शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मूल आदर्श तालुका करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:03 IST

मूल शहर आणि तालुक्यात विकासाची विविध कामे पुर्णत्वास येत असून लवकरच महाराष्ट्रातील आदर्श तालुक्याचे स्थळ म्हणून मुलची ओळख निर्माण होईल असा विश्वास वित्त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन : इको पार्कचा लोकार्पण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मूल शहर आणि तालुक्यात विकासाची विविध कामे पुर्णत्वास येत असून लवकरच महाराष्ट्रातील आदर्श तालुक्याचे स्थळ म्हणून मुलची ओळख निर्माण होईल असा विश्वास वित्त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्ट रोजी मुल येथे खनीज विकास निधीच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या इको पार्कच्या उदघाटन सोहळयात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुल नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्या गुरनुले, नगर परिषदेचे अध्यक्ष नंदू रणदिवे, पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहणे, उपसभापती चंदू मारगोनवार, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुलचे मुख्याधिकारी सरनाईक, सेवानिवृत्त उपविभागीय वनाधिकारी धाबेकर आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मूल शहर व तालुक्यातील नागरिकांनी माझ्यावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. मूल शहरात कर्मवीर मा.सा. कन्नमवारांचे स्मारक व सभागृह, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे बांधकाम पुर्णत्वास आले असून शहरात सीसीटीव्ही सर्व्हेलंस सिस्टीम स्थापित करण्यात आली आहे.सहा कोटी रू. निधी खर्चुन तालुका क्रीडा संकुल तयार होणार असून ११ कोटी रू. किमतीच्या आठवडी बाजाराच्या कामालासुध्दा लवकरच सुरुवात होणार आहे. शहराच्या मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे.मूल शहरातील अत्याधुनिक बसस्थानक हे शहराचे वैशिष्ट ठरणार आहे. लवकरच मूल हे २४ तास नळाचे पाणी देणारे शहर ठरणार आहे. ग्रामीण भागातही विकासाची विविध कामे वेगाने सुरू असून चिचडोह प्रकल्प २०१८ पर्यंत सुरू होणार आहे. माजी मालगुजारी तलावासाठी १५० कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला आहे. मागेल त्याला विहीर या योजनेचा लाभ शेतकºयांना दिला आहे. अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. याकरिता पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यात प्रत्येक गावात शुध्द पाण्याची आरो मशिन लावण्यात येणार आहे. कुकुटपालनाचे पहिले केंद्र मूल तालुक्यातच सुरू होणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून उत्तम रस्ते तालुक्यात तयार करण्यात येणार आहे. मूल तालुका व शहर या राज्यातील आदर्श शहर व तालुका म्हणून लौकिक प्राप्त करेल, यावर आपला भर राहणार असल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.या इको पार्कमध्ये स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन तसेच २५ सप्टेंबर दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मदिनी नि:शुल्क प्रवेश दिला जाईल, असेही ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.उल्लेखनीय असे की खनिज विकास निधीच्या माध्यमातून दोन कोटी ९८ लाख रुपयांचा निधी खर्चुन बांधण्यात आलेल्या इको पार्कचे उदघाटन यावेळी एका शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते करण्यात आले. या इको पार्कमध्ये पशुपक्ष्यांचे स्टॅच्युज उभारण्यात आले असून आकर्षक पध्दतीने इको पार्कचे बांधकाम करण्यात आले आहे. या पार्कमुळे मूलवासीयांना आता सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी चांगले वातावरण मिळणार आहे. यावेळी सेवानिवृत्त उपविभागीय वनाधिकारी धाबेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठया संख्येत नागरिकांची उपस्थिती होती.