शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

‘विनू’ तुला भरोसा नाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:51 IST

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचा शासनाकडे ढीग पडलाय आणि शासन प्रशासन त्याकडे साधे लक्षही देत नाही.

ठळक मुद्देशिक्षकांच्या मोर्चात घोषणा : प्राथमिक शिक्षकांचा आक्रोश रस्त्यावर

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचा शासनाकडे ढीग पडलाय आणि शासन प्रशासन त्याकडे साधे लक्षही देत नाही. या समस्यांचा वारंवार पाठपुरावा करूनही समस्या कमी न होता दिवसेंदिवस वाढतच आहेत. दररोज अन्यायकारक शासन निर्णय निघत आहेत. त्यामुळे शिक्षक त्रस्त आहेत. शिक्षकांच्या मनात खदखदत असलेला हा असंतोष शनिवारी आक्रोश मोर्चाच्या रुपात व्यक्त झाला. यावेळी प्राथमिक शिक्षकांसोबत शिक्षिकांनी ‘विनू’ तुला भरोसा नाय का?, अशी घोषणा देत शिक्षणमंत्र्यांना टोला हाणत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वात हा मोर्चा दुपारच्या सुमारास शहरातील प्रमुख मार्गांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्ह्यातील शासकीय व खासगी शाळेतील शिक्षक हजारोच्या संख्येत मोर्चात सहभागी झाले. यावेळी पुरोगामी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आर.जी.भानारकर, नारायण कांबळे, विजय भोगेकर, हरीश ससनकर, अल्का ठाकरे, दीपक वर्हेकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चाला जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटना व मुख्याध्यापक संघटनेने आपला पाठींबा जाहीर केला होता व सक्रीय सहभाग नोंदवला. सदर संघटनेकडून दुष्यंत निमकर, निलेश कुमरे, सुनील दुधे, मनीषा मडावी, मोरेश्वर बोंडे, सुरेश वासेकर यांनी सहभाग नोंदवला.नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, वरिष्ठ व निवड श्रेणीबाबत २३ आॅक्टोंबर २०१८ च्या अन्यायकारक शासन निर्णयातील अट क्र. ४ रद्द करणे, भेदभाव न करता सर्व विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणे तसेच ते खरेदीचे अधिकार पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीला देणे व विद्यार्थी उपस्थिती भत्यात वाढ करणे, शिक्षकांकडील आॅनलाईनची सर्व कामे बंद करणे व व्हॉटसअपवर आदेश देणे बंद करणे, एम.एस.सी.आय.टी. साठी मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ देणे, शालेय पोषण आहार धान्याचा पुरवठा पूर्वीप्रमाणे करणे, समान काम समान वेतन, या न्यायाने सर्व विषय शिक्षकांना पदवीधर पदाची वेतनश्रेणी लागू करणे, शिक्षण सेवकांना तीन वेतनवाढी मंजूर करणे तथा अप्रशिक्षित व वसतिशाळा शिक्षकांना रुजू तारखेपासून वरिष्ठ वेतनासह सर्व लाभास पात्र ठरविणे, सर्व उच्च प्राथमिक शाळांना विनाअट मुख्याध्यापक पद मंजूर करणे आदी मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या. मोर्चा यशस्वी करण्यासाठी किशोर आनंदवार, अशोक दहेलकर, रवी वरखेडे, दिलीप इटनकर, हेमंत वागदरकर, पी. टी. राठोड, सुरेश मस्के, किशोर भोयर, सुभाष अडवे, आर. टी. चौधरी, प्रभाकर भालतडक, अनिल नैताम, बाबुराव पहानपटे, रामेश्वर सेलोटे, इंदिरा पहानपटे, प्रतिभा उदापुरे, मिनाक्षी बावनकर, निखील तांबोळी, केवलराम मैंद, सुधाकर कोल्हे, नरेंद्र मुंगले, गोविंद गोहणे, पंकज तांबडे, गणेश आसेकर, निरंजन गजबे, विजय कुंभारे, सुनील वैद्य, राजेंद्र घोरुडे, विपिन धाबेकर, किशोर नरड आदींनी परिश्रम घेतले.