शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:40 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत मंजूर कर्ज खात्यावर ३१ जुलै २०१७ नंतरचे व्याज बँकांनी वसूल करु नये.

ठळक मुद्देसहकार मंत्र्यांचे निर्देश : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सहकार विभागाचा आढावा

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत मंजूर कर्ज खात्यावर ३१ जुलै २०१७ नंतरचे व्याज बँकांनी वसूल करु नये. याबाबत राज्यस्तरावर एसएलबीसीच्या बैठकीमध्ये बँकांनी व्याज वसूल करु नये, असा निर्णय झालेला असून या निर्णयाचे सर्व बँकांनी तंतोतंत पालन करण्याचे निर्देश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये शनिवारी सहकार विभागाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, सहकार विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था प्रवीण वानखेडे, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सरव्यवस्थापक एम. व्ही. पोटे, सहकार क्षेत्रातील संबंधित विविध अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यात असलेल्या पगारदार व नागरी सहकारी पतसंस्थांनी त्यांना मिळणाऱ्या नफ्यातील २० टक्के रक्कमेची गुंतवणूक करुन जिल्ह्यात सहकारी तत्वावर रुग्णालय उभारून गरीब व दूर्बल घटकातील नागरिकांना उत्तम सेवा देण्याचे कार्य करावे, असे आवाहनही सहकार मंत्री देशमुख यांनी केले. या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचा आढावा घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १०० विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना नवीन व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या सूचना केल्या. यामुळे सोसायट्या सक्षमीकरणाचा शासनाचा उद्देश सफल होईल, असे ते म्हणाले. अटल पणन महाअभियानांतर्गत ज्या विकास संस्थांची व्यवसायासाठी निवड करण्यात आली आहे. त्या संस्था योग्यरित्या कार्यान्वित होण्याकरीता सर्व अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीत ना. देशमुख यांनी कर्जमाफी, बाजार समिती, सहकारी संस्था यासह विविध विषयाचा आढावा घेतला.जिल्ह्यात ९१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभचंद्रपूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँक मिळून थकीत कर्ज असणारे शेतकरी, प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणारे लाभार्थी व एकरकमी योजनेंतर्गत लाभ देण्यात आलेले शेतकरी असे एकूण ९१ हजार १५७ कर्जमाफीस पात्र लाभार्थ्यांना ३५१ कोटी २२ लाख रुपयांचा लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी दिली.