शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
13
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
14
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
15
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
16
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

हरितक्रांतीचे स्वप्न भंगले!

By admin | Updated: October 11, 2015 02:11 IST

शासनाने जुने बंधारे पूर्ण होण्याआधीच नवीन बंधाऱ्यांना मंजुरी दिली. या बंधाऱ्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे.

कोेट्यवधीचा खर्च व्यर्थ : सिंचनाअभावी शेती लागली सुकायलाप्रकाश काळे गोवरीशासनाने जुने बंधारे पूर्ण होण्याआधीच नवीन बंधाऱ्यांना मंजुरी दिली. या बंधाऱ्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र वाढीव निधीअभावी अनेक बंधारे रखडल्याने सिंचनाच्या सोयीसाठी बांधलेले अनेक बंधारे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे शासनाचा सिंचनाखाली शेती आणण्याचा उद्देश पूर्ण तर झाला नाहीच. उलट शासनाचा कोट्यवधींचा खर्च व्यर्थ गेला आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे पाणी मिळणे कठीण झाल्यामुळे शेती पिकविणे अवघड झाले आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे. त्यामुळे शेती डबघाईस येण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचाच आधार घेऊन शासनाने शेती सिंचनाखाली येण्यासाठी व शेतीला वर्षभर मुबलक पाणी मिळावे, या उद्देशाने शेतीला पुरक असे अनेक बंधारे बांधण्यात आले.काही बंधाऱ्यात पाणी अडल्याने शासनाचा शेतीविषयीचा मुख्य उद्देश सफल झाला. मात्र सरकारी अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्य धोरणामुळे अनेक बंधाऱ्यातील बांधकामावर कोट्यवधी रुपये खर्च केले, मात्र पाण्याचा एक थेंबही अडला नाही. उलट बंधारा अर्धवट असल्याने बांधकामात वापरलेले लोखंडी साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याने बंधाऱ्यांचे नेमके किती काम झाले हे कळायला मार्ग नाही. अशा अनेक बंधाऱ्यात अधिकारी व कंत्राटदारांनी आपले खिसे गरम करून घेतले.राजुरा तालुक्यातील गोवरी येथील नाल्यावर गेल्या दहा-बारा वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाविषयी आशा पल्लवित झाल्या होत्या. शेतीला बंधाऱ्याचे पाणी मिळणार असल्याने उत्पन्नात वाढ होईल, अशी आस भोळ्याबापड्या शेतकऱ्यांना होती.मात्र सरकारी कामच ते. कधी काम बंद पडेल याचा नेम नाही. आणि झालेही तसेच. अचानक बंधाऱ्याचे काम बंद पडले. आज ना उद्या बंधाऱ्याचे बांधकाम सुरू होईल, या आशेवर शेतकरी होते. या कालावधीत राजुरा विधानसभेचे तीन आमदार बदलले. मात्र बंधाऱ्याचे बांधकाम अजूनही अर्धवट अवस्थेतच असल्याचे दिसते.