शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

हरितक्रांतीचे स्वप्न भंगले!

By admin | Updated: October 11, 2015 02:11 IST

शासनाने जुने बंधारे पूर्ण होण्याआधीच नवीन बंधाऱ्यांना मंजुरी दिली. या बंधाऱ्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे.

कोेट्यवधीचा खर्च व्यर्थ : सिंचनाअभावी शेती लागली सुकायलाप्रकाश काळे गोवरीशासनाने जुने बंधारे पूर्ण होण्याआधीच नवीन बंधाऱ्यांना मंजुरी दिली. या बंधाऱ्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र वाढीव निधीअभावी अनेक बंधारे रखडल्याने सिंचनाच्या सोयीसाठी बांधलेले अनेक बंधारे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे शासनाचा सिंचनाखाली शेती आणण्याचा उद्देश पूर्ण तर झाला नाहीच. उलट शासनाचा कोट्यवधींचा खर्च व्यर्थ गेला आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे पाणी मिळणे कठीण झाल्यामुळे शेती पिकविणे अवघड झाले आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे. त्यामुळे शेती डबघाईस येण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचाच आधार घेऊन शासनाने शेती सिंचनाखाली येण्यासाठी व शेतीला वर्षभर मुबलक पाणी मिळावे, या उद्देशाने शेतीला पुरक असे अनेक बंधारे बांधण्यात आले.काही बंधाऱ्यात पाणी अडल्याने शासनाचा शेतीविषयीचा मुख्य उद्देश सफल झाला. मात्र सरकारी अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्य धोरणामुळे अनेक बंधाऱ्यातील बांधकामावर कोट्यवधी रुपये खर्च केले, मात्र पाण्याचा एक थेंबही अडला नाही. उलट बंधारा अर्धवट असल्याने बांधकामात वापरलेले लोखंडी साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याने बंधाऱ्यांचे नेमके किती काम झाले हे कळायला मार्ग नाही. अशा अनेक बंधाऱ्यात अधिकारी व कंत्राटदारांनी आपले खिसे गरम करून घेतले.राजुरा तालुक्यातील गोवरी येथील नाल्यावर गेल्या दहा-बारा वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाविषयी आशा पल्लवित झाल्या होत्या. शेतीला बंधाऱ्याचे पाणी मिळणार असल्याने उत्पन्नात वाढ होईल, अशी आस भोळ्याबापड्या शेतकऱ्यांना होती.मात्र सरकारी कामच ते. कधी काम बंद पडेल याचा नेम नाही. आणि झालेही तसेच. अचानक बंधाऱ्याचे काम बंद पडले. आज ना उद्या बंधाऱ्याचे बांधकाम सुरू होईल, या आशेवर शेतकरी होते. या कालावधीत राजुरा विधानसभेचे तीन आमदार बदलले. मात्र बंधाऱ्याचे बांधकाम अजूनही अर्धवट अवस्थेतच असल्याचे दिसते.