शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

जुन्या चंद्रपूरवरच्या भाराला उदासीनता कारणीभूत

By admin | Updated: November 20, 2014 22:48 IST

तब्बल ५०० वर्षे जुन्या असलेल्या चंद्रपूर शहराला वैभवी इतिहास असला तरी, या इतिहासाच्या पाऊलखुणा पुसत चंद्रपुरातील पराकोटात वस्तीला वस्ती भीडत आहे. यामुळे पराकोटातील परिसरात

पूरक्षेत्रात वाढतेयं वस्ती : पराकोटात माणसांची दाटीगोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरतब्बल ५०० वर्षे जुन्या असलेल्या चंद्रपूर शहराला वैभवी इतिहास असला तरी, या इतिहासाच्या पाऊलखुणा पुसत चंद्रपुरातील पराकोटात वस्तीला वस्ती भीडत आहे. यामुळे पराकोटातील परिसरात माणसांची आणि वाहनांची दाटी झाली आहे. या दाटलेल्या वस्तीचा पूर आता चक्क पूरग्रस्त क्षेत्रातही पोहचल्याने भविष्यात चंद्रपूर महानगर पालिकेची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसायला लागली आहे.चंद्रपूरचा नियोजन आराखडा नगर रचना विभागाने आखला असला तरी तो राबविलेला कुठेच दिसत नाही. गेल्या २० वर्षात त्याची अंमलबजावणीच न झाल्याने शहराची अवस्था विकोपाला गेली आहे. जनप्रतिनिधींनीही या विषयाकडे कधीच गांभीर्याने न पाहिल्याने जनता त्यांनाही दोषाचे वाटेकरी मानत आहेत. पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने २५० कोटींचा निधी घोषित झाला होता. मात्र मिळालेल्या २५ कोटी रूपयांचा पूर्ण खर्चही प्रशासनाला आणि महानगरपालिकेला करता आला नाही. आता तर, या २५० कोटींच्या निधीची फाईलच बंद झाल्याचे वित्तमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढचा निधी पदरात पडेपर्यंत विकासाचे भविष्य धूसरच आहे.चंद्रपूरच्या विकासाची ही अवस्था लक्षात घेऊन १९९३ मध्ये जुळ्या चंद्रपूरची आखणी करण्यात आली. त्यावर खर्चही झाला. मात्र हा विषय नागरिकांच्या मनात उतरविण्याचे म्हणावे तसे प्रयत्न प्रशानसाकडून झालेच नाही. परिणामत: शहरातील वाढती वस्ती जुळ्या चंद्रपूरकडे प्रवाहित झालीच नाही. पराकोटातील आहे त्याच मर्यादित जागेत जनता वास्तव्याला राहिली. या स्थितीचा फायदा घेत सक्रिय झालेल्या बिल्डर लॉबीने चक्क पूरप्रवण क्षेत्रात वसाहतीसाठी प्लॉट पाडले. सदनिका उभारल्या. महत्वाचे म्हणजे या सदनिकांना महानगर पालिकेने परवानगीही दिली. पराकोटाबाहेरील पठाणपुरा गेट, बिनबा गेट बाहेरील भूखंड आणि सदनिकांची योजना हे त्याचे नमुनेदार उदाहरण आहे.कोट्यवधी रूपये खर्च करून जुळ्या चंद्रपूरमध्ये वसाहत निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. त्यासाठी खुटाळा, दाताळा, कोसारा, लखमापूर रिठ या गावांचा अंतर्भाव करण्यात आला, हेसुद्धा खरे आहे. मात्र या परिसरात वसाहत वाढावी, यासाठी प्रयत्न मात्र कुणीही केले नाहीत. एमआयडीसीसाठी पुरक ठरू पहाणाऱ्या या नव्या वसाहतीमध्ये लोकवस्ती वाढावी, यासाठी जनप्रतिनिधींनीही आजवर नेटाने प्रयत्न केले नाही. अधिकाऱ्यांचीही सदैव कमतरता राहिली. त्यांच्या इच्छाशक्तीच्या अभावाने नवे चंद्रपूर ओसाडच राहिले.