शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कामगार नाही, आता मालक व्हा!

By admin | Updated: November 30, 2014 23:00 IST

ज्या शेतकऱ्यांच्या प्रकल्पामध्ये जमिनी गेल्या त्यांना अत्यल्प मोबदला देऊन फसवणूक करण्यात आली आहे. तर प्रकल्पामध्ये ज्यांना नोकरी मिळाली त्यांना आठ ते नऊ हजार रुपये वेतन देऊन बोळवण केली जात आहे.

हंसराज अहीर : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची लढाई जिंकण्याचा दिला विश्वासभद्रावती : ज्या शेतकऱ्यांच्या प्रकल्पामध्ये जमिनी गेल्या त्यांना अत्यल्प मोबदला देऊन फसवणूक करण्यात आली आहे. तर प्रकल्पामध्ये ज्यांना नोकरी मिळाली त्यांना आठ ते नऊ हजार रुपये वेतन देऊन बोळवण केली जात आहे. मात्र, आता शेतकऱ्यांनी लढा उभारण्याची गरज असून कामगार नाही तर आता मालक होण्याची वेळ आली आहे, शेतकऱ्यांनी संघटीत व्हावे असे आवाहन केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी केले. भद्रावती येथील विश्रामगृहात कर्नाटका एम्टा कोळसा कंपनी, सेंट्रल कॉलरीज कंपनी, सनफ्लॅग कंपनी या तिन्ही कंपन्यांच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक आज रविवारी पार पडली. यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी जाणून घेत मार्गदर्शन केले. भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा कोळसा खाण व सेंट्रल कॉलरीज कंपनी तसेच वरोरा तालुक्यातील सनफ्लॅग कंपनी या तिन्ही कंपन्यांची लिज रद्द करण्यात आली आहे. या तिन्ही कंपन्या सरकार जमा झाल्या आहेत. येत्या मार्चपर्यंत त्यांना कोळसा काढण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने कंपन्यांना दिली आहे. त्यानंतर या तिन्ही खाणी कोल इंडियाने आपल्या ताब्यात घ्याव्या व कोल इंडियाच्या नियमाप्रमाणे प्रकल्पग्रस्त कुटुंबांना नोकरी व शेतीचा भाव देण्यात यावा, असे ते म्हणाले. यासाठी आता प्रकल्पग्रस्तांनी लढा उभारणे आवश्यक असून ही लढाई आपणच जिंकणार असल्याचाही विश्वास ना. हंसराज अहीर यांनी व्यक्त केला. खासगी कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती ‘ना नोकरी ना शेतीला भाव’ अशी झाली होती. परंतु या तिन्ही कंपन्या कोल इंडियाने घेतल्यास प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दोन एकर जमिनीसाठी नोकरी, आठ ते दहा लक्ष रुपये प्रति एकर भाव, नोकरी नाकारल्यास पाच लाख प्रमाणे मोबदला या खाणींसाठी लागू झाल्या पाहिजे. आता आपल्या मागण्यांचे रुप आधी पेक्षा बदलले आहे, असेही ना. अहीर म्हणाले.लुटारुंच्या विरोधात हा लढा आहे. खासगी कंपन्याद्वारे लुटल्या गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लुटारुंच्या पाशातून काढायचे आहे. प्रकल्पग्रस्तांनी या कंपन्यांकडून घेतलेली रक्कम परत देण्याची मानसिकता ठेवावी त्यानंतरच हा लढा लढू शकू. आता कोणालाही काही मागायचे नाही. कामगार नाही आता, मालक व्हा. खुप पिळवणूक झाली. आता दुसरा मार्ग पकडायचा आहे, असे ते म्हणाले.या बैठकीला भाजपा तालुकाध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, शहर अध्यक्ष प्रवीण सातपुते, खुशाल बोंडे, जि.प.बांधकाम सभापती देवराव भोंगळे, रवी नागपुरे, जि.प. सदस्य विजय वानखेडे, राहुल सराफ, नरेंद्र जीवतोडे, ओम मांंडवकर, संजय पारखी, गोपाल गोसवाडे, नामदेव डाहुले, वसंत सातभाई उपस्थित होते. बैठकीनंतर तहसीलदार, वेकोलि अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्याबाबत ना. अहीर यांनी चर्चा केली. कार्यक्रमाचे संचालन विजय वानखेडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)