शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ऐन दुष्काळी परिस्थितीत नाफेडची तूर खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या तुरीला हमीभाव मिळावा, याकरिता शासनातर्फे नाफेड खरेदी केंद्र चालू करण्यात आले. ५ मार्चला ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांना मोठा फटका : तूर घेता का तूर..म्हणत वणवण भटकण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या तुरीला हमीभाव मिळावा, याकरिता शासनातर्फे नाफेड खरेदी केंद्र चालू करण्यात आले. ५ मार्चला चालू झालेली आॅनलाईन नोंदणी २० तारखेलाच बंद झाल्याने यावर्षी चालू झालेली खरेदी व आॅनलाईन नोंदणी १५ दिवसातच बंद झाली. शासनाने ऐन दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात तूर देऊन ‘कोणी तूर घेता का तूर’ अशी बेंबीच्या देठापासून ओरडण्याची वेळ आणून ठेवली आहे.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांची दिल्ली वारी अन् शेतकºयांच्या हाती तुरी अशी परिस्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे. आतापर्यंत प्रचारात व्यस्थ असलेल्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या या समस्येकडे लक्षच दिले नाही. शेतकऱ्यांची हाक कुणीच ऐकली नाही. मात्र आता प्रचार संपला आणि निवडणूकही आटोपली. आतातरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे.जिल्ह्यातील प्रमुख पिकांपैकी तूर हे मुख्य पीक असल्याने जिल्ह्यात यंदा तूर उत्पादनाचा टक्का वाढला आहे. शासनाची नाफेड खरेदी बंद झाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत असून शेतकऱ्यांना कमी भावात खासगी व्यापाºयांना माल विकावा लागत आहे.शासनाच्या चुकीच्या नियोजनाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने नाफेड तूर खरेदी अंतर्गत तुरीला प्रति क्विंटल पाच हजार ६७५ रुपये भाव असल्याने शेतकऱ्यांना दिलासा निर्माण झाला होता. परंतु शासकीत तूर खरेदी बंद करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार शासनाने केला आहे. शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात तूर विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात शासनाप्रति रोष व्यक्त होत आहे. यात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल बाराशे-पंधराशे रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.माझ्या शेतातले तूर पीक निघण्याआधीच शासनाने नाफेड तूर खरेदीसाठी सुरू केलेली आॅनलाईन नोंदणी बंद केली. यामुळे आता माझे मोठे नुकसान होणार असून १८ क्विंटल तुरीचे उत्पादन झाले आहेत. शासनाने आॅनलाईन नोंदणी चालू करून नाफेड अंतर्गत तूर खरेदी करावी.-दौलत गिरटकरप्रगतशील शेतकरी, बोरी नवेगावशासनाच्या चुकीच्या नियोजनाचे फटके शेतकऱ्यांना बसत असून शासनाने हुकूमशाही धोरण, शेतकºयांची होणारी पिळवणूक थांबवून नाफेड तूर खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी केंद्र चालू करावे.- मनोज भोजेकरसमाजसेवक, गडचांदूर