शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

माणिकगडवरील कोलामांचे राजुरात 'ढोल सत्याग्रह'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:30 IST

राजुरा : माणिकगड पहाडावर गर्द जंगलात आणि जंगली श्वापदाच्या सान्निध्यात अनेक पिढ्यांपासून वास्तव्य करून गुजराण करणाऱ्या कोलामांना आपल्या वास्तव्याचे ...

राजुरा : माणिकगड पहाडावर गर्द जंगलात आणि जंगली श्वापदाच्या सान्निध्यात अनेक पिढ्यांपासून वास्तव्य करून गुजराण करणाऱ्या कोलामांना आपल्या वास्तव्याचे प्रमाण मागितले जात आहे. सरकार त्यांच्या योजना अडवून बसले आहे. शासकीय यंत्रणेने जंगलात जाऊन त्यांची वेळीच नोंद घेतली असती तर आज पुरावा मागण्याची वेळच आली नसती. आदिम कोलामांच्या शोषणाला शासनव्यवस्थाच जबाबदार असून, त्यांच्या गुड्यावरील दुरवस्थेचा हिशेब मांडण्यासाठी सोमवारी राजुरा येथे आदिम समुदायाने ढोल सत्याग्रह केले. कोलामांचे पारंपरिक वाद्य असलेल्या ढोलांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचून कोलामांना न्याय मिळेल का, असा सवाल कोलाम विकास फाउंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी उपस्थित केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यासह कोरपना व राजुरा येथील आदिम कोलाम समूदायाचे ढोल सत्याग्रह आंदोलन कोलाम विकास फाउंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. राजुरा येथील भवानी मातेचे पूजन करून हजारो कोलाम ढोल वाजवित उपविभागीय कार्यालयावर धडकले. ढोलाच्या तालावर थिरकणारी पावले अन् आपल्या परंपरेला साजेसे लाल-पांढरे झेंडे, पूजेचे सामान असलेले वडगे घेतलेला कोलामांचा जत्था पाहताना राजुरावासीय दंग झाले. आदिम कोलामांना संपूर्ण संरक्षण मिळावे, विनाअट वनजमिनीचे पट्टे देण्यात यावे, कोलामगुड्यावर तातडीने मूलभूत सोयी-सुविधा बहाल करण्यात याव्यात, गेल्या दहा वर्षांत बांधण्यात आलेल्या घरकुल व शौचालय बांधकामाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी यासह खावटी अनुदान, उत्तम शिक्षण व आरोग्य अशा अनेक मागण्यांचे निवेदन शासनाला पाठविण्यात आले. उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी कोलामांचा लढा सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे असून, स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडला गेलेला नाही यातच शासन प्रशासनाचा पराभव आहे. सरकारने जागे होऊन कोलामांना तातडीने न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पुजू कोडापे, सचिव मारोती सिडाम, नानाजी मडावी, वाघूजी गेडाम व अन्य सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.