शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

हरितक्रांतीचे स्वप्न भंगले!

By admin | Updated: October 11, 2015 02:11 IST

शासनाने जुने बंधारे पूर्ण होण्याआधीच नवीन बंधाऱ्यांना मंजुरी दिली. या बंधाऱ्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे.

कोेट्यवधीचा खर्च व्यर्थ : सिंचनाअभावी शेती लागली सुकायलाप्रकाश काळे गोवरीशासनाने जुने बंधारे पूर्ण होण्याआधीच नवीन बंधाऱ्यांना मंजुरी दिली. या बंधाऱ्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र वाढीव निधीअभावी अनेक बंधारे रखडल्याने सिंचनाच्या सोयीसाठी बांधलेले अनेक बंधारे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे शासनाचा सिंचनाखाली शेती आणण्याचा उद्देश पूर्ण तर झाला नाहीच. उलट शासनाचा कोट्यवधींचा खर्च व्यर्थ गेला आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे पाणी मिळणे कठीण झाल्यामुळे शेती पिकविणे अवघड झाले आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे. त्यामुळे शेती डबघाईस येण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचाच आधार घेऊन शासनाने शेती सिंचनाखाली येण्यासाठी व शेतीला वर्षभर मुबलक पाणी मिळावे, या उद्देशाने शेतीला पुरक असे अनेक बंधारे बांधण्यात आले.काही बंधाऱ्यात पाणी अडल्याने शासनाचा शेतीविषयीचा मुख्य उद्देश सफल झाला. मात्र सरकारी अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्य धोरणामुळे अनेक बंधाऱ्यातील बांधकामावर कोट्यवधी रुपये खर्च केले, मात्र पाण्याचा एक थेंबही अडला नाही. उलट बंधारा अर्धवट असल्याने बांधकामात वापरलेले लोखंडी साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याने बंधाऱ्यांचे नेमके किती काम झाले हे कळायला मार्ग नाही. अशा अनेक बंधाऱ्यात अधिकारी व कंत्राटदारांनी आपले खिसे गरम करून घेतले.राजुरा तालुक्यातील गोवरी येथील नाल्यावर गेल्या दहा-बारा वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाविषयी आशा पल्लवित झाल्या होत्या. शेतीला बंधाऱ्याचे पाणी मिळणार असल्याने उत्पन्नात वाढ होईल, अशी आस भोळ्याबापड्या शेतकऱ्यांना होती.मात्र सरकारी कामच ते. कधी काम बंद पडेल याचा नेम नाही. आणि झालेही तसेच. अचानक बंधाऱ्याचे काम बंद पडले. आज ना उद्या बंधाऱ्याचे बांधकाम सुरू होईल, या आशेवर शेतकरी होते. या कालावधीत राजुरा विधानसभेचे तीन आमदार बदलले. मात्र बंधाऱ्याचे बांधकाम अजूनही अर्धवट अवस्थेतच असल्याचे दिसते.