शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बाबूपेठ उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेबांचे नाव ! अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 15:13 IST

बाबूपेठवासीयांची मागणी : मनपामध्ये घेतला होता ठराव

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : बाबूपेठ उड्डाणपुलाची बाबूपेठवासीयांची मागील अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे. या उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे, तरी महापालिकेने सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार या उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन लोकार्पण करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक स्नेहल देवआनंद रामटेके यांच्यासह बाबूपेठवासीयांनी केली आहे.

मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिक रेल्वेच्या उड्डाणपुलाअभावी मोठा त्रास सहन करीत होते. रेल्वे फाटक बंद असल्याने प्रत्येक गंभीर रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. अखेर या पुलाला मंजुरी मिळाली रेल्वे विभाग, महाराष्ट्र शासन आणि मनपा प्रशासन यांच्या माध्यमातून या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. 

या पुलाचे बांधकाम सुरू असतानाच चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत तत्कालीन नगरसेवक स्नेहल रामटेके, अनिल रामटेके यांनी या उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी केली होती. संपूर्ण सभागृहाने ही मागणी एकमताने मंजूर केली होती. आता या पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. या पुलाचे लोकार्पण करण्यासंदर्भात प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी लोकार्पण सोहळा आयोजित केला जाईल, अशी नागरिकांत चर्चा आहे. मनपाने सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार या उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिल्यानंतर लोकार्पण सोहळा घ्यावा, अशी मागणी स्नेहल रामटेके यांनी केली आहे. 

त्या' घरांसाठी रस्ता उपलब्ध करून द्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. मात्र, पुलाच्या बाजूला असलेल्या सुमारे दहा ते बारा घरांतील नागरिकांचा घराबाहेर पडणारा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशास- नाच्यावतीने उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यापूर्वी या घरांतील नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्नेहल रामटेके यांनी केली आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर