शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

कोळशाच्या धुळीने कामगारांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 22:50 IST

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, सास्ती, गोवरी डीप, पोवनी-०२, खुल्या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात धूळप्रदूषण होत आहे. परिणामी कोळशाच्या उडणाऱ्या धुळीने वेकोलित काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाल्याने वेकोलित नियमांची एैसीतैसी झाली आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : वेकोलित नियमांची एैशीतैसी

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, सास्ती, गोवरी डीप, पोवनी-०२, खुल्या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात धूळप्रदूषण होत आहे. परिणामी कोळशाच्या उडणाऱ्या धुळीने वेकोलित काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाल्याने वेकोलित नियमांची एैसीतैसी झाली आहे.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात भूमीगत व खुल्या कोळसा खाणी आहे. वेकोलिच्या गोवरी, पोवनी, सास्ती, गोवरी डीप, पोवनी-०२, खुल्या कोळसा खाणीत मागील अनेक वर्षांपासून वेकोलिचे कामगार कोळशाच्या धुराळ्यात काम करतात. मात्र धुळीवर नियंत्रण ठेवण्याची कायमस्वरूपी उपाययोजना वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत केली नाही. त्यामुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.कामगार ज्या कोळसा खाणीत काम करतात. त्या खाणीतील कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी वेकोलिच्या जबाबदार अधिकाºयांची असते. वेकोलि वर्षाकाठी कोरडो रुपयांचा नफा कमावते. मात्र कामगारांच्या आरोग्यासाठी कोणतीच उपाययोजना करीत नाही. वेकोलित दिवसरात्र कोळसा घेवून जाणाºया ट्रकांचे आवागमन असते. वेकोलि परीसर धुळीने पूर्णत: काळवंडल्याने ट्रक जवळून गेला तर धुळीमुळे समोरचे काहीच दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उपाययोजना गरजेची आहे.विविध रोगांची लागणवेकोलिमध्ये मोठ्या प्रमाणात धुळ उडत असते. याच वातावरणात कामगार काम करीत असतात. मात्र विभागाकडून उपाययोजना होत नसल्यामुळे त्याना श्वसनासंबंधिच्या विविध आजाराला सामोर जावे लागत आहे. कोळसा खाणीत किंवा एखाद्या मोठ्या कारखाण्यात प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. मात्र याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी कामगारांचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.