शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महाऔष्णिक केंद्रात गुरे सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:21 IST

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या युनिट क्र. १ ते ९ एडीपीएल व उर्जानगर वसाहत परिसरात मोकाट गुरे-ढोरे व पाळीव जनावरांचा वावर वाढल्यामुळे बऱ्याचदा कर्मचारी व पाल्यांचा अपघात झाला. मोकाट अथवा पाळीव जनावरांमुळे विद्युत केंद्राच्या परिसरात पट्टेदार वाघ व इतर हिंसक प्राण्यांचा वावर वाढण्याची शक्यता आहे. भविष्यातील संकट लक्षात घेऊन पशुपालकांनी या परिसरात गुरे सोडू नये, असे आवाहन चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्याच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या युनिट क्र. १ ते ९ एडीपीएल व उर्जानगर वसाहत परिसरात मोकाट गुरे-ढोरे व पाळीव जनावरांचा वावर वाढल्यामुळे बऱ्याचदा कर्मचारी व पाल्यांचा अपघात झाला. मोकाट अथवा पाळीव जनावरांमुळे विद्युत केंद्राच्या परिसरात पट्टेदार वाघ व इतर हिंसक प्राण्यांचा वावर वाढण्याची शक्यता आहे. भविष्यातील संकट लक्षात घेऊन पशुपालकांनी या परिसरात गुरे सोडू नये, असे आवाहन चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्याच्या वतीने करण्यात आले आहे.चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात अंभोरा, खैरगाव, पद्मापूर, मीनगाव, आगरझरी, म्हसाळा, तुकूम आदी गावातील सरपंचांना त्यांच्या अधिनस्थ परिसरातील पाळीव व मोकाट जनावरे आपल्या ताब्यात घेण्याकरिता प्रशासनातर्फे पत्र देण्यात आले होते. याशिवाय प्रत्येक गावामध्ये दवंडी पिटविण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या प्लांट, एडीपीएल आणि वसाहत परिसरात पट्टेदार वाघीण तिच्या तीन शावकासह आणि इतर हिंसक प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला आहे. हा परिसर जंगलाला लागून असल्याने वन्यप्राण्यांचा सतत संचार सुरू असतो.सदर परिसरात असलेल्या पाळीव व मोकाट जनावरांचा वावर हिंसक प्राण्यांना निमंत्रण देण्यासारखा ठरू शकते. त्यामुळे ही जनावरे कोणत्याही परिस्थितीत विद्युत केंद्रातील वसाहतीबाहेर काढण्याबाबत मुख्य वनसंरक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत सांगण्यात आले होते.पाळीव व मोकाट जनावरे जिल्हाधिकाºयांच्या दिलेल्या निर्देशाप्रमाणे महानगरपालिका चंद्रपूर यांच्यातर्फे विद्युत केंद्र व वसाहतीच्या बाहेर काढण्यात येणार आहे. जंगलाला लागून असणाºया परिसरात जनावरे असल्यास वन्य प्राण्यांकडून धोका निर्माण होऊ शकतो.चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील विद्युत केंद्राच्या लगत असलेल्या अंभोरा, खैरगाव, पद्मापूर, किटाळी, मीनगाव, आगरझरी, म्हासाळा, तुकूम आदी गावांतील सरपंचांनी पशुपालक शेतकºयांना माहिती देऊन ही जनावरे केंद्र परिसरात आणण्यास मज्जाव करण्याचे सीटीपीएसतर्फे कळविण्यात आले.