शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
4
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
5
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
6
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
7
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
8
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
9
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
10
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
11
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
12
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
13
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
14
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
15
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
16
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
17
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
18
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
19
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
20
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!

जुन्या चंद्रपूरवरच्या भाराला उदासीनता कारणीभूत

By admin | Updated: November 20, 2014 22:48 IST

तब्बल ५०० वर्षे जुन्या असलेल्या चंद्रपूर शहराला वैभवी इतिहास असला तरी, या इतिहासाच्या पाऊलखुणा पुसत चंद्रपुरातील पराकोटात वस्तीला वस्ती भीडत आहे. यामुळे पराकोटातील परिसरात

पूरक्षेत्रात वाढतेयं वस्ती : पराकोटात माणसांची दाटीगोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरतब्बल ५०० वर्षे जुन्या असलेल्या चंद्रपूर शहराला वैभवी इतिहास असला तरी, या इतिहासाच्या पाऊलखुणा पुसत चंद्रपुरातील पराकोटात वस्तीला वस्ती भीडत आहे. यामुळे पराकोटातील परिसरात माणसांची आणि वाहनांची दाटी झाली आहे. या दाटलेल्या वस्तीचा पूर आता चक्क पूरग्रस्त क्षेत्रातही पोहचल्याने भविष्यात चंद्रपूर महानगर पालिकेची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसायला लागली आहे.चंद्रपूरचा नियोजन आराखडा नगर रचना विभागाने आखला असला तरी तो राबविलेला कुठेच दिसत नाही. गेल्या २० वर्षात त्याची अंमलबजावणीच न झाल्याने शहराची अवस्था विकोपाला गेली आहे. जनप्रतिनिधींनीही या विषयाकडे कधीच गांभीर्याने न पाहिल्याने जनता त्यांनाही दोषाचे वाटेकरी मानत आहेत. पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने २५० कोटींचा निधी घोषित झाला होता. मात्र मिळालेल्या २५ कोटी रूपयांचा पूर्ण खर्चही प्रशासनाला आणि महानगरपालिकेला करता आला नाही. आता तर, या २५० कोटींच्या निधीची फाईलच बंद झाल्याचे वित्तमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढचा निधी पदरात पडेपर्यंत विकासाचे भविष्य धूसरच आहे.चंद्रपूरच्या विकासाची ही अवस्था लक्षात घेऊन १९९३ मध्ये जुळ्या चंद्रपूरची आखणी करण्यात आली. त्यावर खर्चही झाला. मात्र हा विषय नागरिकांच्या मनात उतरविण्याचे म्हणावे तसे प्रयत्न प्रशानसाकडून झालेच नाही. परिणामत: शहरातील वाढती वस्ती जुळ्या चंद्रपूरकडे प्रवाहित झालीच नाही. पराकोटातील आहे त्याच मर्यादित जागेत जनता वास्तव्याला राहिली. या स्थितीचा फायदा घेत सक्रिय झालेल्या बिल्डर लॉबीने चक्क पूरप्रवण क्षेत्रात वसाहतीसाठी प्लॉट पाडले. सदनिका उभारल्या. महत्वाचे म्हणजे या सदनिकांना महानगर पालिकेने परवानगीही दिली. पराकोटाबाहेरील पठाणपुरा गेट, बिनबा गेट बाहेरील भूखंड आणि सदनिकांची योजना हे त्याचे नमुनेदार उदाहरण आहे.कोट्यवधी रूपये खर्च करून जुळ्या चंद्रपूरमध्ये वसाहत निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. त्यासाठी खुटाळा, दाताळा, कोसारा, लखमापूर रिठ या गावांचा अंतर्भाव करण्यात आला, हेसुद्धा खरे आहे. मात्र या परिसरात वसाहत वाढावी, यासाठी प्रयत्न मात्र कुणीही केले नाहीत. एमआयडीसीसाठी पुरक ठरू पहाणाऱ्या या नव्या वसाहतीमध्ये लोकवस्ती वाढावी, यासाठी जनप्रतिनिधींनीही आजवर नेटाने प्रयत्न केले नाही. अधिकाऱ्यांचीही सदैव कमतरता राहिली. त्यांच्या इच्छाशक्तीच्या अभावाने नवे चंद्रपूर ओसाडच राहिले.