शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

खरीप हंगामात बियाणे कमी पडू देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:07 IST

खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना योग्य प्राधिकृत बियाणे, मुबलक व मागणीनुसार मिळावे, यासाठी जिल्हा कृषी यंत्रणेने यंत्रणा सज्ज करावी. बियाण्यांची जिल्ह्यात सर्वत्र मूबलक उपलब्धता आहे. शेतकऱ्यांनी प्राधिकृत बियाणे कृषी केंद्रांमधून पावतीसह खरेदी करावे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना योग्य प्राधिकृत बियाणे, मुबलक व मागणीनुसार मिळावे, यासाठी जिल्हा कृषी यंत्रणेने यंत्रणा सज्ज करावी. बियाण्यांची जिल्ह्यात सर्वत्र मूबलक उपलब्धता आहे. शेतकऱ्यांनी प्राधिकृत बियाणे कृषी केंद्रांमधून पावतीसह खरेदी करावे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची पेरणीच्या काळामध्ये बियाणे, खते, वीज पुरवठ्यासाठी अडचण होऊ नये. कृषी केंद्रांकडून फसवणूक होता कामा नये. यासाठी संबंधित यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये रविवारी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी आमदार नाना श्यामकुळे, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, जि. प. कृषी सभापती अर्चना जीवतोडे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, मनपा आयुक्त संजय काकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील व विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यात उपलब्ध असणाºया बियाण्यांची स्थिती, खतांची उपलब्धता, गोदामांची संख्या, वीज जोडणी, विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून पीक पॅटर्न बदलाची तयारी, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जलयुक्त शिवार अभियान, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, कृषी यांत्रिकीकरण व सिंचनाबाबत चर्चा करण्यात आली. नियोजनाप्रमाणे कृषी विभागातील कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने काटेकोपणे कामे करावी. शेतकºयांना पीक लागवड, बियाणे, खते यासंदर्भात अडचणी आल्यास तत्काळ दूर करण्यासाठी तत्पर राहावे, अशा सूचना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या.कृषी आणि वन विभागाने योजनांच्या अंमलबजावणीबाबत यावेळी सादरीकरण केले. त्यानंतर विभागनिहाय विविध योजनांवर चर्चा झाली. विभागप्रमुखांनी आपापल्या विभागाची माहिती बैठकीत सादर केले.१३ हजार ३१० मेट्रिक खत शिल्लकखरीप हंगामाकरिता ४ लक्ष ७५ हजार ५२२ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भातासाठी १ लक्ष ८० हजार १९६ हेक्टर, सोयाबीन ४९ हजार ७५० हेक्टर, कापूस १ लक्ष ९७ हजार २२७ हेक्टर, तूर ४३ हजार ६०५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण ६६ हजार १११.४० क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. खरीप हंगामाकरिता १३ हजार ६०३ मेट्रिक टन खत प्राप्त झाले. आतापर्यंत २९३ मेट्रिक टन खताची विक्री झाली आहे. जिल्ह्यामध्ये १३ हजार ३१० मेट्रिक टन रासायनिक खत अद्याप शिल्लक आहे. जिल्ह्यातील शेतकºयांची संख्या लक्षात घेऊन वाढीव खताची मागणी करण्यात आली. सर्व शेतकऱ्यांना सहजपणे खत मिळावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.१६ भरारी पथकेकृषी विभागाने शेतकºयांना योग्य दर्जाच्या कृषी निविष्ठा वाजवी दरात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर एक व तालुका स्तरावर १५ असे एकूण १६ भरारी पथकांची स्थापना केली. ही पथके कारवाई करतील.तक्रार निवारण कक्षशेतकºयांनी बियाण्यांची गुणवत्ता, खताच्या उपलब्धतेबाबत भेसळ वा अन्य कोणत्याही समस्येसाठी जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद या ठिकाणी तक्रार निवारण कक्ष स्थापण्यात येणार आहे. याशिवाय तालुका व पंचायत समितीमध्ये तक्रारीचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कक्षातून समस्यांचा निपटारा केला जाणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत चोरबीटीच्या १३ प्रकरणांमध्ये कारवाई झाली आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार