शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
3
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
4
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
5
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
6
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
7
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
8
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
9
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
10
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
11
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
12
अमेरिकन गरुड, चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती!
13
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
14
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...
15
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
16
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
17
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
20
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव

धान पीक पाण्याअभावी वाळले

By admin | Updated: October 28, 2014 22:53 IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. परंतु निसर्गांच्या लहरीपणामुळे आणि शासनाच्या धोरणामुळे शेतकरी नागविल्या जात आहे. सध्या शेतकरी मोठ्या

नवरगाव : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. परंतु निसर्गांच्या लहरीपणामुळे आणि शासनाच्या धोरणामुळे शेतकरी नागविल्या जात आहे. सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. पाण्याअभावी धान पिक वाळत आहे. त्यामुळे शेतकरी धानाची पात कापून गुरांना चारा टाकत आहे.यावर्षी पावसाने जून-जुलै मध्येच पाठ फिरविली. त्यानंतर पाऊस आला आणि शेतकरी शेतीच्या कामाला लागले. कशीबशी धान रोवणीची कामे केली मात्र निसर्गाने पाठ फिरविली. सिंदेवाही तालुक्यात भात (धान) पीक हे मुख्य असून संपूर्ण शेती निसर्गावर अवलंबून आहे. शेतकरी धान पीक घेतो आणि त्यावरच कुटुंबाची गुजराण करतो. मुलांचे शिक्षण औषध दवाखाना आदी सर्व खर्च शेतीतून आलेल्या पिकांवरच करावा लागतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी शेतकऱ्याचे कंबरडे मोडत आहे. त्यातच शासनही शेतपिकांना योग्य भाव देत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.यावर्षी निसर्गाने पाठ फिरविली असल्याने शेती संकटात सापडले आहे. नवरगाव परिसरातील शेतकऱ्यांना घोडाझरी नहर यावर्षी लवकर बंद झाल्याने शेतातील धान धोक्यात आले आहे. काही शेतकऱ्यांची धानाची पाल झाल्याने कापूस बैलांना चारत आहेत तर काही शेतकरी इकडून तिकडून पाणी विकत घेऊन शेती जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. घेतलेले कर्ज कसे फेडायचे अशा विंवचनेत शेतकरी सापडला आहे. त्यातच काही धान शेतीला विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. एकूणच शेतकऱ्यांची दैनावस्था झाली आहे. आता तरी शासनाने शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)