शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

‘विनू’ तुला भरोसा नाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:51 IST

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचा शासनाकडे ढीग पडलाय आणि शासन प्रशासन त्याकडे साधे लक्षही देत नाही.

ठळक मुद्देशिक्षकांच्या मोर्चात घोषणा : प्राथमिक शिक्षकांचा आक्रोश रस्त्यावर

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचा शासनाकडे ढीग पडलाय आणि शासन प्रशासन त्याकडे साधे लक्षही देत नाही. या समस्यांचा वारंवार पाठपुरावा करूनही समस्या कमी न होता दिवसेंदिवस वाढतच आहेत. दररोज अन्यायकारक शासन निर्णय निघत आहेत. त्यामुळे शिक्षक त्रस्त आहेत. शिक्षकांच्या मनात खदखदत असलेला हा असंतोष शनिवारी आक्रोश मोर्चाच्या रुपात व्यक्त झाला. यावेळी प्राथमिक शिक्षकांसोबत शिक्षिकांनी ‘विनू’ तुला भरोसा नाय का?, अशी घोषणा देत शिक्षणमंत्र्यांना टोला हाणत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वात हा मोर्चा दुपारच्या सुमारास शहरातील प्रमुख मार्गांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्ह्यातील शासकीय व खासगी शाळेतील शिक्षक हजारोच्या संख्येत मोर्चात सहभागी झाले. यावेळी पुरोगामी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आर.जी.भानारकर, नारायण कांबळे, विजय भोगेकर, हरीश ससनकर, अल्का ठाकरे, दीपक वर्हेकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चाला जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटना व मुख्याध्यापक संघटनेने आपला पाठींबा जाहीर केला होता व सक्रीय सहभाग नोंदवला. सदर संघटनेकडून दुष्यंत निमकर, निलेश कुमरे, सुनील दुधे, मनीषा मडावी, मोरेश्वर बोंडे, सुरेश वासेकर यांनी सहभाग नोंदवला.नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, वरिष्ठ व निवड श्रेणीबाबत २३ आॅक्टोंबर २०१८ च्या अन्यायकारक शासन निर्णयातील अट क्र. ४ रद्द करणे, भेदभाव न करता सर्व विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणे तसेच ते खरेदीचे अधिकार पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीला देणे व विद्यार्थी उपस्थिती भत्यात वाढ करणे, शिक्षकांकडील आॅनलाईनची सर्व कामे बंद करणे व व्हॉटसअपवर आदेश देणे बंद करणे, एम.एस.सी.आय.टी. साठी मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ देणे, शालेय पोषण आहार धान्याचा पुरवठा पूर्वीप्रमाणे करणे, समान काम समान वेतन, या न्यायाने सर्व विषय शिक्षकांना पदवीधर पदाची वेतनश्रेणी लागू करणे, शिक्षण सेवकांना तीन वेतनवाढी मंजूर करणे तथा अप्रशिक्षित व वसतिशाळा शिक्षकांना रुजू तारखेपासून वरिष्ठ वेतनासह सर्व लाभास पात्र ठरविणे, सर्व उच्च प्राथमिक शाळांना विनाअट मुख्याध्यापक पद मंजूर करणे आदी मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या. मोर्चा यशस्वी करण्यासाठी किशोर आनंदवार, अशोक दहेलकर, रवी वरखेडे, दिलीप इटनकर, हेमंत वागदरकर, पी. टी. राठोड, सुरेश मस्के, किशोर भोयर, सुभाष अडवे, आर. टी. चौधरी, प्रभाकर भालतडक, अनिल नैताम, बाबुराव पहानपटे, रामेश्वर सेलोटे, इंदिरा पहानपटे, प्रतिभा उदापुरे, मिनाक्षी बावनकर, निखील तांबोळी, केवलराम मैंद, सुधाकर कोल्हे, नरेंद्र मुंगले, गोविंद गोहणे, पंकज तांबडे, गणेश आसेकर, निरंजन गजबे, विजय कुंभारे, सुनील वैद्य, राजेंद्र घोरुडे, विपिन धाबेकर, किशोर नरड आदींनी परिश्रम घेतले.