शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

धान पीक पाण्याअभावी वाळले

By admin | Updated: October 28, 2014 22:53 IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. परंतु निसर्गांच्या लहरीपणामुळे आणि शासनाच्या धोरणामुळे शेतकरी नागविल्या जात आहे. सध्या शेतकरी मोठ्या

नवरगाव : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. परंतु निसर्गांच्या लहरीपणामुळे आणि शासनाच्या धोरणामुळे शेतकरी नागविल्या जात आहे. सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. पाण्याअभावी धान पिक वाळत आहे. त्यामुळे शेतकरी धानाची पात कापून गुरांना चारा टाकत आहे.यावर्षी पावसाने जून-जुलै मध्येच पाठ फिरविली. त्यानंतर पाऊस आला आणि शेतकरी शेतीच्या कामाला लागले. कशीबशी धान रोवणीची कामे केली मात्र निसर्गाने पाठ फिरविली. सिंदेवाही तालुक्यात भात (धान) पीक हे मुख्य असून संपूर्ण शेती निसर्गावर अवलंबून आहे. शेतकरी धान पीक घेतो आणि त्यावरच कुटुंबाची गुजराण करतो. मुलांचे शिक्षण औषध दवाखाना आदी सर्व खर्च शेतीतून आलेल्या पिकांवरच करावा लागतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी शेतकऱ्याचे कंबरडे मोडत आहे. त्यातच शासनही शेतपिकांना योग्य भाव देत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.यावर्षी निसर्गाने पाठ फिरविली असल्याने शेती संकटात सापडले आहे. नवरगाव परिसरातील शेतकऱ्यांना घोडाझरी नहर यावर्षी लवकर बंद झाल्याने शेतातील धान धोक्यात आले आहे. काही शेतकऱ्यांची धानाची पाल झाल्याने कापूस बैलांना चारत आहेत तर काही शेतकरी इकडून तिकडून पाणी विकत घेऊन शेती जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. घेतलेले कर्ज कसे फेडायचे अशा विंवचनेत शेतकरी सापडला आहे. त्यातच काही धान शेतीला विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. एकूणच शेतकऱ्यांची दैनावस्था झाली आहे. आता तरी शासनाने शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)