शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

कामगार नाही, आता मालक व्हा!

By admin | Updated: November 30, 2014 23:00 IST

ज्या शेतकऱ्यांच्या प्रकल्पामध्ये जमिनी गेल्या त्यांना अत्यल्प मोबदला देऊन फसवणूक करण्यात आली आहे. तर प्रकल्पामध्ये ज्यांना नोकरी मिळाली त्यांना आठ ते नऊ हजार रुपये वेतन देऊन बोळवण केली जात आहे.

हंसराज अहीर : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची लढाई जिंकण्याचा दिला विश्वासभद्रावती : ज्या शेतकऱ्यांच्या प्रकल्पामध्ये जमिनी गेल्या त्यांना अत्यल्प मोबदला देऊन फसवणूक करण्यात आली आहे. तर प्रकल्पामध्ये ज्यांना नोकरी मिळाली त्यांना आठ ते नऊ हजार रुपये वेतन देऊन बोळवण केली जात आहे. मात्र, आता शेतकऱ्यांनी लढा उभारण्याची गरज असून कामगार नाही तर आता मालक होण्याची वेळ आली आहे, शेतकऱ्यांनी संघटीत व्हावे असे आवाहन केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी केले. भद्रावती येथील विश्रामगृहात कर्नाटका एम्टा कोळसा कंपनी, सेंट्रल कॉलरीज कंपनी, सनफ्लॅग कंपनी या तिन्ही कंपन्यांच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक आज रविवारी पार पडली. यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी जाणून घेत मार्गदर्शन केले. भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा कोळसा खाण व सेंट्रल कॉलरीज कंपनी तसेच वरोरा तालुक्यातील सनफ्लॅग कंपनी या तिन्ही कंपन्यांची लिज रद्द करण्यात आली आहे. या तिन्ही कंपन्या सरकार जमा झाल्या आहेत. येत्या मार्चपर्यंत त्यांना कोळसा काढण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने कंपन्यांना दिली आहे. त्यानंतर या तिन्ही खाणी कोल इंडियाने आपल्या ताब्यात घ्याव्या व कोल इंडियाच्या नियमाप्रमाणे प्रकल्पग्रस्त कुटुंबांना नोकरी व शेतीचा भाव देण्यात यावा, असे ते म्हणाले. यासाठी आता प्रकल्पग्रस्तांनी लढा उभारणे आवश्यक असून ही लढाई आपणच जिंकणार असल्याचाही विश्वास ना. हंसराज अहीर यांनी व्यक्त केला. खासगी कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती ‘ना नोकरी ना शेतीला भाव’ अशी झाली होती. परंतु या तिन्ही कंपन्या कोल इंडियाने घेतल्यास प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दोन एकर जमिनीसाठी नोकरी, आठ ते दहा लक्ष रुपये प्रति एकर भाव, नोकरी नाकारल्यास पाच लाख प्रमाणे मोबदला या खाणींसाठी लागू झाल्या पाहिजे. आता आपल्या मागण्यांचे रुप आधी पेक्षा बदलले आहे, असेही ना. अहीर म्हणाले.लुटारुंच्या विरोधात हा लढा आहे. खासगी कंपन्याद्वारे लुटल्या गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लुटारुंच्या पाशातून काढायचे आहे. प्रकल्पग्रस्तांनी या कंपन्यांकडून घेतलेली रक्कम परत देण्याची मानसिकता ठेवावी त्यानंतरच हा लढा लढू शकू. आता कोणालाही काही मागायचे नाही. कामगार नाही आता, मालक व्हा. खुप पिळवणूक झाली. आता दुसरा मार्ग पकडायचा आहे, असे ते म्हणाले.या बैठकीला भाजपा तालुकाध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, शहर अध्यक्ष प्रवीण सातपुते, खुशाल बोंडे, जि.प.बांधकाम सभापती देवराव भोंगळे, रवी नागपुरे, जि.प. सदस्य विजय वानखेडे, राहुल सराफ, नरेंद्र जीवतोडे, ओम मांंडवकर, संजय पारखी, गोपाल गोसवाडे, नामदेव डाहुले, वसंत सातभाई उपस्थित होते. बैठकीनंतर तहसीलदार, वेकोलि अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्याबाबत ना. अहीर यांनी चर्चा केली. कार्यक्रमाचे संचालन विजय वानखेडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)