसत चंद्रपुरातील पराकोटात वस्तीला वस्ती भीडत आहे. यामुळे पराकोटातील परिसरात माणसांची आणि वाहनांची दाटी झाली आहे. या दाटलेल्या वस्तीचा पूर आता चक्क पूरग्रस्त क्षेत्रातही पोहचल्याने भविष्यात चंद्रपूर महानगर पालिकेची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसायला लागली आहे.चंद्रपूरचा नियोजन आराखडा नगर रचना विभागाने आखला असला तरी तो राबविलेला कुठेच दिसत नाही. गेल्या २० वर्षात त्याची अंमलबजावणीच न झाल्याने शहराची अवस्था विकोपाला गेली आहे. जनप्रतिनिधींनीही या विषयाकडे कधीच गांभीर्याने न पाहिल्याने जनता त्यांनाही दोषाचे वाटेकरी मानत आहेत. पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने २५० कोटींचा निधी घोषित झाला होता. मात्र मिळालेल्या २५ कोटी रूपयांचा पूर्ण खर्चही प्रशासनाला आणि महानगरपालिकेला करता आला नाही. आता तर, या २५० कोटींच्या निधीची फाईलच बंद झाल्याचे वित्तमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढचा निधी पदरात पडेपर्यंत विकासाचे भविष्य धूसरच आहे.चंद्रपूरच्या विकासाची ही अवस्था लक्षात घेऊन १९९३ मध्ये जुळ्या चंद्रपूरची आखणी करण्यात आली. त्यावर खर्चही झाला. मात्र हा विषय नागरिकांच्या मनात उतरविण्याचे म्हणावे तसे प्रयत्न प्रशानसाकडून झालेच नाही. परिणामत: शहरातील वाढती वस्ती जुळ्या चंद्रपूरकडे प्रवाहित झालीच नाही. पराकोटातील आहे त्याच मर्यादित जागेत जनता वास्तव्याला राहिली. या स्थितीचा फायदा घेत सक्रिय झालेल्या बिल्डर लॉबीने चक्क पूरप्रवण क्षेत्रात वसाहतीसाठी प्लॉट पाडले. सदनिका उभारल्या. महत्वाचे म्हणजे या सदनिकांना महानगर पालिकेने परवानगीही दिली. पराकोटाबाहेरील पठाणपुरा गेट, बिनबा गेट बाहेरील भूखंड आणि सदनिकांची योजना हे त्याचे नमुनेदार उदाहरण आहे.कोट्यवधी रूपये खर्च करून जुळ्या चंद्रपूरमध्ये वसाहत निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. त्यासाठी खुटाळा, दाताळा, कोसारा, लखमापूर रिठ या गावांचा अंतर्भाव करण्यात आला, हेसुद्धा खरे आहे. मात्र या परिसरात वसाहत वाढावी, यासाठी प्रयत्न मात्र कुणीही केले नाहीत. एमआयडीसीसाठी पुरक ठरू पहाणाऱ्या या नव्या वसाहतीमध्ये लोकवस्ती वाढावी, यासाठी जनप्रतिनिधींनीही आजवर नेटाने प्रयत्न केले नाही. अधिकाऱ्यांचीही सदैव कमतरता राहिली. त्यांच्या इच्छाशक्तीच्या अभावाने नवे चंद्रपूर ओसाडच राहिले.